शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे बदलले कारखानदारांचे अर्थकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 01:29 IST

कारागिरांना फटका : सरकारच्या मूर्तींची उंची कमीच्या आदेशामुळे संभ्रम

निखिल म्हात्रे।अलिबाग : मागील वर्षी जिल्ह्यातील झालेली पूर परिस्थिती आणि या वर्षी कोरोनामुळे असलेले लॉकडाऊन आणि निसर्ग चक्रीवादळामुळे गणपती कारखानदारांच्या अर्थकरण बदलवून टाकले आहे. जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनाला नागरिकांनी पाठिंबा देत, मूर्तींची उंची कमी करून घेतली आहे. गणेशमूर्तींच्या कच्च्या मालासाठी खर्च झालेले पैसे वाया गेले आहेत. त्यामुळे मूर्तिकारांची आता अर्थिक गणिते बिघडलेली आहेत.

मोठ्या कारखान्यांमध्ये गणेशमूर्ती बनविण्याचे काम वर्षाच्या सुरुवातीलाच, म्हणजे जानेवारीतच सुरू होते. सुरु वातीला घरगुती गणेशमूर्ती बनवल्या जातात. होळी झाल्यानंतर गणेश मंडळांच्या मोठ्या गणेशमूर्ती बनविण्याच्या कामाला सुरुवात होते. यंदा याचदरम्यान या व्यवसायात विघ्न आले. कोरोनामुळे अवघा देश ‘लॉकडऊन’ झाला. पर्यायाने सर्वच व्यवसाय ठप्प होऊन गेले. त्याचा मोठा फटका गेले पाच महिने गणेशमूर्ती व्यवसायाला बसतो आहे. घरगुती गणेशमूर्तीचे काम जानेवारीपासून सुरू झाले. मात्र, गणेशमंडळांच्या मूर्तींचे काम सुरू होणार, तेवढ्यातच लॉकडाऊन झाल्याने हे कामच ठप्प झाले आहे. मूर्तींसाठी लागणारा कच्चा मालही येत नाही. त्यातच यंदा आजपर्यंत मोठ्या मूर्तीची आॅर्डरही न आल्याने मूर्तिकार चिंतेत पडले आहेत.यंदा कोरोनामुळे शासनाने सार्वजनिक गणेश मंडळांनी ४ फुटांची मूर्ती, तर घरगुती गणेशमूर्ती ही २ फुटांची असावी, असे आदेश काढल्यावर सगळेच संभ्रमात आहेत.यंदा एकही आॅर्डर नाही- सागर हजारेच्दरवर्षी आमच्या कारखान्यात १० ते ११ हजार घरगुती गणेशमूर्ती बनतात. मात्र, यंदा केवळ २ हजार गणेशमूर्ती बनविण्यात आल्या आहेत. कच्चा माल नाही, आॅर्डरही नाही. गणेशोत्सवाबाबत शासनाने अजूनही भूमिका न मांडल्याने मंडळांच्या आॅर्डर्स अजूनही आलेल्या नाहीत. आमच्या मूर्तिशाळेत दरवर्षी २००० मोठ्या मूर्ती असतात. यंदा मात्र, एकही आॅर्डर नाही, असे हमरापूर येथील कारखानदारसागर हजारे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.च्मोठे मूर्तिकार हे जानेवारीपासून मूर्ती घडविण्याच्या कामाला सुरुवात करतात. मात्र, छोटे मूर्तिकार हे वीटभट्टीचे काम संपले की, हे काम सुरू करतात. मात्र, त्यांचे मूर्ती घडविण्याचे काम सुरू होण्यापूर्वीच लॉकडाऊन झाले, त्यामुळे अजूनही त्यांच्या कामाला सुरु वात झालेली नाही. गेल्या दोन वर्षांत सारख्या आलेल्या आपत्तीमुळे आतोनात नुकसान झाले आहे. सरकारने गणपती कारखानदारांसाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Ganesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीRaigadरायगड