शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

Talai Landslide: तळीयेमध्ये काल दुपारी ४ वाजता दरड कोसळली, मदत आज पोहोचली, असं का? कोण काय म्हणालं वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 14:50 IST

Talai Landslide: महाडमधील तळीये गावात दरड कोसळून अनेक कुटुंब दरडीखाली गाडली गेली आहेत. आतापर्यंत दरडीतून ३५ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

Talai Landslide: महाडमधील तळीये गावात दरड कोसळून अनेक कुटुंब दरडीखाली गाडली गेली आहेत. आतापर्यंत दरडीतून ३५ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. पण ही दुर्घटना काल म्हणजेच २२ जुलैच्या दुपारी ४ वाजता घडल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर विरोधकांनी स्थानिक प्रशासन आणि राज्य सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. सध्याच्या घडीला एनडीआरएफ आणि इतर बचाव कार्याची पथकं घटनास्थळी दाखल असून बचाव कार्य सुरू आहे. पण आज दुपारी १ वाजता एनडीआरएफची तुकडी घटनास्थळावर दाखल झाल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली. प्रवीण दरेकर स्वत: घटनास्थळावर उपस्थित असून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. 

नेमकं काय घडलं?महाड तालुक्यातील तळीये हे डोंगर कपारीमध्ये वसलेलं गाव आहे. कालपासूनच्या मुसळधार पावसामुळे काल दुपारी चार वाजता तळीये गावावर दरड कोसळली. यात गावातील ३५ कुटुंब दरडीखाली आल्याची माहिती समोर आली आहे. 

दरम्यान, संपूर्ण महाडमध्ये पावसाचं पाणी साचल्यानं एनडीआरएफच्या जवानांना घटनास्थळावर पोहोचण्यास अडचणी येत होत्या. रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 

"तळीये गावात दरड कोसळल्याची दुर्घटना काल दुपारी चारच्या सुमारास घडली आहे. पण संपूर्ण तालुक्यात मुसळधार पावसामुळे जवळपास १० ते १२ फूट पाणी साचलं होतं. संपर्क पूर्णपणे तुटला होता. कुणाशीच संपर्क साधता येत नव्हता. तळीयेकडे येणारे सर्व मार्ग बंद होते. तिथं जाणाऱ्या मार्गांवर १० ते १२ फूट पाणी आणि घाटमार्गे जायचं म्हटलं तर अनेक ठिकाणी दरड कोसळली होती. त्यामुळे रस्तेमार्ग पूर्णपणे बंद झाले होते. अखेर दरड वगैरे बाजूला सारून अखेर एनडीआरएफची पथकं इथं दाखल झाली आहेत", अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली. 

प्रवीण दरेकर घटनास्थळी पोहोचले, अधिकाऱ्यांना फैलावर घेतलंतळीये गावातील दुर्घटनेची माहिती मिळताच विधान परिषदेचे विरोक्षी पक्षनेते प्रवीण दरेकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांना गावकऱ्यांकडून घटनेची संपूर्ण माहिती घेतली. गावकऱ्यांनीच बचावकार्य करुन अनेक मृतदेह बाहेर काढल्याची माहिती गावकऱ्यांनी यावेळी दिली. दरेकरांसोबत भाजप नेते गिरीश महाजन देखील घटनास्थळी दाखल झाले. 

"आम्ही जर याठिकाणी पोहोचू शकतो, तर मग अधिकारी का पोहोचू शकले नाहीत. हा अतिशय वाईट प्रकार आहे. स्थानिक पातळीवरच्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन काम करायला हवं. अशाप्रकारचं अक्षम्य दुर्लक्ष याआधी मी कधी पाहिलेलं नाही. लोकांची परिस्थिती अतिशय वाईट आहे. गावकऱ्यांनाच मृतदेह बाहेर काढावे लागले आहेत", असा आरोप गिरीश महाजन यांनी यावेळी केला. 

मदत कार्यला उशीर का झाला?तळीये गावावर दरड कोसळली तेव्हा संपूर्ण महाडमध्ये तुफान पाऊस सुरू होता. अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. तर तळीयेकडे येणाऱ्या मार्गांवर दरडी कोसळल्या होत्या. प्रशासनाच्या कोणत्याही मदतीशिवाय बचावकार्य करणं अशक्य होतं. तरीही गावकऱ्यांनी मिळून बचावकार्य केलं. आज पाणी ओसरल्यानंतर एनडीआरएफची टीम आणि अधिकारी दाखल झाले. 

"काल संपूर्ण दिवसभर मुसळधार पाऊस होता. त्यामुळे मदत कार्याला अडथळा येत होता. संध्याकाळच्या सुमारास हेलिकॉप्टरनं ऑपरेशन शक्य नव्हतं. रस्तेही सर्व बंद होते. अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. पावसानं आज उसंत घेतल्यानं पाणी ओसरलं, तसंच दरडी बाजूला सारण्याचं काम करण्यात आलं. त्यानंतर एनडीआरएफ आणि कोस्ट गार्डची पथकं घटनास्थळी बचावकार्य करत आहेत", अशी माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे. 

टॅग्स :RaigadरायगडRainपाऊसlandslidesभूस्खलन