शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Corporation Election: विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत
2
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
3
तुमची इंडिगो फ्लाइट रद्द झाली होती का? आजपासून १०,००० रुपयांचे व्हाउचर मिळणार
4
Video : पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम उरकला अन् शोभेसाठी लावलेल्या झाडाच्या कुंड्या लोकांनी पळवल्या!
5
२७ महापालिकांत कुणाचे किती नगरसेवक? गेल्यावेळी भाजपचे...; ४३९ जागा जिंकून काँग्रेस होती तिसऱ्या क्रमांकावर
6
Stock Markets Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; Sensex १५० अंकांनी घरसला, BEL टॉप गेनर
7
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
8
विकी-कतरिनाच्या लेकाचा पहिला ख्रिसमस, अभिनेत्रीने शेअर केला फोटो; चाहते म्हणाले...
9
Investment Tips For Working Women: नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
10
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
11
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
12
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
13
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
14
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
15
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
16
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
17
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
18
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
19
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
20
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
Daily Top 2Weekly Top 5

‘गेल’ कंपनी बंद पडणे हा योगायोग नाही

By admin | Updated: August 20, 2016 00:40 IST

नवरत्न कंपन्यांच्या यादीतील असणाऱ्या गेल इंडिया कंपनीचा गाशा जवळपास गुंडाळण्यात आला आहे, तर दुसरीकडे रिलायन्सच्या गॅस पाइपलाइनचा प्रकल्प येऊ घातला

अलिबाग : नवरत्न कंपन्यांच्या यादीतील असणाऱ्या गेल इंडिया कंपनीचा गाशा जवळपास गुंडाळण्यात आला आहे, तर दुसरीकडे रिलायन्सच्या गॅस पाइपलाइनचा प्रकल्प येऊ घातला आहे. हा योगायोग नक्कीच नसल्याने या प्रश्नाच्या तळाशी जाण्यासाठी तीव्र आंदोलन छेडणार असल्याची माहिती शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.कर्जत तालुक्यातील रिलायन्स गॅस पाइपलाइनच्या मुद्यांवरून सध्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकारी असे द्वंद पेटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक आमदार सुरेश लाड हे गेली सात वर्षे या प्रश्नावर स्थानिक शेतकऱ्यांचा आवाज उठविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात आणि उपजिल्हाधिकारी अभय कलगुटकर यांच्यात धक्काबुक्की झाली होती. आमदार लाड यांनी कलगुटकर यांना मारहाण केल्याची तक्रार कर्जत पोलीस ठाण्यात दिल्याने आमदार लाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला. परंतु आमदार सुरेश लाड हे मारामारी करणारे अथवा तापट स्वभावाचे नाहीत, अशी क्लिन चीट आमदार जयंत पाटील यांनी दिली. आमदार लाड यांची भूमिका ही जनतेच्या आतला आवाज असावा, असेही त्यांनी सांगितले. सध्याचे अधिकारी हे स्वत:च सरकार असल्यासारखे वागत असल्याने हे लोकशाहीला धोकादायक आहे. लोकप्रतिनिधींची प्रशासनावरील पकड कमी पडत असल्याने अधिकाऱ्यांची मुजोरी वाढली असल्याची कबुलीही आमदार पाटील यांनी दिली. रिलायन्स कंपनी या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे सहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करीत आहे. दाभोळ ते गुजरात अशी पाइपलाइन टाकण्यात येत आहे. या प्रकल्पामध्ये अन्य उद्योगधंदे उभारण्यात येणार आहेत. बॉटलिंगचा प्लॅन्टही यामध्ये प्रस्तावित असल्याचे आमदार पाटील म्हणाले. या सर्व प्रकल्पाच्या माध्यमातून पुढील दोन वर्षातच त्यांचा पैसा वसूल होणार आहे. कंपनीने येथील शेतकऱ्यांच्या जमिनींना बाजारभावाच्या चार पट नुकसानभरपाई दिली पाहिजे. शेतकऱ्यांच्या जमिनींना बाजारभावाच्या चार पट नुकसानभरपाई दिली पाहिजे1कंपनीने येथील शेतकऱ्यांच्या जमिनींना बाजारभावाच्या चार पट नुकसानभरपाई दिली पाहिजे. शेतकऱ्यांची जमीन एकदा ताब्यात घेतल्यावर तेथील जमिनीच्या दोन्ही बाजूच्या सुमारे १५ फुटापर्यंत कोणतेच बांधकाम करता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होणार असल्याचेही आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले. 2रिलायन्सने अद्यापही आपला प्रकल्प अहवाल दिलेला नाही. किती जमीन जाणार आहे, किती शेतकरी बाधित होणार आहेत याची काहीच माहिती नाही. अलिबागमधील गेलचा प्रकल्प शेवटची घटका मोजत आहे, तर दुसरीकडे रिलायन्सचा गॅस प्रकल्प अवतरत आहे. हा निव्वळ योगायोग नसल्याने या प्रश्नाच्या तळाशी जाण्याची गरज आहे. 3येत्या पंधरा दिवसांमध्ये शेकाप आपली रणनीती तयार क रेल. शेतकऱ्यांचे यामध्ये नुकसान होत असून शेतकरी कामगार पक्ष यासाठी या विरोधातील आंदोलन तीव्र करुन शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहणार आहे. या आंदोलनात सर्वांना सहभागी करण्यात येणार असल्याचेही आमदार जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.