शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

कोळी बांधवांची इंडस्ट्रियल असोसिएशन कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 03:14 IST

रोहा तालुक्यात असलेल्या धाटाव औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांतून बारमाही वाहणारी जीवनवाहिनी कुंडलिका नदीच्या पात्रात रसायनयुक्त प्रदूषित पाणी कोणत्याही शुद्धीकरणाची प्रक्रि या न करताच सोडत आहे. त्यामुळे नदीपात्रातील जलप्रदूषणाने रोह्यातील पारंपरिक व्यवसाय करणाºया मच्छीमारांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे.

धाटाव : रोहा तालुक्यात असलेल्या धाटाव औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांतून बारमाही वाहणारी जीवनवाहिनी कुंडलिका नदीच्या पात्रात रसायनयुक्त प्रदूषित पाणी कोणत्याही शुद्धीकरणाची प्रक्रि या न करताच सोडत आहे. त्यामुळे नदीपात्रातील जलप्रदूषणाने रोह्यातील पारंपरिक व्यवसाय करणाºया मच्छीमारांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे. या धर्तीवर रोहा तालुक्यातील कोळी बांधवांनी बुधवारी एकत्र येऊन रोहा इंडस्ट्रियल असोसिएशनच्या धाटाव औद्योगिक वसाहतीतील कार्यालयावर जोरदार घोषणा देत मोर्चा काढला. या धरणे आंदोलनाने मात्र संपूर्ण परिसर दणाणून गेला.बुधवारी १० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता रोहा-कोलाड रस्त्यावर एक्सेल नाक्यावरून शिवसेनेचे तालुका प्रमुख समीर शेडगे, महाराष्ट्र कोळी समाज संघ रायगड जिल्हा अध्यक्ष जयवंत पोकळे यांच्या नेतृत्वाखाली सबंध तालुक्यातील कोळी समाज बांधवांसह निघालेल्या मोर्चाने रोहा इंडस्ट्रियल असोसिएशनच्या कार्यालयावर धडक दिली. या मोर्चात रोहा नगरपालिकेच्या नगरसेविका समीक्षा बामणे, शिवसेना महिला तालुका संघटक नीता हजारे, कोळी समाज तालुकाध्यक्ष मनोज भायतांडेल, शिवसेना शहर अध्यक्ष दीपक तेंडुलकर, बुवा साळवी आदींसह खारापटी, निडी, पडम, लक्ष्मीनगर, नवखार, सोनखार, न्हावे या परिसरातील कोळी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.रोहा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस अधीक्षक संदीप येडे-पाटील, पोलीस निरीक्षक रणजीत जाधव यासह अधिकाºयांनी प्रवेशद्वारावर निवेदन स्वीकारले. येथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याठिकाणी देण्यात आलेल्या निवेदनावर खारापटी, निडी, पडम, लक्ष्मीनगर, नवखार, सोनखार, न्हावे या परिसरातील एकूण १२९ मच्छीमार बांधवांनी सह्या केलेले पत्र निवेदनासमवेत देण्यात आले.प्रजासत्ताकदिनी साखळी उपोषणहे प्रदूषित पाणी साळाव येथे समुद्रात सोडत नाही तोपर्यंत मासेमारी करणाºया कोळी बांधवांना नुकसानभरपाई देण्याचे ठरले असताना रोहा इंडस्ट्रियल असोसिएशन यांना वारंवार भेटल्यानंतर मागणी मान्य केली, परंतु नुकसानभरपाई देण्यास आजवर टाळाटाळ करीत आहेत. असोसिएशनच्या अधिकाºयांनी मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्यामुळे हे धरणे आंदोलन करीत असल्याचे आंदोलकांनी सांगितले.यानंतर येत्या प्रजासत्ताकदिनी २६ जानेवारीला सकाळी ९ वा. प्रांत कार्यालय रोहा येथे न्याय मिळेपर्यंत साखळी उपोषणास बसणार अशी भूमिका असल्याचे स्पष्ट केले. हा प्रश्न सुटला नाही तर समाजातील तरु णांनी हा प्रश्न अहिंसेच्या मार्गाने नेला तर त्यास महाराष्ट्र शासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी अशा आशयाचे पत्र समाज बांधवांनी दिले आहे.

टॅग्स :agitationआंदोलन