शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

Talai Landslide: तळीयेमध्ये काल दुपारी ४ वाजता दरड कोसळली, मदत आज पोहोचली, असं का? कोण काय म्हणालं वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 14:50 IST

Talai Landslide: महाडमधील तळीये गावात दरड कोसळून अनेक कुटुंब दरडीखाली गाडली गेली आहेत. आतापर्यंत दरडीतून ३५ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

Talai Landslide: महाडमधील तळीये गावात दरड कोसळून अनेक कुटुंब दरडीखाली गाडली गेली आहेत. आतापर्यंत दरडीतून ३५ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. पण ही दुर्घटना काल म्हणजेच २२ जुलैच्या दुपारी ४ वाजता घडल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर विरोधकांनी स्थानिक प्रशासन आणि राज्य सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. सध्याच्या घडीला एनडीआरएफ आणि इतर बचाव कार्याची पथकं घटनास्थळी दाखल असून बचाव कार्य सुरू आहे. पण आज दुपारी १ वाजता एनडीआरएफची तुकडी घटनास्थळावर दाखल झाल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली. प्रवीण दरेकर स्वत: घटनास्थळावर उपस्थित असून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. 

नेमकं काय घडलं?महाड तालुक्यातील तळीये हे डोंगर कपारीमध्ये वसलेलं गाव आहे. कालपासूनच्या मुसळधार पावसामुळे काल दुपारी चार वाजता तळीये गावावर दरड कोसळली. यात गावातील ३५ कुटुंब दरडीखाली आल्याची माहिती समोर आली आहे. 

दरम्यान, संपूर्ण महाडमध्ये पावसाचं पाणी साचल्यानं एनडीआरएफच्या जवानांना घटनास्थळावर पोहोचण्यास अडचणी येत होत्या. रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 

"तळीये गावात दरड कोसळल्याची दुर्घटना काल दुपारी चारच्या सुमारास घडली आहे. पण संपूर्ण तालुक्यात मुसळधार पावसामुळे जवळपास १० ते १२ फूट पाणी साचलं होतं. संपर्क पूर्णपणे तुटला होता. कुणाशीच संपर्क साधता येत नव्हता. तळीयेकडे येणारे सर्व मार्ग बंद होते. तिथं जाणाऱ्या मार्गांवर १० ते १२ फूट पाणी आणि घाटमार्गे जायचं म्हटलं तर अनेक ठिकाणी दरड कोसळली होती. त्यामुळे रस्तेमार्ग पूर्णपणे बंद झाले होते. अखेर दरड वगैरे बाजूला सारून अखेर एनडीआरएफची पथकं इथं दाखल झाली आहेत", अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली. 

प्रवीण दरेकर घटनास्थळी पोहोचले, अधिकाऱ्यांना फैलावर घेतलंतळीये गावातील दुर्घटनेची माहिती मिळताच विधान परिषदेचे विरोक्षी पक्षनेते प्रवीण दरेकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांना गावकऱ्यांकडून घटनेची संपूर्ण माहिती घेतली. गावकऱ्यांनीच बचावकार्य करुन अनेक मृतदेह बाहेर काढल्याची माहिती गावकऱ्यांनी यावेळी दिली. दरेकरांसोबत भाजप नेते गिरीश महाजन देखील घटनास्थळी दाखल झाले. 

"आम्ही जर याठिकाणी पोहोचू शकतो, तर मग अधिकारी का पोहोचू शकले नाहीत. हा अतिशय वाईट प्रकार आहे. स्थानिक पातळीवरच्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन काम करायला हवं. अशाप्रकारचं अक्षम्य दुर्लक्ष याआधी मी कधी पाहिलेलं नाही. लोकांची परिस्थिती अतिशय वाईट आहे. गावकऱ्यांनाच मृतदेह बाहेर काढावे लागले आहेत", असा आरोप गिरीश महाजन यांनी यावेळी केला. 

मदत कार्यला उशीर का झाला?तळीये गावावर दरड कोसळली तेव्हा संपूर्ण महाडमध्ये तुफान पाऊस सुरू होता. अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. तर तळीयेकडे येणाऱ्या मार्गांवर दरडी कोसळल्या होत्या. प्रशासनाच्या कोणत्याही मदतीशिवाय बचावकार्य करणं अशक्य होतं. तरीही गावकऱ्यांनी मिळून बचावकार्य केलं. आज पाणी ओसरल्यानंतर एनडीआरएफची टीम आणि अधिकारी दाखल झाले. 

"काल संपूर्ण दिवसभर मुसळधार पाऊस होता. त्यामुळे मदत कार्याला अडथळा येत होता. संध्याकाळच्या सुमारास हेलिकॉप्टरनं ऑपरेशन शक्य नव्हतं. रस्तेही सर्व बंद होते. अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. पावसानं आज उसंत घेतल्यानं पाणी ओसरलं, तसंच दरडी बाजूला सारण्याचं काम करण्यात आलं. त्यानंतर एनडीआरएफ आणि कोस्ट गार्डची पथकं घटनास्थळी बचावकार्य करत आहेत", अशी माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे. 

टॅग्स :RaigadरायगडRainपाऊसlandslidesभूस्खलन