शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

ग्रामीण भागात किराणा दुकानदारांकडून लूट, चढ्या दरात जीवनावश्यक वस्तूंची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 01:45 IST

रोजचा स्वयंपाक करताना लागणाऱ्या गरजेच्या वस्तू, कडधान्ये, डाळी, मसाले, तेल, भाजीपाला, चढ्या दरात विक्री करत आहेत. अवाच्या सव्वा रक्कम घेत असल्याने ग्राहक संतापले आहेत.

नेरळ : कर्जत तालुक्यात शहरी तसेच ग्रामीण भागात ही किरकोळ किराणा दुकानदार, व्यापारी मालाच्या कमतरतेचे कारण सांगत जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत भरमसाट वाढ करून ग्राहकांना लुटत आहेत. रोजचा स्वयंपाक करताना लागणाऱ्या गरजेच्या वस्तू, कडधान्ये, डाळी, मसाले, तेल, भाजीपाला, चढ्या दरात विक्री करत आहेत. अवाच्या सव्वा रक्कम घेत असल्याने ग्राहक संतापले आहेत.वर्षानुवर्षे याच सर्वसामान्य ग्राहकराजाच्या जीवावर आपला व्यवसाय करून संपत्ती कमावलेल्या दुकानदार, व्यापारी या संकटसमयी ग्राहकांची लूट करताना दिसत आहेत, सरकारच्या सूचनांना धाब्यावर बसवून चढ्या दराने मालाची विक्री करत आहेत. ‘परवडत असेल तर घ्या... नाही तर घरी जा...’ असे शब्दही ग्राहकांना ऐकावे लागत असल्याचे विदारक चित्र दिसून येते. नाइलाजाने पोटाची भूक भागवण्याकरता चार वस्तूंसाठी आणलेल्या पैशात एक- दोन वस्तू घेऊन घरी परतावे लागत आहे .कर्जत तालुक्यात अनेक सेवाभावी संस्थांनी, दानशूरांनी आपापल्या परीने तालुक्यातील आदिवासी भागात मदत पोहोचवली आहे. मात्र इतर समाजातील सर्वसामान्य लोकांना गरज असूनही केवळ प्रतिष्ठा जपण्यासाठी हे लोक मदत स्वीकारायला पुढे येत नाहीत म्हणा किंवा मदत करणाºयाचा कल आदिवासी समाज बांधवांकडे जास्त दिसून येतो. त्यामुळे इतर मध्यमवर्गीय लोकांना मदतीची गरज असल्याचे जाणवते.>सामान्यांची कोंडीतालुक्यातील ग्रामीण भागात दुकानदारांकडून किराणा सामानाचे भाव अवाच्या सव्वा वाढवण्यात आले आहेत, परिणामी सर्वसामन्यांची या लॉकडाउनच्या काळात कोंडी होत आहे. या संकटाच्या वेळी ग्राहकांची होणारी लूट थांबविण्यासाठी प्रशासनाने काही कारवाई करणे आवश्यक आहे, अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांकडून केली जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस