शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
2
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
3
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
4
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
5
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
6
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
7
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
8
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
9
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
10
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
11
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला
12
Pune Crime: विजयने ११व्या मजल्यावरून मारली उडी, ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना
13
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
14
महाराष्ट्रातल्या मनगटात इतका दम आहे म्हणून.., प्रणित मोरेची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकला डीपी
15
"मला स्वातंत्र्य हवंय"; बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने काढला नवऱ्याचा काटा, लोकेशन सांगितलं अन्...
16
TATA Motors ला ₹२,३८,६१,६६,००,००० चं मोठं नुकसान! JLR वर सायबर हल्ला; उत्पादन थांबलं, शेअर्समध्ये मोठी घसरण
17
हृदयद्रावक! नवरात्रीत मोठी दुर्घटना; देवीच्या मंडपात अचानक पसरला करंट; २ मुलांचा मृत्यू
18
मूलबाळ नसलेल्या हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती कुणाला मिळणार?; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
19
३०० पानांमध्ये लिहिलेत बाबाचे काळे कारनामे; इंस्टिट्यूटमध्ये होता टॉर्चर चेंबर! दिल्लीत खळबळ
20
GST मध्ये आणखी कपातीचे पंतप्रधान मोदींचे संकेत; म्हणाले, "आम्ही इकडेच थांबवणार नाही..."

Mahad Flood: पूर ओसरला आता नवं संकट! महाभयंकर साथ राेगांचा फैलाव हाेण्याती भीती, २६ रुग्ण आढळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 19:51 IST

Mahad Flood: महाडमध्ये अतिवृष्टीने सावित्री नदीला आलेल्या महापुराचे विपरीत पडसाद पुर आेसरल्या नंतर सुरु झाले आहेत. महाडमध्ये आतापर्यंत 12 हजार 931 जणांची आराेग्य तपासणी करण्यात आली आहे

आविष्कार देसाईलाेकमत न्यूज नेटवर्करायगड ः महाडमध्ये अतिवृष्टीने सावित्री नदीला आलेल्या महापुराचे विपरीत पडसाद पुर आेसरल्या नंतर सुरु झाले आहेत. महाडमध्ये आतापर्यंत 12 हजार 931 जणांची आराेग्य तपासणी करण्यात आली आहे, तर 380 नागरिकांची अॅन्टीजन चाचणी करण्यात आली. त्यामध्ये लेप्टोपायरोसिसचे 19, काेराेनाचे तीन, डेंग्यु आणि मलेरियाचे प्रत्येकी दाेन असे एकूण 26 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाड तालुक्यात महाभयंकर साथ राेगांचा फैलाव हाेण्याची भीती व्यक्त केली जात आहे.महाड आणि पाेलादपूर मध्ये अतिवृष्टीने पुर, दरडी काेसळल्या हाेत्या.  महाड-तळीये मध्ये दरड काेसळल्याने 84  नागरिक डाेंगराच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. पैकी 53 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले उर्वरीत 31 जणांना मृत घाेषित करण्याचा प्रस्ताव सरकार दरबारी आहे. तसेच पाेलादपूर-केवनाळे आणि सुतारवाडी येथेही 11 जणांचा दरडीखाली गुदमरुन मृत्यू झाला. त्याचवेळी महाडमध्ये अतिवृष्टीने सावित्रीला महापुर आला. तब्बल 15 फुटाहून अधिक पाणी हाेते.महापुरात नागरिकांनी आपले प्राण वाचवले. आता महापुर आेसरला आहे. परंतू शहरासह अन्य भागांमध्ये प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे लवकर लवकर स्वच्छता करण्याचे आव्हान सरकार आणि प्रशासना पुढे आहे. स्वच्छता करण्याचे काम युध्द पातळीवर सुरु झाले आहे.राेगराई पसरु नये यासाठी विविध ठिकाणची 18 वैद्यकीय पथक महाडमध्ये तैनात करण्यात आली आहेत. त्यांच्यामार्फत आतापर्यंत तब्बल 12 हजार 931 नागरिकांची आराेग्य तपासणी करण्यात आली आहे. तसेच एक हजार 416 जणांना टिटीचे इंजेक्शन देण्यात आले आहे. जिल्ह्यातील काेराेनाचा प्रार्दुभाव थांबलेला नाही. त्यामुळे 380 नागरिकांची अॅन्टीजन चाचणी करण्यात आली. त्यामध्ये तीन जणांना काेराेनाची लागण झाल्याचे समाेर आले आहे.लॅप्टाेपायरसिसचे 19 रुग्ण सापडले आहेत, तर डेंग्यु आणि मलेरियाचे प्रत्येकी दाेन असे एकूण 26 रुग्ण सापडले आहेत,अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चाैधरी यांनी दिली.महाड, पाेलादपूरमध्ये साथ राेगांचा फैलाव हाेऊ नये यासाठी आराेग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने स्वच्छता करण्यात येत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.महाडमध्ये सध्या नागरिकांचे जीवनमान पुर्वपदावर येत आहे. पुरात उघड्यावर पडलेला संसार वेचण्यात नागरिक अद्यापही गुंतलेले आहेत. अशा विचित्र परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी नागरिक काेराेना नियमांचे पालन कसे करणार असा प्रश्न आहे. दरम्यान, हाडमधील नागरिकांचा संसार उभा करतानाच या ठिकाणी साथराेग पसरु नये यासाठी सरकार आणि प्रशासनाला कठाेर मेहनत घ्यावी लागणार आहे.

टॅग्स :RaigadरायगडRainपाऊस