शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

मुंबई-गोवा महामार्गावर खड्डे

By admin | Updated: July 5, 2016 02:22 IST

मुंबई-गोवा महामार्गाचे काम २०११ पासून सुरू झाले. नव्याने बनविण्यात आलेला रस्ता व जुन्या रस्त्याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे तसेच गेल्या काही वर्षांपासून महामार्गाचे चांगल्या

वडखळ : मुंबई-गोवा महामार्गाचे काम २०११ पासून सुरू झाले. नव्याने बनविण्यात आलेला रस्ता व जुन्या रस्त्याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे तसेच गेल्या काही वर्षांपासून महामार्गाचे चांगल्या पध्दतीने डांबरीकरण न झाल्याने महामार्गावर पावसाच्या दणक्याने मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडायला सुरुवात झाली असून या महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. महामार्गावर पेण ते वडखळ, नागोठणे महामार्गावर पडलेल्या या खड्ड्यांमुळे अनेक वाहने नादुरुस्त होवून याचा फटका वाहनचालकांना बसत आहे. मुंबई-गोवा महामार्ग हा कोकणात जाणारा महत्त्वाचा मार्ग आहे. तसेच कोकणच्या विकासाला चालना देणारा हा एकमेव रस्ता आहे. या महामार्गाकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने या महामार्गाचे काम रखडले आहे. महामार्गाच्या झालेल्या दुरवस्थेकडे शासन व लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने या महामार्गावर दरवर्षी शेकडो प्रवाशांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. महामार्गावर वारंवार होत असलेल्या अपघातांमुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. महामार्गाचे काम कासव गतीने सुरू असून ते निकृष्ट दर्जाचे केले गेले असल्याने पहिल्या पावसाच्या दणक्याने महामार्गावर खड्डे पडल्याने प्रवाशांना व वाहन चालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. मुंबई - गोवा महामार्गावर पेण ते वडखळ, नागोठणे महामार्गावर पडलेल्या या खड्ड्यांमुळे अनेक वाहने नादुरुस्त होत आहेत. या महामार्गाची दुरु स्ती करावी अशी मागणी प्रवासी व वाहन चालकांकडून होत आहे. (वार्ताहर)रस्ता दुरु स्तीची मागणीआता वर्षा सहलीचा प्रारंभ होणार असून या वर्षा सहलीसाठी पर्यटकांची पसंती अलिबाग-मुरुड या ठिकाणांना असल्याने या महामार्गावर वाहतूक वाढणार असल्याने या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी व अपघात होण्याची शक्यता आहे. शाळा सुरू झाल्याने या खड्डेमय रस्त्यांमधून विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागत आहे. या महामार्गाची दुरु स्ती करावी अशी मागणी होत आहे.