शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगड पोलीस मुख्यालयात उत्साहात संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2018 14:54 IST

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 58 वा वर्धापन दिनाचा रायगड जिल्हास्तरीय मुख्य शासकीय समारंभ मंगळवारी सकाळी अलिबाग येथील जिल्हा पोलीस परेड मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभात राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्नज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्नी तथा जिल्ह्याचे पालकमंत्नी  रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते  ध्वजवंदन करण्यात आले.

- जयंत धुळप 

मुंबई - महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 58 वा वर्धापन दिनाचा रायगड जिल्हास्तरीय मुख्य शासकीय समारंभ मंगळवारी सकाळी अलिबाग येथील जिल्हा पोलीस परेड मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभात राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्नज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्नी तथा जिल्ह्याचे पालकमंत्नी  रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते  ध्वजवंदन करण्यात आले.

 या सोहळ्याला जिल्हा परिषद अध्यक्ष आदिती तटकरे, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, जिल्हा पोलीस अधिक्षक  अनिल पारसकर, अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, अपर पोलीस अधिक्षक संजय पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, उपविभागीय अधिकारी सर्जेराव सोनवणो, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, उपजिल्हाधिकारी भूसंपादन विश्वनाथ वेटकोळी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शेषराव बढे, तसेच स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. लगेचच राष्ट्रगीत होऊन राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. त्यानंतर चव्हाण यांनी निरीक्षण वाहनातून परेडचे निरीक्षण केले. पालकमंत्र्यांना पोलीस दल व अन्य दलांनी मानवंदना दिली. यावेळी परेड कमांडंट भास्कर महादेव शेंडे यांच्या नेतृत्वात झालेल्या शानदार संचलनात पोलीस दल, होमगार्ड, वज्र पथक, अग्निशामक दल, नागरी संरक्षण दल, श्वान पथक, बॉम्ब शोध व नाश पथक आदी पथकांनी सहभाग दिला. पोलीस बॅन्डच्या सुरावर  तालबद्ध संचलनाने उपस्थितांची मने जिंकली. या सोहळ्यास सर्व सन्माननीय स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, माजी सैनिक, सामाजिक राजकीय कार्यकर्ते, शासकीय अधिकारी-कर्मचारी,नागरिक आदी उपस्थित होते. या सोहळ्याचे सूत्नसंचालन किरण करंदीकर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

महाराष्ट्र दिनाच्या 58 व्या  वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करु न राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. या समारंभास निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, उपविभागीय अधिकारी सर्जेराव सोनवणो, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, उपजिल्हाधिकारी भूसंपादन विश्वनाथ वेटकोळी तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी   पोलीस बँड पथकाने राष्ट्रगीत सादर केले.  यावेळी सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच  नागरिक उपस्थित होते. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी  उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :Maharashtra Dayमहाराष्ट्र दिनRaigadरायगडMaharashtraमहाराष्ट्र