शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

‘गेल’ कंपनी बंद पडणे हा योगायोग नाही

By admin | Updated: August 20, 2016 00:40 IST

नवरत्न कंपन्यांच्या यादीतील असणाऱ्या गेल इंडिया कंपनीचा गाशा जवळपास गुंडाळण्यात आला आहे, तर दुसरीकडे रिलायन्सच्या गॅस पाइपलाइनचा प्रकल्प येऊ घातला

अलिबाग : नवरत्न कंपन्यांच्या यादीतील असणाऱ्या गेल इंडिया कंपनीचा गाशा जवळपास गुंडाळण्यात आला आहे, तर दुसरीकडे रिलायन्सच्या गॅस पाइपलाइनचा प्रकल्प येऊ घातला आहे. हा योगायोग नक्कीच नसल्याने या प्रश्नाच्या तळाशी जाण्यासाठी तीव्र आंदोलन छेडणार असल्याची माहिती शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.कर्जत तालुक्यातील रिलायन्स गॅस पाइपलाइनच्या मुद्यांवरून सध्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकारी असे द्वंद पेटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक आमदार सुरेश लाड हे गेली सात वर्षे या प्रश्नावर स्थानिक शेतकऱ्यांचा आवाज उठविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात आणि उपजिल्हाधिकारी अभय कलगुटकर यांच्यात धक्काबुक्की झाली होती. आमदार लाड यांनी कलगुटकर यांना मारहाण केल्याची तक्रार कर्जत पोलीस ठाण्यात दिल्याने आमदार लाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला. परंतु आमदार सुरेश लाड हे मारामारी करणारे अथवा तापट स्वभावाचे नाहीत, अशी क्लिन चीट आमदार जयंत पाटील यांनी दिली. आमदार लाड यांची भूमिका ही जनतेच्या आतला आवाज असावा, असेही त्यांनी सांगितले. सध्याचे अधिकारी हे स्वत:च सरकार असल्यासारखे वागत असल्याने हे लोकशाहीला धोकादायक आहे. लोकप्रतिनिधींची प्रशासनावरील पकड कमी पडत असल्याने अधिकाऱ्यांची मुजोरी वाढली असल्याची कबुलीही आमदार पाटील यांनी दिली. रिलायन्स कंपनी या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे सहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करीत आहे. दाभोळ ते गुजरात अशी पाइपलाइन टाकण्यात येत आहे. या प्रकल्पामध्ये अन्य उद्योगधंदे उभारण्यात येणार आहेत. बॉटलिंगचा प्लॅन्टही यामध्ये प्रस्तावित असल्याचे आमदार पाटील म्हणाले. या सर्व प्रकल्पाच्या माध्यमातून पुढील दोन वर्षातच त्यांचा पैसा वसूल होणार आहे. कंपनीने येथील शेतकऱ्यांच्या जमिनींना बाजारभावाच्या चार पट नुकसानभरपाई दिली पाहिजे. शेतकऱ्यांच्या जमिनींना बाजारभावाच्या चार पट नुकसानभरपाई दिली पाहिजे1कंपनीने येथील शेतकऱ्यांच्या जमिनींना बाजारभावाच्या चार पट नुकसानभरपाई दिली पाहिजे. शेतकऱ्यांची जमीन एकदा ताब्यात घेतल्यावर तेथील जमिनीच्या दोन्ही बाजूच्या सुमारे १५ फुटापर्यंत कोणतेच बांधकाम करता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होणार असल्याचेही आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले. 2रिलायन्सने अद्यापही आपला प्रकल्प अहवाल दिलेला नाही. किती जमीन जाणार आहे, किती शेतकरी बाधित होणार आहेत याची काहीच माहिती नाही. अलिबागमधील गेलचा प्रकल्प शेवटची घटका मोजत आहे, तर दुसरीकडे रिलायन्सचा गॅस प्रकल्प अवतरत आहे. हा निव्वळ योगायोग नसल्याने या प्रश्नाच्या तळाशी जाण्याची गरज आहे. 3येत्या पंधरा दिवसांमध्ये शेकाप आपली रणनीती तयार क रेल. शेतकऱ्यांचे यामध्ये नुकसान होत असून शेतकरी कामगार पक्ष यासाठी या विरोधातील आंदोलन तीव्र करुन शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहणार आहे. या आंदोलनात सर्वांना सहभागी करण्यात येणार असल्याचेही आमदार जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.