शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कोळी बांधवांची इंडस्ट्रियल असोसिएशन कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 03:14 IST

रोहा तालुक्यात असलेल्या धाटाव औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांतून बारमाही वाहणारी जीवनवाहिनी कुंडलिका नदीच्या पात्रात रसायनयुक्त प्रदूषित पाणी कोणत्याही शुद्धीकरणाची प्रक्रि या न करताच सोडत आहे. त्यामुळे नदीपात्रातील जलप्रदूषणाने रोह्यातील पारंपरिक व्यवसाय करणाºया मच्छीमारांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे.

धाटाव : रोहा तालुक्यात असलेल्या धाटाव औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांतून बारमाही वाहणारी जीवनवाहिनी कुंडलिका नदीच्या पात्रात रसायनयुक्त प्रदूषित पाणी कोणत्याही शुद्धीकरणाची प्रक्रि या न करताच सोडत आहे. त्यामुळे नदीपात्रातील जलप्रदूषणाने रोह्यातील पारंपरिक व्यवसाय करणाºया मच्छीमारांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे. या धर्तीवर रोहा तालुक्यातील कोळी बांधवांनी बुधवारी एकत्र येऊन रोहा इंडस्ट्रियल असोसिएशनच्या धाटाव औद्योगिक वसाहतीतील कार्यालयावर जोरदार घोषणा देत मोर्चा काढला. या धरणे आंदोलनाने मात्र संपूर्ण परिसर दणाणून गेला.बुधवारी १० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता रोहा-कोलाड रस्त्यावर एक्सेल नाक्यावरून शिवसेनेचे तालुका प्रमुख समीर शेडगे, महाराष्ट्र कोळी समाज संघ रायगड जिल्हा अध्यक्ष जयवंत पोकळे यांच्या नेतृत्वाखाली सबंध तालुक्यातील कोळी समाज बांधवांसह निघालेल्या मोर्चाने रोहा इंडस्ट्रियल असोसिएशनच्या कार्यालयावर धडक दिली. या मोर्चात रोहा नगरपालिकेच्या नगरसेविका समीक्षा बामणे, शिवसेना महिला तालुका संघटक नीता हजारे, कोळी समाज तालुकाध्यक्ष मनोज भायतांडेल, शिवसेना शहर अध्यक्ष दीपक तेंडुलकर, बुवा साळवी आदींसह खारापटी, निडी, पडम, लक्ष्मीनगर, नवखार, सोनखार, न्हावे या परिसरातील कोळी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.रोहा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस अधीक्षक संदीप येडे-पाटील, पोलीस निरीक्षक रणजीत जाधव यासह अधिकाºयांनी प्रवेशद्वारावर निवेदन स्वीकारले. येथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याठिकाणी देण्यात आलेल्या निवेदनावर खारापटी, निडी, पडम, लक्ष्मीनगर, नवखार, सोनखार, न्हावे या परिसरातील एकूण १२९ मच्छीमार बांधवांनी सह्या केलेले पत्र निवेदनासमवेत देण्यात आले.प्रजासत्ताकदिनी साखळी उपोषणहे प्रदूषित पाणी साळाव येथे समुद्रात सोडत नाही तोपर्यंत मासेमारी करणाºया कोळी बांधवांना नुकसानभरपाई देण्याचे ठरले असताना रोहा इंडस्ट्रियल असोसिएशन यांना वारंवार भेटल्यानंतर मागणी मान्य केली, परंतु नुकसानभरपाई देण्यास आजवर टाळाटाळ करीत आहेत. असोसिएशनच्या अधिकाºयांनी मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्यामुळे हे धरणे आंदोलन करीत असल्याचे आंदोलकांनी सांगितले.यानंतर येत्या प्रजासत्ताकदिनी २६ जानेवारीला सकाळी ९ वा. प्रांत कार्यालय रोहा येथे न्याय मिळेपर्यंत साखळी उपोषणास बसणार अशी भूमिका असल्याचे स्पष्ट केले. हा प्रश्न सुटला नाही तर समाजातील तरु णांनी हा प्रश्न अहिंसेच्या मार्गाने नेला तर त्यास महाराष्ट्र शासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी अशा आशयाचे पत्र समाज बांधवांनी दिले आहे.

टॅग्स :agitationआंदोलन