शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Lockdown News: वेणगावमधील तरुणांच्या पुढाकाराने श्रमदानातून सुटला पाणीप्रश्न; लॉकडाउनमध्ये केलं काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 23:39 IST

सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून काम पूर्ण

संजय गायकवाड

कर्जत : तालुक्यातील वेणगावमधील तरुणांनी लॉकडाउनचा सदुपयोग करून २५ दिवसांच्या कालावधीत श्रमदान करून पाणी वेणगावपर्यंत आणले आहे. आता या गावातील पाण्याचा प्रश्न दूर झाला आहे. सर्वच गोष्टीसाठी शासनावर अवलंबून न राहता मनाच्या जिद्दीवर, एकीने आणि सर्वांच्या श्रमदानातून हे शक्य आहे. या कामावरून या तरुणांनी सर्वांना दाखवून दिले आहे. या वेळी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करण्यात आले.

कर्जत तालुक्याला लाभलेले वरदान म्हणून राजनाला कालव्याचे नाव आहे. या कालव्याच्या पाण्यावर उन्हाळी भातशेती किंवा कडधान्य पिकवली जातात, हे पाणी पूर्वी कर्जत नगरपरिषद क्षेत्राजवळील काही गावापर्यंत येत होते. कालांतराने छोटे कालवे मातीने बंद झाले आणि कालव्याच्या पाण्यावर सिंचन होणारे क्षेत्र कमी कमी होत गेले. याकडे मग शासनाबरोबर नागरिकांचे दुर्लक्ष झाले. वेणगाव हे रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सुमारे दोन ते अडीच हजार वस्ती असलेले गाव बोरिंग वगळता पाण्यासाठी अन्य कोणताही नैसर्गिक स्रोत नाही. १० -१२ वर्षांपूर्वी टाटा पॉवर हाउसचे पाणी गावातील छोट्याशा बंधाऱ्याला आडवून ते मार्च, एप्रिलपर्यंत पाणी असायचे. राजनाला कालव्याची दुरुस्ती सुरू झाल्यानंतर पाणी येणे बंद झाले. पाणी उपलब्ध नसतानासुद्धा खोल बोरवेल मारून इमारती उभ्या राहिल्या. परिणामी, फेब्रुवारी महिन्यातच बोरवेल कोरड्या पडू लागल्या. अशातच करोनामुळे लॉकडाउन सुरू झाले. गावातील काही तरुणाच्या मनात १० ते १२ वर्षांपूर्वी लुप्त झालेला नाला पुन्हा बंधाºयापर्यंत आणता येईल का? याबाबत विचार सुरू झाला. त्याला ग्रामपंचायत सरपंच अभिषेक गायकर यांचीही साथ मिळाली.

साधन सामग्री फारशी नाही त्यामुळे वर्गणी काढून, कधी रात्रंदिवस स्वत: हातात फावडे, कुदळ घेऊन, कधी अति आवश्यकता असेल तर जेसीबी घेऊन, नाला सफाईला सुरुवात झाली. सरपंच अभिषेक गायकर, शशी गंभीर, उदय आवारी, चेतन शेलार, राजा बोराडे, समीर बोराडे, नरेंद्र पवार, भाऊ म्हसकर, हेमंत बडेकर, संजय पालकर, गणपत बोराडे, संतोष पालकर, चंद्रकांत तिखंडे, स्वप्निल मुंढे, उमेश जोशी, राहुल जोशी, ऋषीकेश दातार, विशाल जोशी, विशाल गोगटे, तुषार जोशी अशा अनेक सहकारी यांनी ही मोहीम यशस्वी केली.तरुणांचे कौतुकहाती कमी दिवस होते नंतर नाल्याचे पाणी बंद होणार होते. साथी हात बढाना म्हणत अखेर गंगा अवतरली आणि बंधारा भरला. ३० दिवसांपेक्षा कमी दिवसांत सुमारे २.५ किलोमीटर नाला साफ झाला. लॉकडाउनचा असा सदुपयोग केल्याबद्धल सर्व तरुणाचेअभिनंदन होत आहे.

कुशीवली ते वेणगाव असा अडीच किलोमीटर हा नाला साफ झाला त्यामुळे पाणी वेणगावपर्यंत आले आहे. वेणगावजवळ धरणवजा बंधाºयात हे पाणी साठले आहे. आता या पाण्याच्या साठ्यामुळे गावातील बोरवेलच्या पाण्याची पातळी वाढेल, तसेच उन्हाळ्याच्या दिवसात प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस