शहरं
Join us  
Trending Stories
1
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
2
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
3
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
4
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
5
त्रिभाषा धोरणाला राज्यभरात कसा प्रतिसाद? डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले, “पहिलीपासून हिंदी सक्ती...”
6
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
7
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
8
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
9
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
10
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
11
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
12
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
13
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
14
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
15
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
16
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट
17
Life Lesson: प्रत्येकाची वेळ येते, पण तयारी असावी लागते शेफाली वर्मासारखी आणि 'या' गोष्टीसारखी!
18
जामताडा बनण्याच्या मार्गावर 'हे' शहर; 615 सायबर ठगांना अटक, 100 कोटींची फसवणूक उघड
19
ICC Women's World Cup Winners : "विजयी विश्व तिरंगा प्यारा..." भारतीय 'रन'रागणींनी रचला इतिहास
20
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा

अनधिकृत भरावासाठी जेएसडब्ल्यू कं पनीला पाच कोटी ३७ लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 01:58 IST

सरकारच्या प्रचलित नियमानुसार बाजारमूल्याचे दर प्रतिब्रास ४९८ रुपये इतका आहे.

- आविष्कार देसाईअलिबाग : डोलवी येथील जेएसडब्ल्यू स्टील लि. कंपनीने दहा शेतकऱ्यांच्या खासगी शेतजमिनीमध्ये मातीचा भराव (राखेचा स्लॅक) करणे महागात पडले आहे. या प्रकरणी अलिबागच्या प्रांताधिकारी शारदा पोवर यांनी कंपनीला तब्बल पाच कोटी ३७ लाख ५१ हजार ६३० रुपयांचा दंड ठोठावला आहे. तब्बल सात महिने उलटून गेली तरी अद्याप त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात प्रशासनाला यश आले नाही.मौजे शहाबाज येथील ग.नं. ६१८/०, ७९६/०, ६९७/०, ५२२/अ, ५१०/०, ७२०/०, ७१८/०, ७१७/०, ७१४/० आणि ७८८/० या मिळकतीमध्ये जेएसडब्ल्यू स्टील लि. कंपनीने कंपनीतून निघणाºया मातीचा (राखेचा स्लॅक) भराव विनापरवाना केला असल्याचे दिसून येते. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी याबाबतची तक्रार केली होती. शेतकºयांच्या तक्र ारीनुसार तसेच शहाबाज तलाठी यांच्या अहवालानुसार प्रांत कार्यालयामध्ये फौजदारी संहिता कलम १३३ नुसार ३० मार्च २०१९ रोजी सुनावणी घेण्यात आली होती. या सुनावणीच्या वेळी जेएसडब्ल्यूचे प्रतिनिधी गैरहजर राहिल्याने त्यानंतरची सुनावणी ९ एप्रिल २०१९ रोजी लावण्यात आली होती. दरम्यान, प्रांताधिकाºयांनी १ एप्रिल रोजी कंपनीला दंड ठोठावण्यात आल्याची नोटीस काढली.सरकारच्या प्रचलित नियमानुसार बाजारमूल्याचे दर प्रतिब्रास ४९८ रुपये इतका आहे. मातीच्या उत्खननाची दंडाची रक्कम बाजारमूल्याच्या पाचपट म्हणजेच प्रति ब्रास २४९० होती. त्यानुसार जेएसडब्ल्यूने विनापरवाना केलेल्या एकूण २१ हजार ५८७ ब्रास मातीसाठी एकूण पाच कोटी ३७ लाख ५१ हजार ६३० इतका दंड भरण्याचे आदेश जेएसडब्ल्यू कंपनीला बजावले होते. त्यानंतर दोन सुनावण्या झाल्या आहेत. मात्र, अद्यापही कंपनीने दंडाची रक्कम भरली नसल्याचे प्रातांधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले. या प्रकाराला सर्वच अधिकारी जबाबदार आहेत. परिसरातील प्रदूषण आणि पर्यावरणाची कोणालाही चिंता नाही. शेती हा आमचा प्रमुख व्यवसाय आहे. राखेच्या प्रदूषणामुळे शेती करणे आता शक्य होत नाही. शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. जलस्रोत प्रदूषित झाल्याने पाणी पिण्यायोग्य राहिले नाही. कंपनीविरोधात यापुढे थेट फौजदारी गुन्हेच दाखल करणे गरजेचे आहे, असे शहाबाजचे ग्रामस्थ द्वारकानाथ पाटील यांनी सांगितले.जेएसडब्ल्यू कंपनीने दहा शेतकºयांच्या खासगी शेत जमिनीमध्ये बेकायदा भराव केलेला आहे. त्यामुळे जेएसडब्ल्यू कंपनीला या प्रकरणी पाच कोटी ३७ लाख ५१ हजार ६३० इतका दंड भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अद्याप दंडाची रक्कम भरलेली नाही. या प्रकरणाच्या सुनावण्या आता पूर्ण होऊन प्रकरण निकालावर ठेवण्यात आले आहे.- शारदा पोवार,प्रांताधिकारी, अलिबाग

टॅग्स :Raigadरायगड