शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्याने कळंबोली जलमय

By वैभव गायकर | Updated: July 7, 2024 15:45 IST

पनवेलमध्ये 121 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. त्यात समुद्रात भरती असल्याने पाण्याचा निचरा योग्य रित्या होऊ शकला नाही.

पनवेल - शनिवारी मध्यरात्रीपासुन सुरु असलेल्या जोरदार पावसाचा सर्वात जास्त परिणाम कळंबोली शहरात पहावयास मिळाला. रविवार दि.7 रोजी सकाळी 8 च्या सुमारास कळंबोली शहरात पाणी साचण्यास सुरुवात झाली. अनेक नागरिकांच्या घरात देखील पाणी शिरले तसेच रस्त्यावर पार्क केलेल्या दुचाकी व चारचाकी पाण्याखाली गेल्या होत्या.

काही तासातच पनवेलमध्ये 121 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. त्यात समुद्रात भरती असल्याने पाण्याचा निचरा योग्य रित्या होऊ शकला नाही. त्यामुळे कळंबोली शहरात अनेक भागात पाणी साचल. केएल 2,4,5,6, आदींसह सेक्टर 1,2,4,5,6 बिमा कॉम्प्लेक्स ते कळंबोली पोलीस ठाणे परिसरात पाणी साचले. काही घरात देखील पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाल. कळंबोली मधील मुख्य रस्ता पाण्याखाली गेल्याने या मार्गावर एनएमएमटी,बेस्ट च्या बस बंद पडल्या याचाच परिणाम वाहतुकीवर झाला. बस बंद पडल्याने या रस्त्यावरील चार चाकी गाड्या देखील पाण्यात अडकल्या.

शहरात  50 दुचाकी, 25 चारचाकी पाण्याखाली गेल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले.पावसाचा जोर 12 च्या सुमारास कमी होत गेल्याने साचलेले पाणी हळू हळू ओसरले.दरम्यान शहरात अर्धवट नालेसफाई व पावसाळ्याच्या तोंडावर हाती घेतलेल्या विकासकामांमुळे हि परिस्थिती ओढवली असल्याचा आरोप शेकापचे माजी नगरसेवक रवींद्र भगत यांनी केला.सत्ताधारी भाजपवर भगत यांनी यावेळी आरोप केले.

शहरात अनेक रस्त्याची आणि गटारांची कामे सुरु आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर ही कामे हाती घेतल्याने शहरात अनेक ठिकाणी नागरिकांची गैरसोय झाली. या कामांचे टायमिंग चुकल्याची देखील चर्चा आहे. होल्डिंग पॉडमधील गाळ न काढल्यामुळे देखील पॉडची पाणी साठवणूक क्षमता कमी झाल्याने देखील शहरातील पाण्याच्या निचऱ्यावर परिणाम झाले.

2005 ची आठवण ताजी -2005 च्या महापुराचा सर्वात जास्त फटका कळंबोली शहराला बसला होता.रविवारच्या पावसाने अनेक घरात पाणी शिरल्याने 2005 ची आठवणी ताज्या झाल्या असल्याचे रहिवाशांनी सांगितले.

सीईटीपीचे दूषित पाणी रस्त्यावर -तळोजा एमआयडीसी मध्ये देखील विविध ठिकाणी यावेळी पाणी साचले होते.एमआयडीसी मधील दूषित पाण्यावर प्रक्रिया केली जाते.या सीईटीपी केंद्रात देखील पाणी साचल्याने पूर्ण दूषित पाणी रस्त्यावर आले होते.

चार ते पाच तासातच 121 मिमी पाऊस पनवेल परिसरात पडले.त्यातच समुद्राला भरती असल्याने पाण्याचा निचरा होऊ शकला नसल्याने कळंबोलीत ही समस्या उद्भवली. मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे व्यवस्थितरित्या पूर्ण करण्यात आली आहेत. होल्डिंग पॉण्डची क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने गाळ काढण्यात येईल.- मंगेश चितळे (आयुक्त,पनवेल महानगरपालिका)

टॅग्स :panvelपनवेलRainपाऊस