शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत भरावासाठी जेएसडब्ल्यू कं पनीला पाच कोटी ३७ लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 01:58 IST

सरकारच्या प्रचलित नियमानुसार बाजारमूल्याचे दर प्रतिब्रास ४९८ रुपये इतका आहे.

- आविष्कार देसाईअलिबाग : डोलवी येथील जेएसडब्ल्यू स्टील लि. कंपनीने दहा शेतकऱ्यांच्या खासगी शेतजमिनीमध्ये मातीचा भराव (राखेचा स्लॅक) करणे महागात पडले आहे. या प्रकरणी अलिबागच्या प्रांताधिकारी शारदा पोवर यांनी कंपनीला तब्बल पाच कोटी ३७ लाख ५१ हजार ६३० रुपयांचा दंड ठोठावला आहे. तब्बल सात महिने उलटून गेली तरी अद्याप त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात प्रशासनाला यश आले नाही.मौजे शहाबाज येथील ग.नं. ६१८/०, ७९६/०, ६९७/०, ५२२/अ, ५१०/०, ७२०/०, ७१८/०, ७१७/०, ७१४/० आणि ७८८/० या मिळकतीमध्ये जेएसडब्ल्यू स्टील लि. कंपनीने कंपनीतून निघणाºया मातीचा (राखेचा स्लॅक) भराव विनापरवाना केला असल्याचे दिसून येते. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी याबाबतची तक्रार केली होती. शेतकºयांच्या तक्र ारीनुसार तसेच शहाबाज तलाठी यांच्या अहवालानुसार प्रांत कार्यालयामध्ये फौजदारी संहिता कलम १३३ नुसार ३० मार्च २०१९ रोजी सुनावणी घेण्यात आली होती. या सुनावणीच्या वेळी जेएसडब्ल्यूचे प्रतिनिधी गैरहजर राहिल्याने त्यानंतरची सुनावणी ९ एप्रिल २०१९ रोजी लावण्यात आली होती. दरम्यान, प्रांताधिकाºयांनी १ एप्रिल रोजी कंपनीला दंड ठोठावण्यात आल्याची नोटीस काढली.सरकारच्या प्रचलित नियमानुसार बाजारमूल्याचे दर प्रतिब्रास ४९८ रुपये इतका आहे. मातीच्या उत्खननाची दंडाची रक्कम बाजारमूल्याच्या पाचपट म्हणजेच प्रति ब्रास २४९० होती. त्यानुसार जेएसडब्ल्यूने विनापरवाना केलेल्या एकूण २१ हजार ५८७ ब्रास मातीसाठी एकूण पाच कोटी ३७ लाख ५१ हजार ६३० इतका दंड भरण्याचे आदेश जेएसडब्ल्यू कंपनीला बजावले होते. त्यानंतर दोन सुनावण्या झाल्या आहेत. मात्र, अद्यापही कंपनीने दंडाची रक्कम भरली नसल्याचे प्रातांधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले. या प्रकाराला सर्वच अधिकारी जबाबदार आहेत. परिसरातील प्रदूषण आणि पर्यावरणाची कोणालाही चिंता नाही. शेती हा आमचा प्रमुख व्यवसाय आहे. राखेच्या प्रदूषणामुळे शेती करणे आता शक्य होत नाही. शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. जलस्रोत प्रदूषित झाल्याने पाणी पिण्यायोग्य राहिले नाही. कंपनीविरोधात यापुढे थेट फौजदारी गुन्हेच दाखल करणे गरजेचे आहे, असे शहाबाजचे ग्रामस्थ द्वारकानाथ पाटील यांनी सांगितले.जेएसडब्ल्यू कंपनीने दहा शेतकºयांच्या खासगी शेत जमिनीमध्ये बेकायदा भराव केलेला आहे. त्यामुळे जेएसडब्ल्यू कंपनीला या प्रकरणी पाच कोटी ३७ लाख ५१ हजार ६३० इतका दंड भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अद्याप दंडाची रक्कम भरलेली नाही. या प्रकरणाच्या सुनावण्या आता पूर्ण होऊन प्रकरण निकालावर ठेवण्यात आले आहे.- शारदा पोवार,प्रांताधिकारी, अलिबाग

टॅग्स :Raigadरायगड