शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

Mahad Flood: पूर ओसरला आता नवं संकट! महाभयंकर साथ राेगांचा फैलाव हाेण्याती भीती, २६ रुग्ण आढळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 19:51 IST

Mahad Flood: महाडमध्ये अतिवृष्टीने सावित्री नदीला आलेल्या महापुराचे विपरीत पडसाद पुर आेसरल्या नंतर सुरु झाले आहेत. महाडमध्ये आतापर्यंत 12 हजार 931 जणांची आराेग्य तपासणी करण्यात आली आहे

आविष्कार देसाईलाेकमत न्यूज नेटवर्करायगड ः महाडमध्ये अतिवृष्टीने सावित्री नदीला आलेल्या महापुराचे विपरीत पडसाद पुर आेसरल्या नंतर सुरु झाले आहेत. महाडमध्ये आतापर्यंत 12 हजार 931 जणांची आराेग्य तपासणी करण्यात आली आहे, तर 380 नागरिकांची अॅन्टीजन चाचणी करण्यात आली. त्यामध्ये लेप्टोपायरोसिसचे 19, काेराेनाचे तीन, डेंग्यु आणि मलेरियाचे प्रत्येकी दाेन असे एकूण 26 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाड तालुक्यात महाभयंकर साथ राेगांचा फैलाव हाेण्याची भीती व्यक्त केली जात आहे.महाड आणि पाेलादपूर मध्ये अतिवृष्टीने पुर, दरडी काेसळल्या हाेत्या.  महाड-तळीये मध्ये दरड काेसळल्याने 84  नागरिक डाेंगराच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. पैकी 53 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले उर्वरीत 31 जणांना मृत घाेषित करण्याचा प्रस्ताव सरकार दरबारी आहे. तसेच पाेलादपूर-केवनाळे आणि सुतारवाडी येथेही 11 जणांचा दरडीखाली गुदमरुन मृत्यू झाला. त्याचवेळी महाडमध्ये अतिवृष्टीने सावित्रीला महापुर आला. तब्बल 15 फुटाहून अधिक पाणी हाेते.महापुरात नागरिकांनी आपले प्राण वाचवले. आता महापुर आेसरला आहे. परंतू शहरासह अन्य भागांमध्ये प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे लवकर लवकर स्वच्छता करण्याचे आव्हान सरकार आणि प्रशासना पुढे आहे. स्वच्छता करण्याचे काम युध्द पातळीवर सुरु झाले आहे.राेगराई पसरु नये यासाठी विविध ठिकाणची 18 वैद्यकीय पथक महाडमध्ये तैनात करण्यात आली आहेत. त्यांच्यामार्फत आतापर्यंत तब्बल 12 हजार 931 नागरिकांची आराेग्य तपासणी करण्यात आली आहे. तसेच एक हजार 416 जणांना टिटीचे इंजेक्शन देण्यात आले आहे. जिल्ह्यातील काेराेनाचा प्रार्दुभाव थांबलेला नाही. त्यामुळे 380 नागरिकांची अॅन्टीजन चाचणी करण्यात आली. त्यामध्ये तीन जणांना काेराेनाची लागण झाल्याचे समाेर आले आहे.लॅप्टाेपायरसिसचे 19 रुग्ण सापडले आहेत, तर डेंग्यु आणि मलेरियाचे प्रत्येकी दाेन असे एकूण 26 रुग्ण सापडले आहेत,अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चाैधरी यांनी दिली.महाड, पाेलादपूरमध्ये साथ राेगांचा फैलाव हाेऊ नये यासाठी आराेग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने स्वच्छता करण्यात येत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.महाडमध्ये सध्या नागरिकांचे जीवनमान पुर्वपदावर येत आहे. पुरात उघड्यावर पडलेला संसार वेचण्यात नागरिक अद्यापही गुंतलेले आहेत. अशा विचित्र परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी नागरिक काेराेना नियमांचे पालन कसे करणार असा प्रश्न आहे. दरम्यान, हाडमधील नागरिकांचा संसार उभा करतानाच या ठिकाणी साथराेग पसरु नये यासाठी सरकार आणि प्रशासनाला कठाेर मेहनत घ्यावी लागणार आहे.

टॅग्स :RaigadरायगडRainपाऊस