शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

जिल्ह्यातील सहा नद्यांनी गाठली धोक्याची पातळी, सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 00:45 IST

शनिवारी पुन्हा धुंवाधार बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नद्या धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अलिबाग : रायगड जिल्ह्याला गेल्या तीन दिवसांपासून पावसाने चांगलेच झोडपून काढले असून, जिल्ह्यातील महत्त्वाच्या सहा नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. धुंवाधार पाऊस आणि भरतीमुळे नद्यांच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. नदी आणि खाडीकिनारी असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शनिवारी पुन्हा धुंवाधार बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नद्या धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.नेहमी ७ जूनला बरसणा-या पावसाचे २७ जून रोजी उशिराने आगमन झाल्याने सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले होते. पिण्याच्या पाण्याचे स्रोत आटत चालले होते, तर दुसरीकडे बळीराजाही पावासाच्या प्रतीक्षेत होता. मान्सूनपूर्व पाऊस बरसल्याने पावसाला सुरुवात होईल, या आशेवर शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र, पावसाने पाठ फिरवल्याने शेतातील राब पाण्याअभावी करपण्याचा धोका निर्माण झाला होता.२७ जूनपासून पावसाने पुन्हा दमदार कमबॅक केले. त्या दिवसापासून पावसाने विश्रांती घेतलेली नाही. सातत्याने पडणाºया पावसामुळे रायगड जिल्ह्यातील कुंडलिका, अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास आणि गाढी नद्यांही दुथडी भरून वाहत आहेत. २७ आणि २८ जूनच्या नद्यांनी अक्षरश: रौद्ररूप धारण केले. सद्यस्थितीमध्ये नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे.सलग पडणारा पाऊस आणि समुुद्राला येणाºया भरतीमुळे नद्यांमधील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होत आहे. पुढील २४ तासांमध्येही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पाऊस असाच मुसळधार कोसळत राहिल्यास नद्या धोक्याची पातळी ओलांडतील, असा इशाराही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला आहे.नद्यांनी धोक्याची पातळी गाठल्याने प्रशासनाने नदी आणि खाडीकिनारी असलेल्या गावांना, शहरांना सर्तकतेचा इशारा दिला आहे. प्रचंड पडलेल्या पावासाने अलिबाग, रसायनी, माणगाव, रोहे, महाड, पेण, नागोठणे चांगलेच जलमय झाले आहे. सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना चांगलाच त्रास होत आहे.माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये पाणी शिरल्याने रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांचे हाल सुरू आहेत. रुग्णालय प्रशासनालाही सेवा देताना कसरत करावी लागत आहे. श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी येथे दरडी पडल्याने काही कालावधीसाठी वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.शनिवारीही पावसाने उसंत न घेतल्याने नागरिकांचे सलग तिसºया दिवशीही प्रचंड हाल झाले. दरम्यान, पुढील २४ तासांमध्ये रायगड, ठाणे, पालघर आणि मुंबईमध्ये धुंवाधार पाऊस बरसणार आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी पावसाचे रौद्ररूपही पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे १ जुलै रोजीही तुफान पाऊस बरसणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन रायगडच्या जिल्हा प्रशासनाने केले आहे.शेखाडी मार्गावर दरड कोसळलीदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनाºयालगत असणाºया दिवेआगर-शेखाडी मार्गावरील कोंडविल येथे शनिवारी मुसळधार पावसामुळे दरड कोसळली. याबाबतचे वृत्त २७ जून रोजी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. मात्र, तरीही प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. या ठिकाणी सूचना फलकही लावण्यात आलेले नाहीत. शेखाडी मार्गावरील १७ किलोमीटरचा प्रवास पर्यटकांना नेहमीच सुखकर वाटतो. त्यामुळे या मार्गावर पर्यटकांची कायम वर्दळ असते. शुक्रवारपासून पडणाºया पावसामुळे कोंडविल येथे रस्त्यालगत दरड कोसळली. मात्र, त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला नाही.दरड कोसळण्याची माहिती श्रीवर्धन बांधकाम विभागास मिळाल्यावर शेखाडी रस्त्यावरील दरड हटवण्यात आली आहे. यापुढे विभागाकडून आपत्कालीन दखल घेतली जाईल.- सी. टी. जेट्टे, सा. बां. वि.अधिकारी, श्रीवर्धन.दरवर्षी पावसाळी येथे दरड कोसळल्याने प्रवासी श्रीवर्धनला जाण्यासाठी आमच्या शेखाडी मार्गे मिनीडोअरमध्ये बसत नाहीत, त्यामुळे आमच्या धंद्यावर खूप परिणाम होतो, तरी संबंधित अधिकाºयांनी यावर कायमस्वरूपी बंदोबस्त करावा.- प्रवीण पुसाळकर, मिनीडोअर चालक.

टॅग्स :riverनदी