शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
2
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
3
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
4
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
5
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
6
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
7
उपविभागीय दंडाधिकाऱ्याने पत्नी आणि मुलांना काढलं घराबाहेर, वणवण भटकण्याची आली वेळ   
8
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्मू-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
9
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
10
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
11
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
12
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
13
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
14
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
15
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
16
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
17
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
18
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
19
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
20
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!

लॉकडाऊनमुळे मुरुड तालुक्यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 00:23 IST

कोरोनामुळे निराशा : व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्क मुरूड जंजीरा : रायगड जिल्ह्याला ३२० किलोमीटरचा सागरकिनारा लाभला आहे. जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील दिवेगार, हरिहरेश्वर, बागमांडला, मुरुड येथील सुप्रसिद्ध जंजिरा किल्ला, काशीद समुद्रकिनारा, अलिबाग येथील कुलाबा किल्ला, किहीम बिच, ऐतिहासिक स्थळे अशी अनेक ठिकाणे पर्यटकांना नेहमीच आवडतात.  संचारबंदी व लॉकडाऊनमुळे या पर्यटनस्थळांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून, या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

मुरुड तालुक्यात काशीद समुद्रकिनारा, मुरुड समुद्रकिनारा, ऐतिहासिक जंजिरा किल्ला पद्मदुर्ग किल्ला, फणसाड अभयारण्य, नवाबकालीन गारंबी धरण अशी महत्त्वाची प्रेक्षणीय स्थळे आहेत. मागील वर्षी केंद्राचा लॉकडाऊन तर आता राज्य शासनाचा लॉकडाऊन त्यामुळे पर्यटकांवर निर्भर असलेल्या तालुक्याची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. हॉटेल,लॉजिंग तर सुनेसुने झाले आहेत. घोडागाडी व्यवसाय करणारे, वॉटर स्पोर्ट सर्व जण घरात बसून असून  १५ दिवसाचा लॉकडाऊन संपण्याची वाट पाहत आहेत. एकेकाळी पर्यटकांची वर्दळ असणारा हा तालुका आता मात्र खूप उदास वाटत आहे. सर्वच घटकाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. 

जंजिरा किल्ला पाहण्यासाठी मोठी गर्दी पहावयास मिळायची. सलग सुट्ट्यांमध्ये एका दिवसात २५ हजारपेक्षा जास्त पर्यटक यायचे. परंतु सध्या येथे कुणीच फिरकत नसल्याने असंख्य शिडाच्या बोटी, मशीनवाल्या बोटी किनाऱ्याला लागल्या आहेत. जंजिरा किल्ल्यापासून सुमारे २५० लोकांना रोजगार मिळत होता आता हा व्यवसाय पूर्णतः बंद झाल्याने लोक फार चिंतेत दिसत आहेत. जंजिरा किल्ल्याच्या बाजूला असणारी टोपी, गॉगल्स, शहाळी विक्रेते, चहाची टपरी, सरबत स्टॉल आदी सर्वच दुकाने बंद झाल्याने या लोकांचासुद्धा मोठा रोजगार बुडाला आहे. सातत्याने दोन वर्षांत सर्वात मोठा लॉकडाऊन झाल्याने लोक मेटाकुटीस आले असून, लॉकडाऊन नकोच अशी मागणी करीत आहेत. परंतु शासनाच्या नियमामुळे लोकसुद्धा , हतबल झाले आहेत. 

मुरुड तालुक्यातील बहुतांश लोकांनी बँक लोन घेऊन आपली हॉटेल्स अथवा लॉजिंग थाटली आहेत. अशावेळी सर्व लोकांना बँकेचे व्याज व हप्ता भरताना मोठी दमछाक होत आहे.या तालुक्यातील लोक संचारबंदी व लॉकडाऊनमुळे मोठ्या आर्थिक समस्येत असून, येणारा भावी काळच त्यांना या जोखडातून मुक्त करेल अशी अपेक्षा सर्व व्यापारी बाळगून आहेत. राज्य शासनाने लॉकडाऊन व संचारबंदी लागू केल्यामुळे १ मार्चपासून येथे पर्यटक येणे बंद केले आहे.त्यामुळे सर्व शिडांच्या बोटी व मशीन बोटीचा व्यवसाय ठप्प झाला आहे. - जावेद कारभारी, चेअरमन, वेलकम सोसायटी 

पर्यटक बाहेर पडणे टाळत आहेत. आमच्याकडे  १  मार्च २०२१  पासून विविध भागात संचारबंदी झाल्याने पर्यटक कमी झाले आहेत. आमच्याकडे १०  रूम असून कुणीही पर्यटक फिरकत नसल्याने गेल्या अनेक दिवसांपासून रिकाम्या असून कोणताही व्यवसाय होत नाही. लॉकडाऊनमुळे धंद्याला खीळ बसली असून, बँकेचे हप्ते व व्याज याचे गणित बांधणे खूप कठीण झाले आहे. -मनोहर बैले, हॉटेल मालक

समुद्रकिनारी ५४ टपऱ्या आहेत. या टपऱ्यांमधून चहा, अल्पोपाहार, भोजन बनवून देणे अशा सुविधा पर्यटकांना दिल्या जातात. संचारबंदी व लॉकडाऊनमुळे पर्यटकांनी येथे येणे बंद केल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. ३ जूनच्या चक्रीवादळात सर्व टपऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. कर्ज काढून लोकांनी आपल्या गाड्या बनून घेतल्या होत्या; परंतु अचानक पर्यटक थांबल्याने टपरीधारकांच्या कुटुंबाची अवस्था बिकट झाली आहे. अरविंद गायकर, अध्यक्ष, पद्मदुर्ग कल्याणकारी संघटना