शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला, दरवर्षी पाच लाखांहून अधिक नागरिकांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 05:31 IST

ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी महाराष्टÑासह देश-विदेशातून लाखो पर्यटकांची वर्षभर मुरूडमध्ये वर्दळ असते. हा किल्ला पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत येत असून, त्याची देखभाल व दुरुस्ती या खात्यामार्फत केली जात आहे.

मुरूड जंजिरा : ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी महाराष्टÑासह देश-विदेशातून लाखो पर्यटकांची वर्षभर मुरूडमध्ये वर्दळ असते. हा किल्ला पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत येत असून, त्याची देखभाल व दुरुस्ती या खात्यामार्फत केली जात आहे. मात्र पावसाळ्यात १ जून ते ३० आॅगस्ट या कालावधीत समुद्राला उधाण असल्याने किल्ल्यावर प्रवेशबंदी असते; शिवाय या काळात शिडाच्या होड्या चालवणेही सुरक्षित नसल्याने होड्या बंद असतात. मात्र आता शुक्रवार, १ सप्टेंबरपासून पर्यटकांना हा किल्ला पाहता येणार असल्याची घोषणा नुकतीच जंजिरा जलवाहतूक सोसायटीमार्फत करण्यात आली आहे. त्यामुळे आता हा किल्ला पर्यटनासाठी खुला झाला आहे.कोकण किनारपट्टीवरील साडेतीनशे वर्षांपूर्वी बांधलेला ऐतिहासिक जंजिरा जलदुर्ग हा वास्तुशिल्पाचा अजोड चमत्कार मानला जातो. सिद्दीविरु द्ध तब्बल चौदा वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांनी कडवी झुंज दिली. तथापि शिवरायांना हा किल्ला सर करता आला नाही. म्हणूनच इतिहासप्रेमी तथा अभ्यासक या अभेद्य जंजिºयाचे गुपित जाणून घेण्यासाठी राजपुरीला येतात.जंजिरा किल्ल्यावर दरवर्षी पाच लाखांपेक्षा जास्त पर्यटक भेटी देतात. त्यामुळे राजपुरी गावालगत राहणाºयांना स्वयंरोजगार मिळाला आहे. सुमारे २५ शिडाच्या होड्यांद्वारे पर्यटकांना किल्ल्यात नेले जाते. सूर्योदय व सूर्यास्त होईपर्यंत पर्यटकांना हा किल्ला पाहण्याची मुभा दिली जाते. २२ एकर परिसरात हा किल्ला व्याप्त असून, २२ बुरूज आहेत. त्याला ऐतिहासिक परंपरा लाभली असूनन, कलाल बांगडीसारखी अवाढव्य वजनाची मोठी तोफ किल्ल्यावर पाहायला मिळते. खाºया पाण्यात हा किल्ला असतानाही या ठिकाणी दोन गोड्या पाण्याचे तलाव आहेत.किल्ला पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत असला तरी येथील देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. गोड्या पाण्याचे तलाव स्वच्छ करण्याची गरज आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी दोन ठिकाणी भगदाड पडले आहे. ते अद्यापपर्यंत बुजविण्यात आलेली नाहीत. काही भागाची पडझड झाली असून, त्वरित दुरुस्तीची गरज असल्याची मागणी इतिहासप्रेमींकडून करण्यात येत आहे.- किल्ला पर्यटकांना खुला करण्यात आल्याने या ठिकाणी वर्दळ वाढणार आहे. त्यामुळे स्थानिकांचा रोजगार सुरू होणार आहे. पुरातत्त्व विभागाने हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी विशेषत्वाने मूलभूत सुविधा देण्याची गरज असल्याचे जंजिरा संस्थानचे अभ्यासक शरद चिटणीस यांनी सांगितले.