शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

चला गाव वाचवू देश घडवू, रायगडमध्ये आदिवासी तरुणांचा ग्रामविकासाचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2018 17:27 IST

रोजगाराच्या शोधात ग्रामीण भागातील तरुण शहरात जात असताना कर्जत तालुक्यातील चाफेवाडी येथील आदिवासी तरुण- तरुणींनी गावातच राहून गावाचा विकास करण्याचा निर्धार केला आहे.

- जयंत धुळपरायगड- रोजगाराच्या शोधात ग्रामीण भागातील तरुण शहरात जात असताना कर्जत तालुक्यातील चाफेवाडी येथील आदिवासी तरुण- तरुणींनी गावातच राहून गावाचा विकास करण्याचा निर्धार केला आहे. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांना अभिप्रेत असलेल्या गावाचा विकास कशा प्रकारे करता येईल, याचा विचार हे आदिवासी तरुण करू लागले असून, त्यांना मार्गदर्शन व सहकार्याची गरज आहे.आदर्श गावाच्या निर्मितीस मोठा हातभारमहात्मा गांधी व कस्तुरबा गांधी यांची 150 वी जयंती पुढल्या वर्षी साजरी केली जाणार असून, याची तयारी गांधीवादी विचारवंत करू लागले आहेत. याचाच एक भाग म्हणून कर्जत तालुक्यातील चाफेवाडी या आदिवासी गावात युवा शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. यामध्ये येथील आदिवासी युवकांना रोजगार निर्मितीसाठी नैसर्गिक साधनसामग्रीवर आधारित प्रशिक्षण देण्यात आले.ग्रामीण भागात जास्तीत जास्त रोजगार कसा निर्माण केला जाईल, याबद्दल येथील तरुणांनीच पुढाकार घेत विविध संकल्पना मांडल्या आहेत. या संकल्पनेतून आदर्श गावाच्या निर्मितीस मोठा हातभार लागू शकतो, असा विश्वास चाफेवाडीतील युवकांना आहे. चाफेवाडी येथील शिबिरासाठी जिल्हा सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते सुभाष पाटील व महाराष्ट प्रदेश सर्वोदय मंडळाच्या पदाधिकारी विमल मुंडे उपस्थित होत्या.ग्रामीण तरुणांमध्ये जनजागृती करण्यासाठी शिबीररायगड जिल्ह्यातील ग्रामीण तरुणांमध्ये जनजागृती करण्याचे काम शिबिरांच्या माध्यमातून रायगड जिल्हा सर्वोदय मंडळ, विनोबा मिशन, ग्रामीण लोकसेवा मंडळ, समता सार्वजनिक वाचनालय, विनोबा मिशन ग्रंथालय यांच्यावतीने केले जात आहे. त्यांच्याच पुढाकाराने चाफेवाडी येथील तरुणांसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.-------------------------चाफेवाडीच्या विकासासाठी शिबिरार्थी तरुणांनी केलेले कामांचे नियोजन1.एकनाथ खंडवी, रंजना खंडवी - गावात सर्वोदय साहित्याचे ग्रंथालय सुरू करणार.2.योगेश खंडवी, रंजना खंडवी - लहान मुले व महिलांसाठी काम करणार.3.रविंद्र सांबरी, चंद्रकांत खंडवी- पर्यावरण, सेंद्रिय शेती, गोपालन, पर्यटन विषयक काम करणार.4.राजेश ठोंबरे, सविता खंडवी - स्वच्छता, योग-प्राणायम, निसर्गोपचार, वनौषधी उद्यान प्रकल्प.---------------------------150 गांधी अभियानअंतर्गत राबविल्या जात असलेल्या युवा शिबिराचे घोषवाक्यच गाव वाचवू देश घडवू हे आहे. या उपक्रमास चाफेवाडी येथील युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. त्यांच्या उत्साहाला मदतीची गरज आहे. येथील युवकांच्या नवनवीन संकल्पनेतून आदर्श ग्राम व्यवस्था साकारू शकते. -सुभाष पाटील, ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते