शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

कोळी बांधवांची इंडस्ट्रियल असोसिएशन कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 03:14 IST

रोहा तालुक्यात असलेल्या धाटाव औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांतून बारमाही वाहणारी जीवनवाहिनी कुंडलिका नदीच्या पात्रात रसायनयुक्त प्रदूषित पाणी कोणत्याही शुद्धीकरणाची प्रक्रि या न करताच सोडत आहे. त्यामुळे नदीपात्रातील जलप्रदूषणाने रोह्यातील पारंपरिक व्यवसाय करणाºया मच्छीमारांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे.

धाटाव : रोहा तालुक्यात असलेल्या धाटाव औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांतून बारमाही वाहणारी जीवनवाहिनी कुंडलिका नदीच्या पात्रात रसायनयुक्त प्रदूषित पाणी कोणत्याही शुद्धीकरणाची प्रक्रि या न करताच सोडत आहे. त्यामुळे नदीपात्रातील जलप्रदूषणाने रोह्यातील पारंपरिक व्यवसाय करणाºया मच्छीमारांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे. या धर्तीवर रोहा तालुक्यातील कोळी बांधवांनी बुधवारी एकत्र येऊन रोहा इंडस्ट्रियल असोसिएशनच्या धाटाव औद्योगिक वसाहतीतील कार्यालयावर जोरदार घोषणा देत मोर्चा काढला. या धरणे आंदोलनाने मात्र संपूर्ण परिसर दणाणून गेला.बुधवारी १० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता रोहा-कोलाड रस्त्यावर एक्सेल नाक्यावरून शिवसेनेचे तालुका प्रमुख समीर शेडगे, महाराष्ट्र कोळी समाज संघ रायगड जिल्हा अध्यक्ष जयवंत पोकळे यांच्या नेतृत्वाखाली सबंध तालुक्यातील कोळी समाज बांधवांसह निघालेल्या मोर्चाने रोहा इंडस्ट्रियल असोसिएशनच्या कार्यालयावर धडक दिली. या मोर्चात रोहा नगरपालिकेच्या नगरसेविका समीक्षा बामणे, शिवसेना महिला तालुका संघटक नीता हजारे, कोळी समाज तालुकाध्यक्ष मनोज भायतांडेल, शिवसेना शहर अध्यक्ष दीपक तेंडुलकर, बुवा साळवी आदींसह खारापटी, निडी, पडम, लक्ष्मीनगर, नवखार, सोनखार, न्हावे या परिसरातील कोळी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.रोहा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस अधीक्षक संदीप येडे-पाटील, पोलीस निरीक्षक रणजीत जाधव यासह अधिकाºयांनी प्रवेशद्वारावर निवेदन स्वीकारले. येथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याठिकाणी देण्यात आलेल्या निवेदनावर खारापटी, निडी, पडम, लक्ष्मीनगर, नवखार, सोनखार, न्हावे या परिसरातील एकूण १२९ मच्छीमार बांधवांनी सह्या केलेले पत्र निवेदनासमवेत देण्यात आले.प्रजासत्ताकदिनी साखळी उपोषणहे प्रदूषित पाणी साळाव येथे समुद्रात सोडत नाही तोपर्यंत मासेमारी करणाºया कोळी बांधवांना नुकसानभरपाई देण्याचे ठरले असताना रोहा इंडस्ट्रियल असोसिएशन यांना वारंवार भेटल्यानंतर मागणी मान्य केली, परंतु नुकसानभरपाई देण्यास आजवर टाळाटाळ करीत आहेत. असोसिएशनच्या अधिकाºयांनी मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्यामुळे हे धरणे आंदोलन करीत असल्याचे आंदोलकांनी सांगितले.यानंतर येत्या प्रजासत्ताकदिनी २६ जानेवारीला सकाळी ९ वा. प्रांत कार्यालय रोहा येथे न्याय मिळेपर्यंत साखळी उपोषणास बसणार अशी भूमिका असल्याचे स्पष्ट केले. हा प्रश्न सुटला नाही तर समाजातील तरु णांनी हा प्रश्न अहिंसेच्या मार्गाने नेला तर त्यास महाराष्ट्र शासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी अशा आशयाचे पत्र समाज बांधवांनी दिले आहे.

टॅग्स :agitationआंदोलन