शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

‘कर्नावती’लाही प्रदूषणाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 05:14 IST

पनवेल तालुक्यात कासाडी, गाढी या महत्त्वाच्या नद्यांना प्रदूषणाचा विळखा बसला आहे. शहरीकरणामुळे या नद्यांच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचा निष्कर्ष लावला जात आहे.

- वैभव गायकरपनवेल -  पनवेल तालुक्यात कासाडी, गाढी या महत्त्वाच्या नद्यांना प्रदूषणाचा विळखा बसला आहे. शहरीकरणामुळे या नद्यांच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचा निष्कर्ष लावला जात आहे. मात्र ग्रामीण भागातील नद्या देखील प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्या आहेत. कर्नाळा येथून उगम पावणाऱ्या कर्नावती नदीत दिवसेंदिवस प्रदूषण वाढत असल्याने येथील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाकडे तक्रार केली आहे.कर्नाळ्याच्या डोंगर रांगांमधून कर्नावती नदीचा उगम झाला आहे. याठिकाणाहून ही नदी सांगुर्ली ग्रामपंचायत हद्दीतील चिरवत, तुरमाळे, सांगुर्ली या गावानजीक वाहते. या परिसरात गोदाम, कारखान्यांची संख्या वाढत आहे. त्यातून घातक रसायनमिश्रित पाणी नदीत सोडले जाते. त्यामुळे कर्नावती नदी दूषित झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. नदीपात्रात दूषित पाण्याचा साठा वाढल्याने या नदीचे पाणी गुरांना देखील पिण्यास धोकादायक झाले आहे.विशेष म्हणजे या दूषित पाण्यामुळे त्याठिकाणच्या रहिवाशांना उग्र वासाला सामोरे जावे लागत आहे. स्थानिक ग्रामस्थ नीलेश वांगीलकर यांनी यासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे लेखी तक्र ार केली आहे. या परिसरात असलेल्या राक्यान कंपनीतून नदीच्या पात्रात दूषित पाणी सोडले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रकरणात लक्ष घालून संबंधितावर कारवाई करण्याची विनंती त्यांनी पत्राद्वारे केली आहे. पनवेल तालुक्यातील तळोजा औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणाचा विषय गंभीर बनत चालला आहे.कासाडी नदी दूषित झाल्यामुळे नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे धाव घेतली आहे. शहरी भागातील नद्यांची दयनीय अवस्था झाली असून ग्रामीण भागातील नद्या देखील प्रदूषित होत असल्याने ग्रामस्थांमध्ये यासंदर्भात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.जेडब्लूसी कंपनीशी करार करून संबंधित जागा भाडेतत्त्वावर घेतली आहे. आमची सर्व माहिती जेडब्लूसीकडे उपलब्ध असल्याने यासंदर्भात जेडब्लूसी व्यवस्थापनाशी संपर्क साधावा.- रंजित कौर, व्यवस्थापक, राक्यान कंपनीसंबंधित प्रकाराची सविस्तर माहिती घेण्यासाठी त्या परिसराची पाहणी केली जाईल. पाहणी केल्यानंतर यासंदर्भात भाष्य करणे उचित होईल.- संदीप पवार, व्यवस्थापक, जेडब्लूसीग्रामस्थांनी केलेल्यातक्र ारीची शहानिशा केली जाईल. या प्रकारात दोषी आढळलेल्या कारखान्यावर निश्चितच कारवाई करण्यात येईल.- सचिन आडकर,अधिकारी, महाराष्ट्रप्रदूषण नियंत्रण मंडळ

टॅग्स :riverनदीpollutionप्रदूषणRaigadरायगड