शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

Maharashtra Election 2019 : रायगडमधील सात विधानसभा मतदारसंघात ६२ अर्ज दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 02:49 IST

रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये गुरुवारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप आणि भाजपच्या दिग्गज उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले.

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये गुरुवारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप आणि भाजपच्या दिग्गज उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी सर्वच पक्षांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.अलिबाग विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे महेंद्र दळवी, काँग्रेसकडून राजेंद्र ठाकूर, पेणमधून महायुतीचे रवींद्र पाटील, कर्जत आघाडीकडून सुरेश लाड, श्रीवर्धनमधून महायुतीचे विनोद घोसाळकर, आघाडीकडून अदिती तटकरे, महाड आघाडीकडून माणिक जगताप, पनवेलमध्ये महायुतीचे प्रशांत ठाकूर, उरणमध्ये शेकापकडून विवेक पाटील यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केले.अर्ज भरण्याची शेवटची तारीख ४ आॅक्टोबर आहे. त्यामुळे काही उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. प्रमुख पक्षातील दिग्गज उमेदवारांनी गुरु वारचा मुहूर्त साधून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात ३ आॅक्टोबरपर्यंत ५२ उमेदवारांनी ६२ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे बहुतांश लढतीचे चित्र स्पष्ट होत असले, तरी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची दिवशीच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.कर्जतमध्ये तीन अर्ज दाखलकर्जत : १८९ कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये २७ सप्टेंबर ते ३ आॅक्टोबरपर्यंत चार उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. गुरु वारी तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. निवडणूक कार्यालयातून २७ सप्टेंबर ते ३ आॅक्टोबरपर्यंत ४४ अर्ज घेऊन जाण्यात आले आहेत. मात्र, प्रत्यक्षात गुरु वारपर्यंत चार उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. १ आॅक्टोबर रोजी कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने अ‍ॅड. गोपाळ गुंजा शेळके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. गुरु वार, ३ आॅक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष व समविचारी पक्षाच्या महाआघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विद्यमान आमदार सुरेश नारायण लाड, बहुजन समाज पार्टी (बसपा) सुरेश चिंतामण गायकवाड आणि जनहित लोकशाही पार्टीच्या वतीने किशोर नारायण शितोळे यांनी गुरु वारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली परदेशी-ठाकूर यांनी दिली.पनवेलमध्ये आठ उमेदवारी अर्जपनवेल : पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये गुरुवारी आठ नामनिर्देशन अर्ज सादर करण्यात आले. अद्यापपर्यंत ३५ नामनिर्देशित पत्रांचे वाटप झाले असून एकूण दहा उमेदवारी अर्ज पनवेल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहेत. दाखल केलेल्या अर्जामध्ये भाजपच्या वतीने प्रशांत ठाकूर, अरुण भगत, हरेश केणी, संजय चौधरी, कांतीलाल कडू यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (कांबळे) श्याम डिंगळे, इंडियन नॅशनल परिवर्तन पार्टीच्या वतीने राजीव सिन्हा आदीनी उमेदवारी अर्ज पनवेल येथील प्रांत कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे भरले आहेत. शनिवारी अर्जाची छाननी होणार असून सोमवार, ७ आॅक्टोबर रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. पनवेल विधानसभा निवडणुकीसाठी यापूर्वी दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून, गुरुवारी आठ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असल्याने उमेदवारी अर्जाची संख्या दहावर गेली आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Raigadरायगड