शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

जेएनपीएची स्वप्नपूर्ती कंटेनर हाताळणीची क्षमता पाेहाेचणार एक कोटीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 12:27 IST

पोर्ट सिंगापूर असोसिएशन, भारत मुंबई कंटेनर टर्मिनल अशा टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या या बंदरामुळे जेएनपीए बंदराची कंटेनरहाताळणीची क्षमता येत्या काही महिन्यांतच एक कोटी चार लाखांपर्यंत पोहोचणार आहे.

- मधुकर ठाकूर उरण : जेएनपीएच्या आठ हजार कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या सर्वांत मोठी लांबी आणि क्षमतेच्या चौथ्या बंदराच्या दुसऱ्या अंतिम टप्प्यातील काम पूर्णत्वात आले आहे. पोर्ट सिंगापूर असोसिएशन, भारत मुंबई कंटेनर टर्मिनल अशा टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या या बंदरामुळे जेएनपीए बंदराची कंटेनरहाताळणीची क्षमता येत्या काही महिन्यांतच एक कोटी चार लाखांपर्यंत पोहोचणार आहे.चौथ्या बंदराच्या चार हजार कोटींच्या पहिल्या टप्प्याच्या कामाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २०१७ मध्ये झाला होता. मात्र, कोविड महामारीत अडकल्यामुळे कामाला विलंब झाला. या विलंबामुळे जेएनपीएच्या आर्थिक नफ्यालाही थोड्याफार फरकाने फटका बसला आहे.

जेएनपीएची कंटेनर हाताळणी बंदराची सागरी  क्षमता वाढविण्याची आणि आंतरराष्ट्रीय बेंचमार्क प्रस्थापित करण्याची व बदलण्याची क्षमता या विकसित केलेल्या चौथा कंटेनर टर्मिनलमध्ये आहे. बंदर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर वार्षिक ४८ लाख कंटेनरची हाताळणी होणार आहे.

धोरणात्मक महत्त्वचौथे कंटेनर टर्मिनल हा केवळ विस्तार नाही, तर जागतिक सागरी केंद्र म्हणून जेएनपीएचे स्थान मजबूत होणार आहे. सागरी व्यापाराचे वाढते प्रमाण आणि कंटेनर जहाजांच्या वाढत्या आकारामुळे भविष्यातील पायाभूत सुविधांची गरज भागविणारे हे टर्मिनल असणार आहे.

आर्थिक वाढीला चालनावाढीव कार्यक्षमता थेट लॉजिस्टिक खर्च कमी करून आयात-निर्यातीवर अवलंबून असलेल्या उद्योगांसाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. शिवाय रोजगार संधी वाढविण्यासाठी, वाहतूक, गोदामांसह सहायक क्षेत्रांना चालना मिळणार आहे. 

नावीन्यपूर्ण बदलबंदराच्या उभारणीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा व यंत्रसामग्रीचा वापर केला असून, यामध्ये दोन सुपर पोस्ट-पनामॅक्स रेल माऊंटेड क्वे क्रेन (आरएमक्यूसी) आणि सहा ऊर्जा-कार्यक्षम ई-रबर टायर्ड गॅन्ट्री (आरटीजी) क्रेन्सचा समावेश आहे. कंटेनर हाताळणीची क्षमता १० दशलक्ष टीईयू इतकी अविश्वसनीय वाढली आहे. हा पुढचा टप्पा भारताच्या सागरी उद्योगाला वाढीव कार्यक्षमतेसह अधिक सक्षम करणार आहे.४८ लाखकंटेनर हाताळणीची क्षमता  चाैथ्या बंदराची असणार आहे. त्यामुळे येत्या कालावधीत एकूणच जेएनपीए बंदरातून कंटेनर हाताळणी काेट्यवधीवर जाणार आहे. 

चौथ्या कंटेनर टर्मिनलच्या दुसऱ्या टप्प्यातील काम अंतिम टप्प्यात आले आहे. बंदर क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर १० दशलक्ष टीईयू (एक कोटी कंटेनर) हाताळण्यास सक्षम होणार आहे. त्यामुळे भारताच्या सागरी व्यापारामागील एक प्रमुख शक्ती जेएनपीएचे स्थान आणखीनच मजबूत होणार आहे.उन्मेष शरद वाघ, अध्यक्ष, जेएनपीए 

टॅग्स :Raigadरायगड