शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

‘जेरुसलेम गेट’ होणार जागतिक पर्यटन स्थळ, तब्बल २०० ज्यू धर्मीय बांधवांची नवगावला भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2018 14:27 IST

सुमारे दोन हजार वर्षापूर्वी भरकटलेल्या जहाजाद्वारे इस्त्रायली लोक अलिबाग तालुक्यातील नवगाव या ठिकाणी आश्रयाला उतरले.

- जयंत धुळप

अलिबाग- सुमारे दोन हजार वर्षापूर्वी भरकटलेल्या जहाजाद्वारे इस्त्रायली लोक अलिबाग तालुक्यातील नवगाव या ठिकाणी आश्रयाला उतरले. भारतात ज्यू लोकांनी पहिल्यांदा ज्या ठिकाणी पाय ठेवले ते हे अलिबाग तालुक्यातील नवगाव ज्यू धर्मीयांमध्ये पवित्र ‘जेरुसलेम गेट’ म्हणून ओळखले जाते. याच ‘जेरुसलेम गेट’ स्थळाचा जागतिक पर्यटन स्थळ म्हणून विकास केला जाणार आहे. यासाठी इस्त्रायलमध्ये गेलेल्या ज्यू बांधवांनी रविवारी मकर संक्रांतीचं औचित्य साधून नवगाव या ठिकाणी भेट देवून भारतातील या आपल्या पहिल्या आश्रयस्थळाचा विकास करण्याचा संकल्प जाहीर करुन, भारत-इस्त्रायला मैत्रीचा गोडवा वृद्धिगत केला आहे. रविवारी इस्त्रायलमधील तब्बल 200  ज्यू नागरिकांनी नवगांवला भेट दिली. यामध्ये अमेरिका आणि फ्रान्समध्ये स्थायिक झालेल्या ज्यू बांधवांचाही समावेश होता अशी माहिती अलिबागेतच लहानाचे मोठे झालेले आणि आता इस्त्नाएल मध्ये वास्तव्यास असलेले जोनाथान मोझेस वाक्रुळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

तिळगुळ देवून मैत्रीचा धागा अधिक केला  बळकट यावेळी या सर्व ज्यूईश बांधवांनी नवगाव येथे आमदार जयंत पाटील यांच्याशी संवाद साधताना जेरुसलेम गेट या पवित्रस्थळाच्या विकासासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. विनंती मान्य करुन बोलताना आमदार जयंत पाटील यांनी, नवगाव या ठिकाणी असलेल्या ‘जेरुसलेम गेट’ या स्थळाचा विकास करताना स्मृतिस्तंभाची बांधणी, परिसराचे सुशोभिकरण, विद्युत व्यवस्था केली जाणार आहे. यासाठी एक  ट्रस्ट स्थापन केला जाणार असून पुरातत्व विभागाच्या तांत्रिक अडचणी येऊ नयेत यासाठी इतिहास तज्ज्ञांचा सल्ला घेतला जाईल असे आश्वासन दिले आहे. हिंदू-ज्यू संबंध अधिक वृद्धीगत व्हावेत, यासाठी जगभरातून नवगाव येथे आलेल्या ज्यू बांधवांनी आमदार जयंत पाटील यांना तीळगुळ देवून मैत्रीचा धागा अधिक बळकट केला. रायगडमधून ज्यू लोक जाऊन मोठा कालावधी लोटला आहे. तरीही त्यांनी येथील मातीशी नाते तोडलेले नाही. नवगाव या ठिकाणी दुरवस्थेत असलेले हे स्थळ विकसीत केल्यास भारत आणि इस्त्नाएलमधील नातेसंबंध अधिक दृढ होतील असा विश्वास आ.पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

‘जेरुसलेम गेट’ हे जागतिक शांततेचे प्रतिक होईलज्यू धर्मीयांवर जगातील अनेक देशांमध्ये अत्याचार झाले. मात्र, भारतात आलेल्या ज्यू धर्मीयांना सन्मानाची वागणूक मिळाली. दोन हजार वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीत हा समाज येथील इतर समाजाशी पूर्णपणो एकरुप झाला. आजच्या घडीला जगभर हदशतवादी हल्ले वाढत असताना ‘जेरुसलेम गेट’ हे जागतिक शांततेचे प्रतिक होईल, अशी भावना इस्त्नाएल मधील ज्येष्ठ ज्यू बांधव जॉनाथॉन सोलमन यांनी व्यक्त केली.

 स्थानिक समाजाने प्रेमाने आपलेसे केलेदोन धर्मामध्ये कसे नाते असावे याचे प्रतिक म्हणून ‘जेरुसलेम गेट’ हे स्थळ विकासीत होऊ शकते. जागतिक शांततेसाठी हे एक आदर्श असे नाते आहे. भारताच्या आश्रयाला आलेल्या ज्यू धर्मियांना येथील स्थानिक समाजाने प्रेमाने आपलेसे केले. याची नोंद या स्थळाच्या माध्यमातून घेतली जाईल, अशी भावना ज्यू धर्मीय कुस्तीपटू आणि सन 1972 मधील ‘भारत श्री’ किताबप्राप्त विजू पेणकर यांनी व्यक्त केली आहे. दोन हजार वर्षापूर्वी भारतात ज्या ठिकाणी  ज्यू बांधवांनी पहिल्यांदा पाऊल ठेवले ते  नवगाव येथील जेरु सलेम गेट चांगल्या प्रकारे विकसीत व्हावे, असे जगभरातील ज्यू धर्मियांना वाटत असते. यासाठी येथून गेलेली ज्यू मंडळी एकत्र येवून प्रयत्न करीत आहेत.त्या प्रयत्नांना आता नक्की यश येईल अशी भावना अमेरिकेत स्थाईक झालेले ज्यू धर्मीय जॉन पेरी पेझारकर यांनी व्यक्त केली आहे.पन्नास वर्षानंतरही आश्रयस्थळाशी नाते कायम

ज्यू बांधव नवगाव येथून इस्त्रायलमध्ये गेले त्या घटनेला पन्नास वर्षापेक्षाही जास्त कालावधी उलटून गेला आहे. तरीही त्यांचे आश्रयस्थळाशी असलेले नाते अजिबात तुटलेले नाही. आलेल्या ज्यू बांधवांपैकी बहुतेकजण उत्तम मराठीतूनच बोलत होते. येथे आल्यानंतर त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. त्यांचे जुने सहकारी भेटल्याने अनेकजण या जुन्या आठवणीने भारावून गेले होते.   

टॅग्स :Jerusalem Gateजेरुसलेम गेट