शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

‘गेल’ कंपनी बंद पडणे हा योगायोग नाही

By admin | Updated: August 20, 2016 00:40 IST

नवरत्न कंपन्यांच्या यादीतील असणाऱ्या गेल इंडिया कंपनीचा गाशा जवळपास गुंडाळण्यात आला आहे, तर दुसरीकडे रिलायन्सच्या गॅस पाइपलाइनचा प्रकल्प येऊ घातला

अलिबाग : नवरत्न कंपन्यांच्या यादीतील असणाऱ्या गेल इंडिया कंपनीचा गाशा जवळपास गुंडाळण्यात आला आहे, तर दुसरीकडे रिलायन्सच्या गॅस पाइपलाइनचा प्रकल्प येऊ घातला आहे. हा योगायोग नक्कीच नसल्याने या प्रश्नाच्या तळाशी जाण्यासाठी तीव्र आंदोलन छेडणार असल्याची माहिती शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.कर्जत तालुक्यातील रिलायन्स गॅस पाइपलाइनच्या मुद्यांवरून सध्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकारी असे द्वंद पेटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक आमदार सुरेश लाड हे गेली सात वर्षे या प्रश्नावर स्थानिक शेतकऱ्यांचा आवाज उठविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात आणि उपजिल्हाधिकारी अभय कलगुटकर यांच्यात धक्काबुक्की झाली होती. आमदार लाड यांनी कलगुटकर यांना मारहाण केल्याची तक्रार कर्जत पोलीस ठाण्यात दिल्याने आमदार लाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला. परंतु आमदार सुरेश लाड हे मारामारी करणारे अथवा तापट स्वभावाचे नाहीत, अशी क्लिन चीट आमदार जयंत पाटील यांनी दिली. आमदार लाड यांची भूमिका ही जनतेच्या आतला आवाज असावा, असेही त्यांनी सांगितले. सध्याचे अधिकारी हे स्वत:च सरकार असल्यासारखे वागत असल्याने हे लोकशाहीला धोकादायक आहे. लोकप्रतिनिधींची प्रशासनावरील पकड कमी पडत असल्याने अधिकाऱ्यांची मुजोरी वाढली असल्याची कबुलीही आमदार पाटील यांनी दिली. रिलायन्स कंपनी या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे सहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करीत आहे. दाभोळ ते गुजरात अशी पाइपलाइन टाकण्यात येत आहे. या प्रकल्पामध्ये अन्य उद्योगधंदे उभारण्यात येणार आहेत. बॉटलिंगचा प्लॅन्टही यामध्ये प्रस्तावित असल्याचे आमदार पाटील म्हणाले. या सर्व प्रकल्पाच्या माध्यमातून पुढील दोन वर्षातच त्यांचा पैसा वसूल होणार आहे. कंपनीने येथील शेतकऱ्यांच्या जमिनींना बाजारभावाच्या चार पट नुकसानभरपाई दिली पाहिजे. शेतकऱ्यांच्या जमिनींना बाजारभावाच्या चार पट नुकसानभरपाई दिली पाहिजे1कंपनीने येथील शेतकऱ्यांच्या जमिनींना बाजारभावाच्या चार पट नुकसानभरपाई दिली पाहिजे. शेतकऱ्यांची जमीन एकदा ताब्यात घेतल्यावर तेथील जमिनीच्या दोन्ही बाजूच्या सुमारे १५ फुटापर्यंत कोणतेच बांधकाम करता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होणार असल्याचेही आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले. 2रिलायन्सने अद्यापही आपला प्रकल्प अहवाल दिलेला नाही. किती जमीन जाणार आहे, किती शेतकरी बाधित होणार आहेत याची काहीच माहिती नाही. अलिबागमधील गेलचा प्रकल्प शेवटची घटका मोजत आहे, तर दुसरीकडे रिलायन्सचा गॅस प्रकल्प अवतरत आहे. हा निव्वळ योगायोग नसल्याने या प्रश्नाच्या तळाशी जाण्याची गरज आहे. 3येत्या पंधरा दिवसांमध्ये शेकाप आपली रणनीती तयार क रेल. शेतकऱ्यांचे यामध्ये नुकसान होत असून शेतकरी कामगार पक्ष यासाठी या विरोधातील आंदोलन तीव्र करुन शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहणार आहे. या आंदोलनात सर्वांना सहभागी करण्यात येणार असल्याचेही आमदार जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.