शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

अनुदान थकल्याने ग्रंथालयांची कोंडी; टाळेबंदीमुळे सहा महिने बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 00:39 IST

कर्मचाऱ्यांना वेतन नाही; उपासमारीची वेळ, ग्रंथालयांचा कारभार सुरळीत राहावा यासाठी राज्य सरकारकडून त्यांना वेतन आणि वेतनेतर अनुदान दिले जाते.

अलिबाग : नागरिकांना वाचण्यासाठी संधी उपलब्ध करून देणाऱ्या ग्रंथालये आणि कर्मचारी यांच्यावरच शासनाने उपासमारीची वेळ आणली आहे. शासनाकडून मिळणारे अनुदान थकल्याने राज्यातील ग्रंथालयांची आर्थिक कोंडी झाली आहे. यामुळे ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे वेतन थकल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. आधीच टाळेबंदीमुळे जवळपास सहा महिने ही ग्रंथालये बंद होती. आता ग्रंथालये खुली झाली असली तरी त्यांच्या समोरील आर्थिक विवंचना संपण्याची चिन्हे दिसून येत नाहीत.

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने देशभरात मार्च महिन्यापासून टाळेबंदी जाहीर झाली. या टाळेबंदीमुळे राज्यातील ग्रंथालये बंद झाली. जवळपास सात महिने ग्रंथालये पूर्णपणे बंद होती. ग्रंथालये बंद असल्याने सभासदांकडून येणारी मासिक वर्गणीही बंद झाली होती. त्यामुळे ग्रंथालय कर्मचारी आर्थिक विवंचनेत सापडले होते. कर्मचाऱ्यांना मानधन देणेही मुश्कील झाले. वीजबिलेही थकली आहेत. महावितरणकडून अनेकांची वीज बंद करण्यात आली आहे. अनेक ग्रंथालयांना उत्पन्नाचे दुसरे साधन नसल्याने त्यांचे अर्थकारणच कोलमडले. आता वाचकांसाठी ग्रंथालये पुन्हा खुली झाली असली तरी ग्रंथालय चालक आणि कर्मचाऱ्यांपुढील आर्थिक समस्या दूर झालेल्या नाहीत.

ग्रंथालयांचा कारभार सुरळीत राहावा यासाठी राज्य सरकारकडून त्यांना वेतन आणि वेतनेतर अनुदान दिले जाते. ग्रंथालयाने वार्षिक अहवाल आणि लेखापरीक्षण अहवाल सादर केल्यानंतर अशा दोन टप्प्यांत हे अनुदान दरवर्षी दिले जात असते. साधारणपणे जून ते ऑगस्टदरम्यान पहिल्या टप्प्यातील अनुदान वितरित केले जाते. तर जानेवारी ते मार्चदरम्यान दुसऱ्या टप्प्यातील अनुदान ग्रंथालयांना प्राप्त होत असते.

रायगड जिल्ह्यात ७६ ग्रंथालये रायगड जिल्ह्यात ७६ ग्रंथालये आहेत. यासाठी पहिल्या टप्प्यातील अनुदानासाठी सव्वा कोटी रुपयांची गरज आहे. शासनाने दोन दिवसांपूर्वी १३ लाख ३८ हजार ८८१ एवढे अल्प अनुदान जिल्हा ग्रंथालय कार्यालयाला पाठविले आहे. यामधून ग्रंथालयांना २० ते २२ टक्के रक्कम वर्ग करायची आहे. त्यामुळे मिळणाऱ्या रकमेतून काय करायचे, हा प्रश्न ग्रंथालय चालविणाऱ्या संस्थांना पडला आहे. तरी अनुदान वाढवून मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे.