शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

खैरेतील पाणी योजना अडचणीत; ७५ लाखांची पाणीपट्टी थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 23:52 IST

महाड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील गावांना खैरे धरणातून नियमित पाणीपुरवठा होतो. मात्र, या गावांची जवळपास ७५ लाख रु पये पाणीपट्टी थकीत आहे. यामुळे खैरे प्रादेशिक नळ पाणी योजना अडचणीत सापडली आहे.

- सिकंदर अनवारेदासगाव : महाड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील गावांना खैरे धरणातून नियमित पाणीपुरवठा होतो. मात्र, या गावांची जवळपास ७५ लाख रु पये पाणीपट्टी थकीत आहे. यामुळे खैरे प्रादेशिक नळ पाणी योजना अडचणीत सापडली आहे. ग्रामस्थांकडून पाणीपट्टीची वसुली न झाल्यास खाडीपट्ट्यातील १९ गावे व २९ वाड्यांना पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. महाड एमआयडीसीमधील कारखान्यांच्या सांडपाण्यामुळे या भागातील पाण्याचे स्रोत प्रदूषित झाल्याने ही पाणीपट्टी एमआयडीसीने भरावी, अशी मागणी या भागातील ग्रामस्थांनी केली आहे.खैरे गावाच्या जवळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने हा प्रकल्प उभा केला असून, २००९ मध्ये हा प्रकल्प रायगड जिल्हा परिषदेकडे देण्यात आला. परिसरातील २२ गावे आणि २९ वाड्यांची तहान हा प्रकल्प भागवत असून यामध्ये गोमेंडी, वराठी, चिंभावे, चिंभावे सुतारकोंड, चिंभावे मोहल्ला, बेबलघर, तेलंगे, आदिस्ते, खैरे, रोहन, जुई, कुंबळे, रावढळ, कोसबी, लोअर तुडील, वामने या गावांचा समावेश आहे. जवळपास दहा हजार ३१४ लोकसंख्येला हा पाणीपुरवठा होत आहे. या खैरे धरणातून खाडीपट्टा भागातील गावांना पाणीपुरवठा गेल्या २० वर्षांपासून सुरू आहे. सध्या जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग ही योजना चालवते. देखभाल, दुरुस्तीसाठी रायगड जिल्हा परिषदेने ठेकेदार नेमले आहेत. पाणीपट्टीही ठेकेदारामार्फतच वसूल केली जाते, तरीही अनेक वर्षांपासून या योजनेची थकबाकी वाढत आहे. ग्रामस्थ पाणीकर देत नसल्याने आतापर्यंत तब्बल ७५ लाख रु पयांची पाणीपट्टी गावांकडे थकीत आहे. ही योजना मोठी असल्याने तिच्या देखभाल दुरु स्तीचा खर्चही मोठा आहे. गेल्या चार वर्षांपासून काही पंप, सॅण्ड फिल्टरेशन प्रक्रि या बंद आहे. प्रतिवर्षी या प्रक्रि येला ५० ते ६० हजार रुपये तर दुरुस्तीकरिता ४० लाख रुपये खर्च येतो. ठेकेदार आणि देखभालदुरु स्तीला लागणारा खर्च मोठा असल्याने आणि पाणीपट्टी थकीत असल्याने पाणीपुरवठा विभागाला ही योजना चालवणे आता अवघड झाले आहे.अद्याप ठोस निर्णय नाहीपाणीपुरवठा विभागाने तगादा लावल्यानंतर या भागातील ग्रामपंचायतींचे सरपंच व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा अधिकाºयांची भेट घेऊन पाणीपट्टी भरण्याबाबत स्पष्ट नकार दिला आहे.या भागातील पाण्याचे स्रोत एमआयडीसीमधील कारखान्यांचे सांडपाणी सावित्री नदीत मिसळल्याने यापूर्वी प्रदूषित झालेले आहे त्यामुळे याची जबाबदारी स्वीकारून एमआयडीसीने थकबाकी भरावी व मोफत पाणी द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे.याबाबत महाड पंचायत समितीमध्येही ग्रामस्थांची पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता जे. एन. पाटील यांच्याशी चर्चा झाली. मात्र, याबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही, यामुळे पाणीटंचाईची झळ या परिसरातील गावांना भासणार आहे.ही पाणीपुरवठा योजना जिल्हा परिषद चालवत असल्याने एमआयडीसीने पाणीबिल भरावे, अशी ग्रामस्थांची मागणी असली तरी हा धोरणात्मक निर्णय आहे, त्यामुळे तो सरकारस्तरावर होऊ शकेल.- बी. ए. झंजे, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी, महाडज्या कामासाठी ठेकेदार नेमले आहेत ते दुरु स्तीचे काम होत नसल्याने ग्रामस्थांना दूषित पाणी प्यावे लागते, यामुळे पाणीपट्टी माफ केली गेली पाहिजे.- रिहान देशमुख, सामाजिक कार्यकते

टॅग्स :Waterपाणी