शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

बोर्लीपंचतन येथे भरपावसात पाणीटंचार्ई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 01:54 IST

नागरिक संतप्त : कमी दाबाने होतोय पाणीपुरवठा; कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी

गणेश प्रभाळे 

दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेले बोर्लीपंचतन गावच्या पाणीपुरवठ्याबाबत सातत्याने समस्या निर्माण होत आहेत. सध्या होत असलेल्या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.

बोर्लीपंचतन गावाला जून ते डिसेंबर या महिन्यामध्ये कोंढेपंचतन या धरणातून पाणीपुरवठा केला जातो व कार्ले येथील धरणातून जानेवारी ते मे या महिन्यात पाण्याचा पुरवठा केला जातो; परंतु सध्या पाणीपुरवठा करणाऱ्या लाइनबाबत अशा अघटित घटना समोर येत आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण तयार होत आहे. ज्या दिवशी बोर्लीपंचतन ग्रामपंचायतीचा निवडणूक निकाल जाहीर झाला त्याच दिवशी मध्यरात्री कार्ले धरणातील पिण्याच्या पाण्याचा राखीव असणारा साठा कुणा समाजकंटकांनी नदीला सोडून दिला. कार्ले धरणातील पाणी साठ्यावर बोर्ली पंचतन, दिवेआगर, भरडखोल या गावांचा पाणीपुरवठा अवलंबून असतो. त्यामुळे भरउन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा अनियमित पुरवठा होऊ लागला, त्याचा नाहकत्रास हा नागरिकांना सहन करावा लागला.पावसाळा सुरू झाल्यापासून कधी मुख्य पाइपलाइन फुटणे, तर कधी मुख्य वॉलमध्ये चप्पल, पत्र्याच्या टाकाऊ वस्तू सापडून पाणीपुरवठा बंद होणे असे प्रकार गेल्या तीन ते चार महिन्यांच्या कालावधीत होऊ लागले आहेत. त्यातच आता कोंढेपंचतन धरणातून बोर्लीपंचतन गावाला पाणीपुरवठा करणाºया मुख्य पाइपमध्ये मोठा दगड आढळून आला, त्यामुळे काही दिवस पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम होत होता. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पावसाचे घटत असणारे प्रमाण त्याचा धरणाच्या पाणीसाठ्यावर होणारा परिणाम त्यातच अशा घडणाºया घटना घडत राहिल्या तर येणाºया काळात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागेल.कार्ले धरणातून मध्यरात्री सोडण्यात आलेल्या पाण्याबाबत प्रश्नचिन्ह अद्याप कायम आहे. नागरिकांच्या दृष्टीने जीवनावश्यक असणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा भविष्यामध्ये गंभीर रूप धारण करू शकतो. त्यामुळे यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून ग्रामपंचायतीकडे के ली जात आहे.सध्या कोंढे धरणातून येणाºया पाइपलाइनला गळती लागल्याने बोर्लीकरांसाठी पाणीपुरवठा होऊ शकत नाही. या पाण्याच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी गाव पातळीवरती ग्रामपंचायत सरपंच व सर्व सदस्य यांच्याकडून अथक प्रयत्नचालू आहेत. मात्र, बोर्लीपंचतन गावावरील पाणीसंकट सुटताना दिसत नाही.कोंढेपंचतन ते बोर्लीपंचतन मार्गावरील आठ इंच पाइपलाइनमध्ये सहा इंच दगड मिळाला. नंतर गणेश चौक येथील पाइपलाइनमध्ये चप्पल व टाकाऊ वस्तू मिळाल्या. अशा घटना घडत असताना ग्रामपंचायत कर्मचारी, सदस्यांच्या सहकार्याने पुढे लवकरच मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी पाइपलाइनची दुरुस्ती सुरू आहे.- नम्रता गाणेकर,सरपंच, बोर्लीपंचतननिर्माण होणाºया प्रत्येक अडचणींवर मात करण्यासाठी ग्रामपंचायत सज्ज आहे तरी ग्रामस्थांनीसुद्धा सहकार्य करावे, ही विनंती.- मन्सुर गिरे,उपसरपंच, बोर्लीपंचतनभरपावसात पाण्याचा एवढा अडथळा असेल तर मग एप्रिल, मे महिन्यांत काय अवस्था असेल, ग्रामपंचायतीने यावर तातडीने उपाययोजना करून मुबलक पाणीपुरवठा करावा.- अमोल चांदोरकर, ग्रामस्थ. 

टॅग्स :Raigadरायगडalibaugअलिबाग