शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर हा फक्त ट्रेलर, आता पाकिस्तानची एक-एक इंच जमीन ब्रह्मोसच्या रेंजमध्ये..."
2
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
3
'मिआ बाय तनिष्क'च्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अनीत पड्डाची निवड, 'प्रेशियस, एव्हरी डे' या फेस्टिव्ह मोहिमेतून केले पदार्पण
4
शेवटी आईच ती! आजारी लेकीसाठी धडपड, उचललं खांद्यावर; मदत न मिळाल्याने रस्त्यातच मृत्यू
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांचे 'रॉकेट' जमिनीवरच, भारतानं वाढवली रशियन तेल खरेदी!
6
Tejashwi Yadav: तेज प्रताप यादवांनी भावाविरोधात उतरवला उमेदवार, राघोपूरमधून प्रेम कुमार यादव लढणार
7
'या'साठी रशियासोबत भागीदारी करण्याच्या तयारीत भारत, चीनला झटका देणार; अवलंबित्व कमी करणार
8
सणासुदीच्या दिवसांत दोन अपघात; नंदुरबारमध्ये सात भाविकांचा बळी, समृद्धीवर म्यानमारच्या नागरिकांचा अपघाती अंत
9
"मोठे नेते गैरसमजातून बोलले, पण इतकी वर्षे..."; भुजबळांच्या शाब्दिक हल्ल्यानंतर विखे-पाटलांचे स्पष्टीकरण
10
केवळ ५ वर्षांत ३५ लाख रुपयांचा फंड; पैशांचा पाऊस पाडणारी ही पोस्टाची स्कीम कोणती? जाणून घ्या
11
Radhika Yadav Case: "आत्मसन्मानाला ठेच, मी माझ्या मुलीची हत्या केली..."; टेनिसपटू राधिका यादवच्या वडिलांची कबुली
12
कुंडली न जुळवता लग्न केलं तर होऊ शकते हत्या; बनारस हिंदू विद्यापीठाचे धक्कादायक संशोधन, काय म्हटलंय?
13
Mumbai Fire: मालाडमध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग; आकाशात दिसले धुराचे लोट, परिसरात भीतीचे वातावरण
14
‘महायुती सरकारमध्ये छगन भुजबळ मंत्री ,२ सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याची जबाबदारी त्यांची’, विजय वडेट्टीवार यांनी सुनावले
15
हॉटेलचा बेड पाहूनच ग्राहकाची झोप उडाली! असं काय पाहिलं की, मालकाला १ लाखांचा दंड द्यावा लागला? 
16
Diwali Special Recipe: गॅसचा वापर न करता, घरच्या साहित्यात करा हलवाईसारखी रुचकर मिठाई
17
डॉक्टर जावयाने स्किन स्पेशलिस्ट लेकीला संपवलं; वडिलांचा मोठा निर्णय, ३ कोटीचं घर केलं दान
18
३ महिन्यांमध्ये १००० कोटी रुपयांचा फायदा; चांदीच्या किमतीनं 'यांना' केलं मालामाल
19
Happy Diwali 2025 Wishes: दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status च्या माध्यमातून देऊन आनंदात साजरा करा दीपावलीचा सण!
20
परळच्या फ्लॅटमध्ये व्यापाऱ्याला केलं 'टॉर्चर'; जुन्या वादातून अपहरण करुन ७६ लाखांची वसूली, महिलेचाही सहभाग

कर्जतमध्ये शिक्षकांकडूनच सर्व शिक्षा अभियानाला हरताळ, शिक्षकांची सोयीनुसार शाळेत हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 02:27 IST

कर्जत तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळांचा अक्षरश: बोजवारा उडाला आहे. अनेक ठिकाणी नादुस्त इमारती, शिक्षकांची कमतरता तर दुर्गम भागात शिक्षक सोईनुसार हजेरी लावत असल्याने सर्व शिक्षा अभियानाला हरताळ फासला गेला आहे

- कांता हाबळेनेरळ : कर्जत तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळांचा अक्षरश: बोजवारा उडाला आहे. अनेक ठिकाणी नादुस्त इमारती, शिक्षकांची कमतरता तर दुर्गम भागात शिक्षक सोईनुसार हजेरी लावत असल्याने सर्व शिक्षा अभियानाला हरताळ फासला गेला आहे; परंतु याकडे ना शाळा व्यवस्थापन समितीचे, ना शिक्षणविभागाचे लक्ष. शाळेत उशिरा येणाऱ्या शिक्षकांची वाट पाहून कंटाळलेले विद्यार्थी यामुळे शाळा ओस पडत असून, विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.सर्व मुलांना शिक्षणाचा अधिकार आहे, त्यानुसार कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या दुर्गम भागातदेखील शाळा आहेत. कर्जत तालुक्यातील अधिकांश भाग हा आदिवासीबहुल भाग आहे. त्यामुळे दुर्गम भागात असलेल्या शाळेत मुले आपले प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत पूर्ण करतात. मुले म्हणजे कच्ची माती, या मातीला मडक्याला आकार देण्याचे काम त्यांचे गुरू करतात. मात्र, शाळेत शिक्षकच उशीरा येत असतील, तर ही परिस्थिती ओढवणारच आहे. कर्जत तालुक्यातील शाळेत शिक्षक वेळेवर जात नसल्याने तसेच ट्रेन मिळवण्यासाठी सायंकाळी लवकरच पळ काढत असल्याचे समोर आले आहे. अशा शिक्षकांवर लोकप्रतिनिधी, शाळा व्यवस्थापन समिती तसेच शिक्षण विभागाचा धाक नसल्याचे दिसून येत आहे. या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.सोमवारी कळंब ग्रामपंचायत हद्दीतील सुतारपाडा येथील जिल्हा परिषद शाळेतील दोन्ही शिक्षक काम असल्याचे कारण सांगून उशिरा आले. तोपर्यंत कंटाळलेले अर्धे विद्यार्थी घरी निघून गेले, तर इतर विद्यार्थ्यांनी शाळेच्या बाहेर खेळ मांडला. तर नांदगाव ग्रामपंचायत हद्दीतील भोपळेवाडी येथे दुपारी १२ वाजेपर्यंत शिक्षक गायब असल्याने विद्यार्थ्यांनीही वर्गातून पळ काढला होता. दुर्गम भागातील अशा अनेक शाळांमधील शिक्षक हे आपल्या सोईनुसार शाळेत येत असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. या प्रकारामुळे उज्ज्वल भारत घडणार कसा? हा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. तर जिल्हा परिषद ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकले पाहिजेत म्हणून घेत असलेली मेहनत वाया जात आहे. यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याला जबाबदार कोण? काही शाळांमध्ये विद्यार्थी उशिरा आला तर शिक्षक त्यांना शिक्षा करतात. मग अशा सोईनुसार शाळेत येणाºया शिक्षकांवर कोण कारवाई करणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने त्यांच्या स्तरावर अशा उशिरा येणाºया शिक्षकांवर भरारी पथके नेमून कारवाई करणे क्रमप्राप्त आहे. तसा अहवाल आमच्याकडे द्यावा, त्यानुसार कारवाईचा निर्णय घेऊ.- नितीन मंडलिक, शिक्षणाधिकारी,प्राथमिक राजिपग्रामीण भागात शिक्षक शाळेत वेळेवर जात नसल्याची तक्रार आमच्याकडे आली आहे. त्यानुसार पंचायत समितीमध्ये चर्चादेखील झाली आहे. त्यामुळे आम्ही भरारी पथके नेमून वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आशा शिक्षकांवर कारवाई करणार आहोत.- धनसिंग राजपूत, प्रभारी गटशिक्षणाधिकारीआमच्या ग्रामीण भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेशिवाय प्राथमिक शिक्षणाची सोय नसते. आमचे आदिवासी पालक गरीब असल्याने त्यांच्या मुलांना मोठ्या शाळेत घालू शकत नाहीत, म्हणून आमची सगळी मुले रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतात. मात्र, शिक्षक उशिरा शाळेत येत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असेल तर आम्ही हे खपवून घेणार नाही. शिक्षण विभागाने वेळेत त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.- जैतू पारधी,माजी अध्यक्ष,आदिवासी संघटना

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रKarjatकर्जतRaigadरायगड