शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

रेवस पोर्टची जमीन अद्याप पडीक

By admin | Updated: October 30, 2016 02:28 IST

रेवस पोर्ट या खासगी बंदर प्रकल्पाकरीता शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेण्यात आल्या. परंतु गेल्या सहा ते सात वर्षांत कोेणताही प्रकल्प उभारण्यात आला नाही.

- जयंत धुळप, अलिबागरेवस पोर्ट या खासगी बंदर प्रकल्पाकरीता शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेण्यात आल्या. परंतु गेल्या सहा ते सात वर्षांत कोेणताही प्रकल्प उभारण्यात आला नाही. त्यामुळे स्थानिकांच्या जमिनी गेल्या मात्र त्यांना रोजगार मिळाला नाही. पोर्टसाठी घेतलेल्या शेत जमिनी पडीक ठेवल्याने नापिका झाल्या आहेत. त्या कायद्या नुसारच शेतकऱ्यांना परत मिळाव्यात या मागणीकरीता अलिबाग तालुक्यांतील खारेपाटातील आठ गावांतील शेतकरी संघटीत झाले असल्याची माहिती खारेपाट विभाग शेतकरी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.रेवस पोर्ट या खासगी बंदर प्रकल्पाकरीता राज्याच्या विकास आयुक्तांच्या आदेशान्वये अलिबाग तालुक्यातील रांजणखार-डावली, मिळकतखार, कावाडे, बेलपाडा, हाशिवरे, बहिरीचा पाडा, रामकोठा, सोनकोठा या गावातील सुमारे ४०० शेतकऱ्यांच्या जमिनी मल्टी प्रॉडक्ट विशेष आर्थिक क्षेत्र स्थापन करण्यासाठी २००७ ते २०१० या कालावधीत खरेदी करण्यात आल्या. परंतु. या जमीनींवर आजतागायत प्रकल्प झाला नाही.प्रकल्पाकरीता न वापरलेल्या जमीनी परत मिळाव्या या मागणी करीता शेतकऱ्यांच्या वतीने चंद्रकांत वासुदेव पाटील यांनी राज्याच्या महसुल मंत्र्यांकडे १२ जानेवारी २०१६ रोजी अर्ज केला होता. त्या अर्जाच्या अनुशंगाने चौकशी करुन वस्तुस्थिती दर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश अलिबागच्या तहसिलदारांना देण्यात आले होेते. सारळ मंडळ अधिकाऱ्यांनी याबाबत चौकशी करुन तहसिलदारांना अहवाल सादर केला आहे. रेवस पोर्ट लि. कंपनीने राज्याच्या विकास आयुक्तांच्या ४ डिसेंबर २००७ च्या आदेशान्वये रायगड जिल्हयातील अलिबाग तालुकयातील रांजणखार डावली, मिळकतखार, कावाडे, बेलपाडा, हाशिवरे, बहिरीचा पाडा, रामकोठा, सोनकोठा येथील जमिनी मल्टी प्रॉडक्ट विशेष आर्थिक क्षेत्र स्थापन करण्यासाठी खरेदी करण्याची परवानगी दिली होती. त्यानुषंगाने कंपनीने २००७ ते २०१० या कालावधीत या क्षेत्रातील जमिनी खरेदी केल्या आहेत. मात्र खरेदी केलेल्या जमिनीचा वापर त्याच प्रयोजनासाठी अद्यापही सुरू केलेला नाही, असे या शासकीय अहवालात स्पष्टपणे नमुद करण्यात आले आहे.कायद्यानुसार जमीन खरेदीपासून पाच वर्षाच्या कालावधीत त्या जमिनीचा औद्योगिक वापर करण्यात येईल आणि तसे न केल्यास ज्या व्यक्तिकडून जमीन खरेदी केली होती त्या व्यक्तिला मूळात ती जमिन तीने जितक्या किंमतीला विकत घेतली होती तितक्याच किंमतीला ती पुन्हा खरेदी करण्याचा हक्क असेल, असेही म्हटले आहे. शेतकऱ्यांना जमीन परत मिळण्याची प्रक्रिया तत्काळ सुरु व्हावी, या करिता शासनाचे अंतिम आदेश प्राप्त करुन घेण्याकरीता शुक्रवारी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक निवेदन देण्यात आले आहे. याशिवाय चर्चेकरीता वेळ मागण्यात आल्याचे पाटील यांनी अखेरीस सांगितले.मे. रेवस पोर्ट लि. या कंपनीने खरेदी केलेल्या जमिनी वर्ग-१ व वर्ग-२ या स्वरूपाच्या असून कंपनीने सदर जमिनीमध्ये अद्याप वापर सुरू केलेला नाही. या जागेचा औद्योगिक प्रयोजनासाठी वापर सुरू करणे आवश्यक आहे अन्यथा जमीन ज्याच्याकडून खरेदी करण्यात आली होती, त्या व्यक्तीस विक्रीच्या मूळ किंमतीवर जमिन पुन्हा खरेदी करण्यास हक्क आहे. ही जमीन मूळ मालकालाच विकणे बंधकारक आहे. पडीक जमीन परत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे.