शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
4
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
5
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
6
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
7
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
8
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
9
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
10
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
11
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
12
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
13
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
14
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
15
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
16
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
17
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
18
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
19
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
Daily Top 2Weekly Top 5

‘कर्नावती’लाही प्रदूषणाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 05:14 IST

पनवेल तालुक्यात कासाडी, गाढी या महत्त्वाच्या नद्यांना प्रदूषणाचा विळखा बसला आहे. शहरीकरणामुळे या नद्यांच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचा निष्कर्ष लावला जात आहे.

- वैभव गायकरपनवेल -  पनवेल तालुक्यात कासाडी, गाढी या महत्त्वाच्या नद्यांना प्रदूषणाचा विळखा बसला आहे. शहरीकरणामुळे या नद्यांच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचा निष्कर्ष लावला जात आहे. मात्र ग्रामीण भागातील नद्या देखील प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्या आहेत. कर्नाळा येथून उगम पावणाऱ्या कर्नावती नदीत दिवसेंदिवस प्रदूषण वाढत असल्याने येथील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाकडे तक्रार केली आहे.कर्नाळ्याच्या डोंगर रांगांमधून कर्नावती नदीचा उगम झाला आहे. याठिकाणाहून ही नदी सांगुर्ली ग्रामपंचायत हद्दीतील चिरवत, तुरमाळे, सांगुर्ली या गावानजीक वाहते. या परिसरात गोदाम, कारखान्यांची संख्या वाढत आहे. त्यातून घातक रसायनमिश्रित पाणी नदीत सोडले जाते. त्यामुळे कर्नावती नदी दूषित झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. नदीपात्रात दूषित पाण्याचा साठा वाढल्याने या नदीचे पाणी गुरांना देखील पिण्यास धोकादायक झाले आहे.विशेष म्हणजे या दूषित पाण्यामुळे त्याठिकाणच्या रहिवाशांना उग्र वासाला सामोरे जावे लागत आहे. स्थानिक ग्रामस्थ नीलेश वांगीलकर यांनी यासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे लेखी तक्र ार केली आहे. या परिसरात असलेल्या राक्यान कंपनीतून नदीच्या पात्रात दूषित पाणी सोडले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रकरणात लक्ष घालून संबंधितावर कारवाई करण्याची विनंती त्यांनी पत्राद्वारे केली आहे. पनवेल तालुक्यातील तळोजा औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणाचा विषय गंभीर बनत चालला आहे.कासाडी नदी दूषित झाल्यामुळे नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे धाव घेतली आहे. शहरी भागातील नद्यांची दयनीय अवस्था झाली असून ग्रामीण भागातील नद्या देखील प्रदूषित होत असल्याने ग्रामस्थांमध्ये यासंदर्भात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.जेडब्लूसी कंपनीशी करार करून संबंधित जागा भाडेतत्त्वावर घेतली आहे. आमची सर्व माहिती जेडब्लूसीकडे उपलब्ध असल्याने यासंदर्भात जेडब्लूसी व्यवस्थापनाशी संपर्क साधावा.- रंजित कौर, व्यवस्थापक, राक्यान कंपनीसंबंधित प्रकाराची सविस्तर माहिती घेण्यासाठी त्या परिसराची पाहणी केली जाईल. पाहणी केल्यानंतर यासंदर्भात भाष्य करणे उचित होईल.- संदीप पवार, व्यवस्थापक, जेडब्लूसीग्रामस्थांनी केलेल्यातक्र ारीची शहानिशा केली जाईल. या प्रकारात दोषी आढळलेल्या कारखान्यावर निश्चितच कारवाई करण्यात येईल.- सचिन आडकर,अधिकारी, महाराष्ट्रप्रदूषण नियंत्रण मंडळ

टॅग्स :riverनदीpollutionप्रदूषणRaigadरायगड