शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला, दरवर्षी पाच लाखांहून अधिक नागरिकांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 05:31 IST

ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी महाराष्टÑासह देश-विदेशातून लाखो पर्यटकांची वर्षभर मुरूडमध्ये वर्दळ असते. हा किल्ला पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत येत असून, त्याची देखभाल व दुरुस्ती या खात्यामार्फत केली जात आहे.

मुरूड जंजिरा : ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी महाराष्टÑासह देश-विदेशातून लाखो पर्यटकांची वर्षभर मुरूडमध्ये वर्दळ असते. हा किल्ला पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत येत असून, त्याची देखभाल व दुरुस्ती या खात्यामार्फत केली जात आहे. मात्र पावसाळ्यात १ जून ते ३० आॅगस्ट या कालावधीत समुद्राला उधाण असल्याने किल्ल्यावर प्रवेशबंदी असते; शिवाय या काळात शिडाच्या होड्या चालवणेही सुरक्षित नसल्याने होड्या बंद असतात. मात्र आता शुक्रवार, १ सप्टेंबरपासून पर्यटकांना हा किल्ला पाहता येणार असल्याची घोषणा नुकतीच जंजिरा जलवाहतूक सोसायटीमार्फत करण्यात आली आहे. त्यामुळे आता हा किल्ला पर्यटनासाठी खुला झाला आहे.कोकण किनारपट्टीवरील साडेतीनशे वर्षांपूर्वी बांधलेला ऐतिहासिक जंजिरा जलदुर्ग हा वास्तुशिल्पाचा अजोड चमत्कार मानला जातो. सिद्दीविरु द्ध तब्बल चौदा वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांनी कडवी झुंज दिली. तथापि शिवरायांना हा किल्ला सर करता आला नाही. म्हणूनच इतिहासप्रेमी तथा अभ्यासक या अभेद्य जंजिºयाचे गुपित जाणून घेण्यासाठी राजपुरीला येतात.जंजिरा किल्ल्यावर दरवर्षी पाच लाखांपेक्षा जास्त पर्यटक भेटी देतात. त्यामुळे राजपुरी गावालगत राहणाºयांना स्वयंरोजगार मिळाला आहे. सुमारे २५ शिडाच्या होड्यांद्वारे पर्यटकांना किल्ल्यात नेले जाते. सूर्योदय व सूर्यास्त होईपर्यंत पर्यटकांना हा किल्ला पाहण्याची मुभा दिली जाते. २२ एकर परिसरात हा किल्ला व्याप्त असून, २२ बुरूज आहेत. त्याला ऐतिहासिक परंपरा लाभली असूनन, कलाल बांगडीसारखी अवाढव्य वजनाची मोठी तोफ किल्ल्यावर पाहायला मिळते. खाºया पाण्यात हा किल्ला असतानाही या ठिकाणी दोन गोड्या पाण्याचे तलाव आहेत.किल्ला पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत असला तरी येथील देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. गोड्या पाण्याचे तलाव स्वच्छ करण्याची गरज आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी दोन ठिकाणी भगदाड पडले आहे. ते अद्यापपर्यंत बुजविण्यात आलेली नाहीत. काही भागाची पडझड झाली असून, त्वरित दुरुस्तीची गरज असल्याची मागणी इतिहासप्रेमींकडून करण्यात येत आहे.- किल्ला पर्यटकांना खुला करण्यात आल्याने या ठिकाणी वर्दळ वाढणार आहे. त्यामुळे स्थानिकांचा रोजगार सुरू होणार आहे. पुरातत्त्व विभागाने हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी विशेषत्वाने मूलभूत सुविधा देण्याची गरज असल्याचे जंजिरा संस्थानचे अभ्यासक शरद चिटणीस यांनी सांगितले.