शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
4
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
5
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
6
संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
7
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
8
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
9
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
10
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
11
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
12
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
13
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
14
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
15
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
16
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
17
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
18
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
19
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
20
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?

‘कर्नावती’लाही प्रदूषणाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 05:14 IST

पनवेल तालुक्यात कासाडी, गाढी या महत्त्वाच्या नद्यांना प्रदूषणाचा विळखा बसला आहे. शहरीकरणामुळे या नद्यांच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचा निष्कर्ष लावला जात आहे.

- वैभव गायकरपनवेल -  पनवेल तालुक्यात कासाडी, गाढी या महत्त्वाच्या नद्यांना प्रदूषणाचा विळखा बसला आहे. शहरीकरणामुळे या नद्यांच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचा निष्कर्ष लावला जात आहे. मात्र ग्रामीण भागातील नद्या देखील प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्या आहेत. कर्नाळा येथून उगम पावणाऱ्या कर्नावती नदीत दिवसेंदिवस प्रदूषण वाढत असल्याने येथील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाकडे तक्रार केली आहे.कर्नाळ्याच्या डोंगर रांगांमधून कर्नावती नदीचा उगम झाला आहे. याठिकाणाहून ही नदी सांगुर्ली ग्रामपंचायत हद्दीतील चिरवत, तुरमाळे, सांगुर्ली या गावानजीक वाहते. या परिसरात गोदाम, कारखान्यांची संख्या वाढत आहे. त्यातून घातक रसायनमिश्रित पाणी नदीत सोडले जाते. त्यामुळे कर्नावती नदी दूषित झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. नदीपात्रात दूषित पाण्याचा साठा वाढल्याने या नदीचे पाणी गुरांना देखील पिण्यास धोकादायक झाले आहे.विशेष म्हणजे या दूषित पाण्यामुळे त्याठिकाणच्या रहिवाशांना उग्र वासाला सामोरे जावे लागत आहे. स्थानिक ग्रामस्थ नीलेश वांगीलकर यांनी यासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे लेखी तक्र ार केली आहे. या परिसरात असलेल्या राक्यान कंपनीतून नदीच्या पात्रात दूषित पाणी सोडले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रकरणात लक्ष घालून संबंधितावर कारवाई करण्याची विनंती त्यांनी पत्राद्वारे केली आहे. पनवेल तालुक्यातील तळोजा औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणाचा विषय गंभीर बनत चालला आहे.कासाडी नदी दूषित झाल्यामुळे नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे धाव घेतली आहे. शहरी भागातील नद्यांची दयनीय अवस्था झाली असून ग्रामीण भागातील नद्या देखील प्रदूषित होत असल्याने ग्रामस्थांमध्ये यासंदर्भात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.जेडब्लूसी कंपनीशी करार करून संबंधित जागा भाडेतत्त्वावर घेतली आहे. आमची सर्व माहिती जेडब्लूसीकडे उपलब्ध असल्याने यासंदर्भात जेडब्लूसी व्यवस्थापनाशी संपर्क साधावा.- रंजित कौर, व्यवस्थापक, राक्यान कंपनीसंबंधित प्रकाराची सविस्तर माहिती घेण्यासाठी त्या परिसराची पाहणी केली जाईल. पाहणी केल्यानंतर यासंदर्भात भाष्य करणे उचित होईल.- संदीप पवार, व्यवस्थापक, जेडब्लूसीग्रामस्थांनी केलेल्यातक्र ारीची शहानिशा केली जाईल. या प्रकारात दोषी आढळलेल्या कारखान्यावर निश्चितच कारवाई करण्यात येईल.- सचिन आडकर,अधिकारी, महाराष्ट्रप्रदूषण नियंत्रण मंडळ

टॅग्स :riverनदीpollutionप्रदूषणRaigadरायगड