शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
3
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
4
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
5
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
6
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
7
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
8
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
9
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
10
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
11
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
12
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
13
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
14
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
15
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
16
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
17
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
18
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
19
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
20
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!

महाडमध्ये इंटरनेट सेवेचा बोजवारा, बीएसएनएलची सेवा ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 03:14 IST

महाड शहर आणि ग्रामीण भागात महामार्ग रुंदीकरणाच्या कामास सुरुवात झाल्याने सर्वच कंपन्यांच्या इंटरनेट सुविधांचा बोजवारा उडाला आहे.

- सिकंदर अनवारेदासगाव : महाड शहर आणि ग्रामीण भागात महामार्ग रुंदीकरणाच्या कामास सुरुवात झाल्याने सर्वच कंपन्यांच्या इंटरनेट सुविधांचा बोजवारा उडाला आहे. सततच्या खंडित होणाऱ्या सेवांमुळे ग्राहकांमधून असंतोष व्यक्त होत आहे. यात सर्वाधिक फटका बीएसएनएलच्या ग्राहकांना बसत असून दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे. पोस्ट आॅफिस, बँक, सरकारी कार्यालये त्याचबरोबर अन्य दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत.महाड आणि परिसरात गेले वर्षभर इंटरनेट सुविधेचा बोजवारा उडाला आहे. घराघरात मोबाइल असल्याने इंटरनेटचा वापर वाढला आहे. शिवाय शासकीय कार्यालये, खासगी कार्यालये, आणि व्यावसायिक-उद्योजक इंटरनेट सुविधेचे ग्राहक आहेत. देशात सर्वच बाबतीत आॅनलाइन कामावर भर दिला जात आहे. त्यामुळे विविध प्रकल्पात खासगी आणि शासकीय कंपन्यांच्या इंटरनेटचे जाळे जोडले जात आहे.वर्षभरापासून महामार्गाचे काम सुरू आहे. या कामात सातत्याने भारत संचार निगम लिमिटेडच्या केबल्स अनेकदा तोडल्या गेल्या आहेत. खासगी दूरसंचार कंपन्यांच्या केबलचीही अवस्था थोडीफार अशीच आहे. महाड शहरात सुमारे २५० पेक्षा अधिक टेलिफोनचे कनेक्शन विविध सामाजिक संस्था, व्यापारी, बँका, एसटी महामंडळ यांना देण्यात आले.गेल्या पंधरा-वीस वर्षांमध्ये टेलिफोनच्या सेवेत आमूलाग्र बदल झाले आहेत. महाड तालुक्यातील ग्रामीण भागातील नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक लँडलाइन फोन सेवा बंद झाली आहे. असंख्य ग्राहकांनी बीएसएनएल टेलिफोन सेवा बंद करून खासगी सेवा वापरणे पसंत केले आहे. त्यातच जे बीएसएनएलचे इंटरनेट वापरत आहेत, त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. महिन्याचे बिल वेळेवर येत असले तरी सुविधांबाबत वानवाच आहे.केंद्र शासनाने सर्व व्यवहार इंटरनेटच्या मदतीने करण्याचे आवाहन करताना अनेक क्षेत्रांमध्ये सक्ती देखील केली आहे. इंटरनेट ग्राहकांवर सक्ती करताना सर्व प्रथम ही सेवा नियमित व अखंडित पुरविणे कंपनीची जबाबदारी आहे. परंतु गेल्या आठ दिवसांपासून महाड शहरातील इंटरनेट सेवा वारंवार खंडित होत असल्याने बँका तसेच सरकारी कामकाजावर त्याचा गंभीर परिणाम झाला आहे. सर्वसामान्य ग्राहक त्रस्त झाले असून ऐनवेळी इंटरनेट सेवा बंद होत असल्याने बँॅकेतून रक्कम मिळणे देखील अशक्य झाले आहे.इंटरनेटवर चालणारी एटीएम यंत्रणा ग्रामीण भागांमध्ये देखील सुरू करण्यात आली आहे. परंतु अनेक गावांत एटीएम यंत्रणा महिन्यातून काही दिवस सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे. महाड तालुक्यातील निवृत्त कर्मचाºयांची पेन्शन बँकेत जमा होत असल्याने आपल्या पेन्शनसाठी ग्रामीण भागातून येणाºया लोकांना देखील नेटअभावी वाºया कराव्या लागत आहेत. वारंवार खंडित होणाºया केबल्सप्रकरणी बीएसएनएलकडून कोणत्याही ठोस उपाययोजना करण्यात येत नाही. महाड शहरासह ग्रामीण भागांमध्ये बीएसएनएलच्या इंटरनेट सेवेचा वापर करणारे पाच हजारांपेक्षा अधिक ग्राहक आहेत. दरमहिन्याल्या बिल वेळात येते, मात्र सेवेचा बोजवाजा उडालेला आहे. याविरोधात स्थानिक ग्राहक मंचाकडे तक्र ार करण्याच्या विचारात आहेत.पोस्टामध्ये बीएसएनएलची इंटरनेट सुविधा सातत्याने खंडित होत आहे. याचा टपाल खात्याच्या विविध सेवांवर परिणाम होत आहे. पोस्टाची बँकिंग सुविधा, रेल्वे काऊंटर यामुळे बंद ठेवावे लागतात. त्यामुळे पोस्टातील ग्राहकांच्या संतापाला सामोरे जावे लागते.- भारती शेठ, पोस्ट मास्तर, महाडबीएसएनएलची नेट सुविधा बंद पडल्यानंतर ग्राहकांची गैरसोय होते. बँकेत व्ही. सॅट नेट सुविधा सुरू असली तरी त्याचे नेटवर्क धीम्या गतीने सुरू असते. बीएसएनएल नेटवर्क बंद पडल्यानंतर पासबुक अपडेट, डिपॉझिट रिसीट देताना अडचणी येतात. ग्राहकांना सुविधा देता येत नाही. परिणामी त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागते.- प्रदीप कोटापूरम, व्यवस्थापक,आयसीआयसी बँक,महाड

टॅग्स :InternetइंटरनेटRaigadरायगड