शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला, दरवर्षी पाच लाखांहून अधिक नागरिकांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 05:31 IST

ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी महाराष्टÑासह देश-विदेशातून लाखो पर्यटकांची वर्षभर मुरूडमध्ये वर्दळ असते. हा किल्ला पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत येत असून, त्याची देखभाल व दुरुस्ती या खात्यामार्फत केली जात आहे.

मुरूड जंजिरा : ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी महाराष्टÑासह देश-विदेशातून लाखो पर्यटकांची वर्षभर मुरूडमध्ये वर्दळ असते. हा किल्ला पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत येत असून, त्याची देखभाल व दुरुस्ती या खात्यामार्फत केली जात आहे. मात्र पावसाळ्यात १ जून ते ३० आॅगस्ट या कालावधीत समुद्राला उधाण असल्याने किल्ल्यावर प्रवेशबंदी असते; शिवाय या काळात शिडाच्या होड्या चालवणेही सुरक्षित नसल्याने होड्या बंद असतात. मात्र आता शुक्रवार, १ सप्टेंबरपासून पर्यटकांना हा किल्ला पाहता येणार असल्याची घोषणा नुकतीच जंजिरा जलवाहतूक सोसायटीमार्फत करण्यात आली आहे. त्यामुळे आता हा किल्ला पर्यटनासाठी खुला झाला आहे.कोकण किनारपट्टीवरील साडेतीनशे वर्षांपूर्वी बांधलेला ऐतिहासिक जंजिरा जलदुर्ग हा वास्तुशिल्पाचा अजोड चमत्कार मानला जातो. सिद्दीविरु द्ध तब्बल चौदा वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांनी कडवी झुंज दिली. तथापि शिवरायांना हा किल्ला सर करता आला नाही. म्हणूनच इतिहासप्रेमी तथा अभ्यासक या अभेद्य जंजिºयाचे गुपित जाणून घेण्यासाठी राजपुरीला येतात.जंजिरा किल्ल्यावर दरवर्षी पाच लाखांपेक्षा जास्त पर्यटक भेटी देतात. त्यामुळे राजपुरी गावालगत राहणाºयांना स्वयंरोजगार मिळाला आहे. सुमारे २५ शिडाच्या होड्यांद्वारे पर्यटकांना किल्ल्यात नेले जाते. सूर्योदय व सूर्यास्त होईपर्यंत पर्यटकांना हा किल्ला पाहण्याची मुभा दिली जाते. २२ एकर परिसरात हा किल्ला व्याप्त असून, २२ बुरूज आहेत. त्याला ऐतिहासिक परंपरा लाभली असूनन, कलाल बांगडीसारखी अवाढव्य वजनाची मोठी तोफ किल्ल्यावर पाहायला मिळते. खाºया पाण्यात हा किल्ला असतानाही या ठिकाणी दोन गोड्या पाण्याचे तलाव आहेत.किल्ला पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत असला तरी येथील देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. गोड्या पाण्याचे तलाव स्वच्छ करण्याची गरज आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी दोन ठिकाणी भगदाड पडले आहे. ते अद्यापपर्यंत बुजविण्यात आलेली नाहीत. काही भागाची पडझड झाली असून, त्वरित दुरुस्तीची गरज असल्याची मागणी इतिहासप्रेमींकडून करण्यात येत आहे.- किल्ला पर्यटकांना खुला करण्यात आल्याने या ठिकाणी वर्दळ वाढणार आहे. त्यामुळे स्थानिकांचा रोजगार सुरू होणार आहे. पुरातत्त्व विभागाने हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी विशेषत्वाने मूलभूत सुविधा देण्याची गरज असल्याचे जंजिरा संस्थानचे अभ्यासक शरद चिटणीस यांनी सांगितले.