शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : प्रचार करणे शिक्षकांना पडणार महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 02:30 IST

निवडणूक विभागाने तशा सूचना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

अलिबाग : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला चांगलीच रंगत येत आहे. प्रचार सभा, प्रचार रॅलींच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रत्येक उमेदवारांचा प्रयत्न सुरू आहे. प्रचार यंत्रणा राबवताना त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सरकारी तसेच खासगी शाळेतील शिक्षकांचा सहभाग मागील निवडणुकीत दिसून आला आहे. त्यामुळे निवडणूक विभागाने कडक निर्बंध घालताना प्रचार रॅली अथवा सभांमध्ये शिक्षक आढळून आल्यास त्यांच्या नोकरीवर गदा येणार आहे. निवडणूक विभागाने तशा सूचना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे प्रचारात शिक्षकांचा वापर करणाºया राजकीय पक्षाला सावध भूमिका घ्यावी लागणार आहे.आत होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत प्रचार करणाºया शिक्षकांवर उमेदवारांच्या कार्यकर्त्यांचीही नजर राहणार आहे. रायगड जिल्ह्यातील खासगी शिक्षण संस्था या कोणत्या कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत. तसेच सरकारी शाळेतील शिक्षकांनाही सत्ताधाऱ्यांच्या आदेशामुळे निवडणुकीत काम करावे लागत आहे. त्यातीस काही शिक्षक हे मन लावून काम करतात तर काही शिक्षकांना राजकीय पक्षाच्या उमेदवाराचा नाइलाजाने प्रचार करावा लागतहोता.जिल्ह्यातील शिक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यांचा सुयोग्य वापर करण्याचे तंत्र येथील राजकीय पक्षांना चांगलेच अवगत झालेले आहे. बदली करण्याची, नोकरीवरून काढण्याची, अशा विविध दबावतंत्राचा वापर करून शिक्षकांना प्रचार करण्यास भाग पाडले जाते. मोठ्या प्रमाणात शिक्षक उपलब्ध असल्याने त्यांना प्रचार कार्यात राबवले जाते. प्रचार रॅली, प्रचार सभा, प्रचाराचे व्यवस्थापन यासह अन्य कामासाठी त्यांना जुंपले जाते.राजकीय पक्षांचे झेंडे खांद्यावर घेऊन मिरवताना शिक्षकांना पाहिले आहे. अगदी प्रचारसभेसाठी खुर्च्या लावण्यापासून त्या उचलण्यापर्यंतची कामे काही शिक्षक करत आलेले आहेत. काही ठिकाणी तर मतदारांबरोबर संपर्क साधण्याची जबाबदारी शिक्षकांनी पार पाडलेली आहे. ही बाब आता निवडणूक विभागाच्या लक्षात आली आहे. त्यामुळे प्रचारात शिक्षक दिसल्यास त्यांना नोकरी गमवावी लागणार आहे. त्याचप्रमाणे ज्या उमेदवाराचा प्रचार करताना जे शिक्षक आढळतील त्या उमेदवारावर आचारसंहिता भंग केल्याचा ठपका ठेवण्यात येणार आहे. निवडणूक विभागाने तसे आदेश जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. त्यामुळे शिक्षकांसह राजकीय पक्षांचेही धाबे दणाणले आहेत.निवडणूक विभागाच्या अशा कडक भूमिकेमुळे राजकीय पक्षांना आता मनुष्यबळाची कमतरता भासणार आहे. शिक्षकांचा प्रचारात वापर करणाºया राजकीय पक्षांना आता आयत्या वेळी कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या माध्यमातूनच प्रचाराची धुरा सांभाळावी लागणार आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचीही अशा शिक्षकांवर नजर राहणार असल्याने वादावादीचे प्रकार पुढे पाहायला मिळणार आहेत.निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार प्रचार सभा, बैठका, प्रचार रॅली यांचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येते. यासाठी कायमस्वरूपी पथक तैनात केलेले असते. संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही लावले जातात. चित्रीकरणात शिक्षक दिसल्यास त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्याचा अधिकार आता जिल्हाधिकाºयांना देण्यात आला आहे.राजकीय प्रचार सभा, प्रचार रॅली यासह अन्य कामाच्या फंदात शिक्षकांनी पडू नये. या उपरही कोणी आढळल्यास त्याच्यावर कारवाई होणार आहे. त्यामुळे शिक्षकांनी कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे. याबाबत विविध शिक्षक संघटनांनी आपल्या सहकाºयांना राजकीय प्रचारात सहभाग घेण्याच्या कामापासून रोखावे.- विठ्ठल इनामदार,प्रांताधिकारी, महाड

टॅग्स :Raigadरायगडalibag-acअलिबाग