शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

शोषितांना न्याय मिळवून देणाऱ्या कायदेतज्ज्ञ; ॲड. सुरेखा दळवी यांचा संघर्षमय प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 08:22 IST

- वैभव गायकर लोकमत न्यूज नेटवर्क पनवेल : शेतकरी, कष्टकरी, कातकरी आणि आदिवासी हा घटक केंद्रस्थानी ठेवून ॲड. सुरेखा ...

- वैभव गायकरलोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : शेतकरी, कष्टकरी, कातकरी आणि आदिवासी हा घटक केंद्रस्थानी ठेवून ॲड. सुरेखा दळवी यांनी आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात केली. श्रमिक क्रांती संघटनेच्या माध्यमातून समाज कार्याचा वसा सुरू ठेवला. संघटना व सामाजिक कामाची गरज म्हणून १९८३ साली वकिलीची सनद घेऊन पनवेलच्या कोर्टात वकिली सुरू केली. वकिलीचा उपयोग मुख्यत: आदिवासी, शेतकरी, ग्रामीण, गरीब, कष्टकरी व स्त्रियांचे हक्क संरक्षणासाठी दळवी यांनी केला. आधुनिक काळातील नवदुर्गेच्या रूपाने दळवींनी असंख्य शोषितांना न्याय मिळवून दिला.

सुरेखा दळवी यांचा जन्म आणि शिक्षण मुंबई उपनगरात झाले. माहेर व सासर दोन्ही राष्ट्र सेवादल व समाजवादी चळवळीशी जोडलेले. हाच वारसा त्यांनी चालू ठेवला. आणीबाणीनंतर १९८७ साली तेव्हाच्या कुलाबा (आताचा रायगड) जिल्ह्यात पनवेल तालुक्यातील तारा येथील युसुफ मेहेरअली केंद्राशी जोडून राष्ट्र सेवा दलाच्या विद्यार्थी विभागाने सुरू केलेल्या आदिवासींच्या अनौपचारिक शिक्षण व आरोग्याशी संबंधित कामात सहभागी होऊन १९८७ ते १९९० या तीन वर्षांत पनवेल, पेण व उरण या तालुक्यांत आदिवासी वस्त्यांतून फिरताना जाणवलेले शोषण, अन्याय, अत्याचाराला तोंड देण्यासाठी १९९३ साली ‘ श्रमिक क्रांती संघटना’ स्थापन केली. सध्या संघटनेचे काम रायगड जिल्ह्यातील पनवेल, पेण, उरण, खालापूर, सुधागड, रोहा व अलिबाग या सात तालुक्यांत आणि नवी मुंबई परिसरातील जवळपास ४०० हून अधिक वाड्या-वस्त्यांतील कष्टकऱ्यांत आहे. संघटनेचे ९ पूर्णवेळ स्थानिक कार्यकर्ते आहेत. कामाचे स्वरूप मुख्यतः प्रबोधन, प्रशिक्षण, संघटन, संघर्ष, रचना आणि अभ्यास संशोधन अशा विविध पातळ्यांवर सुरू आहे. राज्य व देश पातळीवरील समविचारी आघाड्या यांच्याशी जोडून संघटना नैसर्गिक संसाधनांच्या शाश्वत आणि विवेकी वापरावर भर देत आहेत.  

२५ वर्षांचा लढाn आदिवासी कुटुंबे स्थिर व्हावीत म्हणून त्यांचे वन जमिनीवरील विशेषत: जमिनीवरचे हक्क मिळावेत म्हणून २५ वर्षे चिकाटीने लढा देऊन जवळपास १५ हजार एकर जमीन मुख्यत: आदिवासी कुटुंबांना मिळवून देण्याचे काम सुरू आहे. यासह आदिवासींवरील अन्यायाला दळवी यांनी वाचा फोडली. n यामध्ये आदिवासी, अल्प भूधारकांच्या जमिनींवर उभारण्यात येणाऱ्या महलमीरा व रामेश्वर वैभव हिल्स स्टेशन्स विरोधी लढा, रायगड जिल्ह्यातील ‘महामुंबई सेझ’विरोधी लढ्यातील सहभाग, आदिवासींचे स्थलांतर थांबावे म्हणून त्यांच्या जमिनीत फळझाडे व भाजीपाला लागवड करणारे गट तयार करणे, युवकांना जमीन मोजणी, बाळगंगा धरण प्रकल्प भ्रष्टाचार उघडकीस आणणे अशी असंख्य कामे आजघडीला त्या करीत आहेत.

टॅग्स :Navratriनवरात्री