शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्याने कळंबोली जलमय

By वैभव गायकर | Updated: July 7, 2024 15:45 IST

पनवेलमध्ये 121 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. त्यात समुद्रात भरती असल्याने पाण्याचा निचरा योग्य रित्या होऊ शकला नाही.

पनवेल - शनिवारी मध्यरात्रीपासुन सुरु असलेल्या जोरदार पावसाचा सर्वात जास्त परिणाम कळंबोली शहरात पहावयास मिळाला. रविवार दि.7 रोजी सकाळी 8 च्या सुमारास कळंबोली शहरात पाणी साचण्यास सुरुवात झाली. अनेक नागरिकांच्या घरात देखील पाणी शिरले तसेच रस्त्यावर पार्क केलेल्या दुचाकी व चारचाकी पाण्याखाली गेल्या होत्या.

काही तासातच पनवेलमध्ये 121 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. त्यात समुद्रात भरती असल्याने पाण्याचा निचरा योग्य रित्या होऊ शकला नाही. त्यामुळे कळंबोली शहरात अनेक भागात पाणी साचल. केएल 2,4,5,6, आदींसह सेक्टर 1,2,4,5,6 बिमा कॉम्प्लेक्स ते कळंबोली पोलीस ठाणे परिसरात पाणी साचले. काही घरात देखील पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाल. कळंबोली मधील मुख्य रस्ता पाण्याखाली गेल्याने या मार्गावर एनएमएमटी,बेस्ट च्या बस बंद पडल्या याचाच परिणाम वाहतुकीवर झाला. बस बंद पडल्याने या रस्त्यावरील चार चाकी गाड्या देखील पाण्यात अडकल्या.

शहरात  50 दुचाकी, 25 चारचाकी पाण्याखाली गेल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले.पावसाचा जोर 12 च्या सुमारास कमी होत गेल्याने साचलेले पाणी हळू हळू ओसरले.दरम्यान शहरात अर्धवट नालेसफाई व पावसाळ्याच्या तोंडावर हाती घेतलेल्या विकासकामांमुळे हि परिस्थिती ओढवली असल्याचा आरोप शेकापचे माजी नगरसेवक रवींद्र भगत यांनी केला.सत्ताधारी भाजपवर भगत यांनी यावेळी आरोप केले.

शहरात अनेक रस्त्याची आणि गटारांची कामे सुरु आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर ही कामे हाती घेतल्याने शहरात अनेक ठिकाणी नागरिकांची गैरसोय झाली. या कामांचे टायमिंग चुकल्याची देखील चर्चा आहे. होल्डिंग पॉडमधील गाळ न काढल्यामुळे देखील पॉडची पाणी साठवणूक क्षमता कमी झाल्याने देखील शहरातील पाण्याच्या निचऱ्यावर परिणाम झाले.

2005 ची आठवण ताजी -2005 च्या महापुराचा सर्वात जास्त फटका कळंबोली शहराला बसला होता.रविवारच्या पावसाने अनेक घरात पाणी शिरल्याने 2005 ची आठवणी ताज्या झाल्या असल्याचे रहिवाशांनी सांगितले.

सीईटीपीचे दूषित पाणी रस्त्यावर -तळोजा एमआयडीसी मध्ये देखील विविध ठिकाणी यावेळी पाणी साचले होते.एमआयडीसी मधील दूषित पाण्यावर प्रक्रिया केली जाते.या सीईटीपी केंद्रात देखील पाणी साचल्याने पूर्ण दूषित पाणी रस्त्यावर आले होते.

चार ते पाच तासातच 121 मिमी पाऊस पनवेल परिसरात पडले.त्यातच समुद्राला भरती असल्याने पाण्याचा निचरा होऊ शकला नसल्याने कळंबोलीत ही समस्या उद्भवली. मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे व्यवस्थितरित्या पूर्ण करण्यात आली आहेत. होल्डिंग पॉण्डची क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने गाळ काढण्यात येईल.- मंगेश चितळे (आयुक्त,पनवेल महानगरपालिका)

टॅग्स :panvelपनवेलRainपाऊस