शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे मुरुड तालुक्यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 00:23 IST

कोरोनामुळे निराशा : व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्क मुरूड जंजीरा : रायगड जिल्ह्याला ३२० किलोमीटरचा सागरकिनारा लाभला आहे. जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील दिवेगार, हरिहरेश्वर, बागमांडला, मुरुड येथील सुप्रसिद्ध जंजिरा किल्ला, काशीद समुद्रकिनारा, अलिबाग येथील कुलाबा किल्ला, किहीम बिच, ऐतिहासिक स्थळे अशी अनेक ठिकाणे पर्यटकांना नेहमीच आवडतात.  संचारबंदी व लॉकडाऊनमुळे या पर्यटनस्थळांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून, या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

मुरुड तालुक्यात काशीद समुद्रकिनारा, मुरुड समुद्रकिनारा, ऐतिहासिक जंजिरा किल्ला पद्मदुर्ग किल्ला, फणसाड अभयारण्य, नवाबकालीन गारंबी धरण अशी महत्त्वाची प्रेक्षणीय स्थळे आहेत. मागील वर्षी केंद्राचा लॉकडाऊन तर आता राज्य शासनाचा लॉकडाऊन त्यामुळे पर्यटकांवर निर्भर असलेल्या तालुक्याची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. हॉटेल,लॉजिंग तर सुनेसुने झाले आहेत. घोडागाडी व्यवसाय करणारे, वॉटर स्पोर्ट सर्व जण घरात बसून असून  १५ दिवसाचा लॉकडाऊन संपण्याची वाट पाहत आहेत. एकेकाळी पर्यटकांची वर्दळ असणारा हा तालुका आता मात्र खूप उदास वाटत आहे. सर्वच घटकाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. 

जंजिरा किल्ला पाहण्यासाठी मोठी गर्दी पहावयास मिळायची. सलग सुट्ट्यांमध्ये एका दिवसात २५ हजारपेक्षा जास्त पर्यटक यायचे. परंतु सध्या येथे कुणीच फिरकत नसल्याने असंख्य शिडाच्या बोटी, मशीनवाल्या बोटी किनाऱ्याला लागल्या आहेत. जंजिरा किल्ल्यापासून सुमारे २५० लोकांना रोजगार मिळत होता आता हा व्यवसाय पूर्णतः बंद झाल्याने लोक फार चिंतेत दिसत आहेत. जंजिरा किल्ल्याच्या बाजूला असणारी टोपी, गॉगल्स, शहाळी विक्रेते, चहाची टपरी, सरबत स्टॉल आदी सर्वच दुकाने बंद झाल्याने या लोकांचासुद्धा मोठा रोजगार बुडाला आहे. सातत्याने दोन वर्षांत सर्वात मोठा लॉकडाऊन झाल्याने लोक मेटाकुटीस आले असून, लॉकडाऊन नकोच अशी मागणी करीत आहेत. परंतु शासनाच्या नियमामुळे लोकसुद्धा , हतबल झाले आहेत. 

मुरुड तालुक्यातील बहुतांश लोकांनी बँक लोन घेऊन आपली हॉटेल्स अथवा लॉजिंग थाटली आहेत. अशावेळी सर्व लोकांना बँकेचे व्याज व हप्ता भरताना मोठी दमछाक होत आहे.या तालुक्यातील लोक संचारबंदी व लॉकडाऊनमुळे मोठ्या आर्थिक समस्येत असून, येणारा भावी काळच त्यांना या जोखडातून मुक्त करेल अशी अपेक्षा सर्व व्यापारी बाळगून आहेत. राज्य शासनाने लॉकडाऊन व संचारबंदी लागू केल्यामुळे १ मार्चपासून येथे पर्यटक येणे बंद केले आहे.त्यामुळे सर्व शिडांच्या बोटी व मशीन बोटीचा व्यवसाय ठप्प झाला आहे. - जावेद कारभारी, चेअरमन, वेलकम सोसायटी 

पर्यटक बाहेर पडणे टाळत आहेत. आमच्याकडे  १  मार्च २०२१  पासून विविध भागात संचारबंदी झाल्याने पर्यटक कमी झाले आहेत. आमच्याकडे १०  रूम असून कुणीही पर्यटक फिरकत नसल्याने गेल्या अनेक दिवसांपासून रिकाम्या असून कोणताही व्यवसाय होत नाही. लॉकडाऊनमुळे धंद्याला खीळ बसली असून, बँकेचे हप्ते व व्याज याचे गणित बांधणे खूप कठीण झाले आहे. -मनोहर बैले, हॉटेल मालक

समुद्रकिनारी ५४ टपऱ्या आहेत. या टपऱ्यांमधून चहा, अल्पोपाहार, भोजन बनवून देणे अशा सुविधा पर्यटकांना दिल्या जातात. संचारबंदी व लॉकडाऊनमुळे पर्यटकांनी येथे येणे बंद केल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. ३ जूनच्या चक्रीवादळात सर्व टपऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. कर्ज काढून लोकांनी आपल्या गाड्या बनून घेतल्या होत्या; परंतु अचानक पर्यटक थांबल्याने टपरीधारकांच्या कुटुंबाची अवस्था बिकट झाली आहे. अरविंद गायकर, अध्यक्ष, पद्मदुर्ग कल्याणकारी संघटना