शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणत्याही देशाच्या दबावाखाली व्यापार करार करणार नाही", पीयूष गोयल यांचे अमेरिकेला खडेबोल
2
धडाकेबाज PSI 'बदने'वर बलात्काराचा आरोप! तस्करांना पकडणारा अधिकारी महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर फरार
3
'All is not well with the UN', संयुक्त राष्ट्र संघाबाबत जयशंकर यांचे मोठे वक्तव्य...
4
Asia Cup Trophy Hidden Place In Abu Dhabi : पाकची नवी नौटंकी! आशिया कप ट्रॉफी अबुधाबीत लपवली?
5
आशियाई हवाई हद्दीत अचानक उडताना दिसली रशियाची आण्विक फायटर जेट्स, नेमकं प्रकरण काय?
6
काही सेकंदात होतात जळून खाक, खाजगी बसला आग लागल्यावर प्रवाशांचं वाचणं का होतं कठीण?
7
अरे बापरे! कर्मचाऱ्याच्या प्रेमात वेडी झाली मालकीण; लग्नानंतर 'त्याने'च लावला कोट्यवधींचा चुना
8
मॅडॉक फिल्म्सच्या 'चामुंडा'मध्ये आलिया भटची एन्ट्री कन्फर्म? दिग्दर्शक अमर कौशिक म्हणाले...
9
इराणमध्ये महागाईचा कहर! हप्त्यांवर कबरीच्या दगडांची खरेदी; कारण जाणून घ्या
10
VIDEO: विराट कोहलीचा 'माईंड गेम'! आधी ट्रेव्हिस हेडशी गप्पा अन् मग पुढच्याच चेंडूवर विकेट
11
भारतानंतर आणखी एक देश पाकिस्तानचे पाणी अडवणार, कुनार नदीवर धरण बांधण्याची तयारी सुरू
12
Honda vs Suzuki: होन्डा अ‍ॅक्टिव्हा आणि सुझुकी अ‍ॅक्सेसमध्ये चुरस; कोण आहे 'स्मार्ट फीचर्स'चा खरा किंग? वाचा
13
खळबळजनक दावा! सत्ताधारी २१ आमदारांना 'दिवाळी गिफ्ट'; एकाच ठेकेदारानं दिल्या आलिशान डिफेंडर कार?
14
बुध गुरु युती २०२५: बुध-गुरुचा शक्तिशाली नवपंचम राजयोग; 'या' ७ राशींचा सुखाचा काळ होणार सुरु
15
चंद्रशेखर बावनकुळेंची भाजपा कार्यकर्त्यांना तंबी; "सर्वांचे व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर..."
16
मुलगा की मुलगी? नवजात अर्भकांच्या अदलाबदलीवरून दोन कुटुंबांमध्ये हॉस्पिटलमध्येच वाद
17
हेअर फॉलचा वैताग! लसूण की कांद्याचा रस... काळ्याभोर लांब, जाड केसांसाठी सर्वात बेस्ट काय?
18
भारतीय नौदल चीन, पाकिस्तान, तुर्कीला धक्का देणार! तीन पावले उचलली
19
लग्नानंतर तापसी पन्नूने सोडला देश? डेन्मार्कला शिफ्ट झाल्याच्या चर्चांवर अभिनेत्रीचं स्पष्टीकरण
20
Numerology: ५, १४, २३ तारखेला जन्मलेल्या मुलींवर असतो बुधाचा प्रभाव; अत्यंत बुद्धिमान असतो स्वभाव!

खैरेतील पाणी योजना अडचणीत; ७५ लाखांची पाणीपट्टी थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 23:52 IST

महाड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील गावांना खैरे धरणातून नियमित पाणीपुरवठा होतो. मात्र, या गावांची जवळपास ७५ लाख रु पये पाणीपट्टी थकीत आहे. यामुळे खैरे प्रादेशिक नळ पाणी योजना अडचणीत सापडली आहे.

- सिकंदर अनवारेदासगाव : महाड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील गावांना खैरे धरणातून नियमित पाणीपुरवठा होतो. मात्र, या गावांची जवळपास ७५ लाख रु पये पाणीपट्टी थकीत आहे. यामुळे खैरे प्रादेशिक नळ पाणी योजना अडचणीत सापडली आहे. ग्रामस्थांकडून पाणीपट्टीची वसुली न झाल्यास खाडीपट्ट्यातील १९ गावे व २९ वाड्यांना पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. महाड एमआयडीसीमधील कारखान्यांच्या सांडपाण्यामुळे या भागातील पाण्याचे स्रोत प्रदूषित झाल्याने ही पाणीपट्टी एमआयडीसीने भरावी, अशी मागणी या भागातील ग्रामस्थांनी केली आहे.खैरे गावाच्या जवळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने हा प्रकल्प उभा केला असून, २००९ मध्ये हा प्रकल्प रायगड जिल्हा परिषदेकडे देण्यात आला. परिसरातील २२ गावे आणि २९ वाड्यांची तहान हा प्रकल्प भागवत असून यामध्ये गोमेंडी, वराठी, चिंभावे, चिंभावे सुतारकोंड, चिंभावे मोहल्ला, बेबलघर, तेलंगे, आदिस्ते, खैरे, रोहन, जुई, कुंबळे, रावढळ, कोसबी, लोअर तुडील, वामने या गावांचा समावेश आहे. जवळपास दहा हजार ३१४ लोकसंख्येला हा पाणीपुरवठा होत आहे. या खैरे धरणातून खाडीपट्टा भागातील गावांना पाणीपुरवठा गेल्या २० वर्षांपासून सुरू आहे. सध्या जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग ही योजना चालवते. देखभाल, दुरुस्तीसाठी रायगड जिल्हा परिषदेने ठेकेदार नेमले आहेत. पाणीपट्टीही ठेकेदारामार्फतच वसूल केली जाते, तरीही अनेक वर्षांपासून या योजनेची थकबाकी वाढत आहे. ग्रामस्थ पाणीकर देत नसल्याने आतापर्यंत तब्बल ७५ लाख रु पयांची पाणीपट्टी गावांकडे थकीत आहे. ही योजना मोठी असल्याने तिच्या देखभाल दुरु स्तीचा खर्चही मोठा आहे. गेल्या चार वर्षांपासून काही पंप, सॅण्ड फिल्टरेशन प्रक्रि या बंद आहे. प्रतिवर्षी या प्रक्रि येला ५० ते ६० हजार रुपये तर दुरुस्तीकरिता ४० लाख रुपये खर्च येतो. ठेकेदार आणि देखभालदुरु स्तीला लागणारा खर्च मोठा असल्याने आणि पाणीपट्टी थकीत असल्याने पाणीपुरवठा विभागाला ही योजना चालवणे आता अवघड झाले आहे.अद्याप ठोस निर्णय नाहीपाणीपुरवठा विभागाने तगादा लावल्यानंतर या भागातील ग्रामपंचायतींचे सरपंच व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा अधिकाºयांची भेट घेऊन पाणीपट्टी भरण्याबाबत स्पष्ट नकार दिला आहे.या भागातील पाण्याचे स्रोत एमआयडीसीमधील कारखान्यांचे सांडपाणी सावित्री नदीत मिसळल्याने यापूर्वी प्रदूषित झालेले आहे त्यामुळे याची जबाबदारी स्वीकारून एमआयडीसीने थकबाकी भरावी व मोफत पाणी द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे.याबाबत महाड पंचायत समितीमध्येही ग्रामस्थांची पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता जे. एन. पाटील यांच्याशी चर्चा झाली. मात्र, याबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही, यामुळे पाणीटंचाईची झळ या परिसरातील गावांना भासणार आहे.ही पाणीपुरवठा योजना जिल्हा परिषद चालवत असल्याने एमआयडीसीने पाणीबिल भरावे, अशी ग्रामस्थांची मागणी असली तरी हा धोरणात्मक निर्णय आहे, त्यामुळे तो सरकारस्तरावर होऊ शकेल.- बी. ए. झंजे, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी, महाडज्या कामासाठी ठेकेदार नेमले आहेत ते दुरु स्तीचे काम होत नसल्याने ग्रामस्थांना दूषित पाणी प्यावे लागते, यामुळे पाणीपट्टी माफ केली गेली पाहिजे.- रिहान देशमुख, सामाजिक कार्यकते

टॅग्स :Waterपाणी