शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

अलिबागला जागतिक पातळीवर नेण्याचा संकल्प, जयंत पाटील यांचा मनोदय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 03:16 IST

टांझानिया देशात उद्योग सुरू करून सर्वांच्या नजरा आपल्याकडे वळवण्याची किमया शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केली आहे.

अलिबाग : एका छोट्याशा खेड्यात प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय सुरू करून आज थेट टांझानिया देशात उद्योग सुरू करून सर्वांच्या नजरा आपल्याकडे वळवण्याची किमया शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केली आहे. समाजकारण, राजकारण, सहकार अशा क्षेत्रात आपल्या कामाची छाप सोडतानाच परदेशात त्यांची एक यशस्वी उद्योजक अशी ओळख आहे. अलिबाग ते टांझानिया असे यशोशिखर गाठताना त्यांनी केलेले प्रयत्न आणि त्यांना आलेले अनुभव जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे, ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे, सचिन इटकर यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीतून उलगडले.जागतिक मराठी अकादमी, पीएनपी सांस्कृतिक कला विकास मंडळ व सेंटर फॉर ट्रान्स्फॉर्मिंग इंडियाच्या वतीने आयोजित ‘शोध मराठी मनाचा’ या जागतिक मराठी संमेलनात आमदार पाटील यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम पार पडला. अलिबागमध्ये प्रिंटिंग प्रेसचा पहिला व्यवसाय सुरू केला. परदेशात गेल्यानंततर क्रुझ, जलवाहतूक पाहून असे वाटायचे आपण समुद्राचा खरा उपयोग करतच नाही. नितीन गडकरी आणि माझ्यात साम्य आहे, आम्हाला व्यवसायाच्या संधी लगेच ध्यानात येतात. त्यामुळेच अलिबाग ते मुंबई प्रवासासाठी पहिली कॅटामरॅन आणली. त्या वेळी सात कोटींचे ते जहाज आॅस्ट्रेलियातून आणले होते. मात्र, भारत आणि आॅस्ट्रेलियातील समुद्रात मोठा फरक आहे. आपल्याकडे असलेल्या समुद्रातील कचऱ्यामुळे बोटीचे इंजिन वारंवार बंद पडायचे. त्या समस्येवर उपाय शोधला. सहा महिन्यात केवळ ६०० लोकांनीच या बोटीने प्रवास केला. मात्र, आज दररोज दहा हजार लोक या सुविधेचा लाभ घेतात. जलवाहतूक सुरू केल्यामुळे अलिबागचा चेहरा-मोहरा बदलला आहे. पर्यटन व्यवसाय फोफावला आहे. येणाºया काळात अलिबागला जागतिक पातळीवर नेण्याचा संकल्प आहे, असे पाटील म्हणाले.सातासमुद्रापार व्यवसाय करण्याची जिद्द होती. त्यातून दुबईत व्यवसाय केला. व्हिएतनाममध्ये बंदर विकासासाठी जागा मिळाली आहे. मागास किंवा विकसनशील देशांपेक्षा विकसित राष्ट्रांमध्ये व्यवसाय करणे सोपे आहे. मात्र, आमचे व्याही सतीश टकले एकदा टांझानियाला गेले. तेथील माहिती मिळाल्यानंतर आफ्रिकन गरीब देशांमध्ये व्यवसाय उभा करण्याचा निश्चय झाला आणि टांझानियाला गेल्या आठ महिन्यांत ५०० एकरात ऊस उभा केला. पुढील काही महिन्यांत उसाचे पीक हाती येताना तिथे साखर कारखाना उभा करणार आहे. तिथल्या सरकारने दहा हजार एकर जागा ऊस लागवडीसाठी देऊ केली आहे. पुढील दीड वर्षात तिथे ऊस लावणार आहे. टांझानियात सर्वाधिक साखर उत्पादन करणारा आमचा कारखाना असेल, असा विश्वासही आमदार पाटील यांनी व्यक्त केला. टांझानिया हा देश म्हणजे ५० वर्षांपूर्वीचा भारत आहे. मात्र, तेथील स्वच्छता, शिस्त, गुणवत्ता वाखाणण्याजोगी आहे, असेही ते म्हणाले.