शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्र डागले, इमारती उद्ध्वस्त
4
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
5
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
8
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
9
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
10
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
11
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
12
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
13
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
14
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
15
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
16
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
17
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
18
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
19
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
20
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले

महाडमध्ये इंटरनेट सेवेचा बोजवारा, बीएसएनएलची सेवा ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 03:14 IST

महाड शहर आणि ग्रामीण भागात महामार्ग रुंदीकरणाच्या कामास सुरुवात झाल्याने सर्वच कंपन्यांच्या इंटरनेट सुविधांचा बोजवारा उडाला आहे.

- सिकंदर अनवारेदासगाव : महाड शहर आणि ग्रामीण भागात महामार्ग रुंदीकरणाच्या कामास सुरुवात झाल्याने सर्वच कंपन्यांच्या इंटरनेट सुविधांचा बोजवारा उडाला आहे. सततच्या खंडित होणाऱ्या सेवांमुळे ग्राहकांमधून असंतोष व्यक्त होत आहे. यात सर्वाधिक फटका बीएसएनएलच्या ग्राहकांना बसत असून दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे. पोस्ट आॅफिस, बँक, सरकारी कार्यालये त्याचबरोबर अन्य दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत.महाड आणि परिसरात गेले वर्षभर इंटरनेट सुविधेचा बोजवारा उडाला आहे. घराघरात मोबाइल असल्याने इंटरनेटचा वापर वाढला आहे. शिवाय शासकीय कार्यालये, खासगी कार्यालये, आणि व्यावसायिक-उद्योजक इंटरनेट सुविधेचे ग्राहक आहेत. देशात सर्वच बाबतीत आॅनलाइन कामावर भर दिला जात आहे. त्यामुळे विविध प्रकल्पात खासगी आणि शासकीय कंपन्यांच्या इंटरनेटचे जाळे जोडले जात आहे.वर्षभरापासून महामार्गाचे काम सुरू आहे. या कामात सातत्याने भारत संचार निगम लिमिटेडच्या केबल्स अनेकदा तोडल्या गेल्या आहेत. खासगी दूरसंचार कंपन्यांच्या केबलचीही अवस्था थोडीफार अशीच आहे. महाड शहरात सुमारे २५० पेक्षा अधिक टेलिफोनचे कनेक्शन विविध सामाजिक संस्था, व्यापारी, बँका, एसटी महामंडळ यांना देण्यात आले.गेल्या पंधरा-वीस वर्षांमध्ये टेलिफोनच्या सेवेत आमूलाग्र बदल झाले आहेत. महाड तालुक्यातील ग्रामीण भागातील नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक लँडलाइन फोन सेवा बंद झाली आहे. असंख्य ग्राहकांनी बीएसएनएल टेलिफोन सेवा बंद करून खासगी सेवा वापरणे पसंत केले आहे. त्यातच जे बीएसएनएलचे इंटरनेट वापरत आहेत, त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. महिन्याचे बिल वेळेवर येत असले तरी सुविधांबाबत वानवाच आहे.केंद्र शासनाने सर्व व्यवहार इंटरनेटच्या मदतीने करण्याचे आवाहन करताना अनेक क्षेत्रांमध्ये सक्ती देखील केली आहे. इंटरनेट ग्राहकांवर सक्ती करताना सर्व प्रथम ही सेवा नियमित व अखंडित पुरविणे कंपनीची जबाबदारी आहे. परंतु गेल्या आठ दिवसांपासून महाड शहरातील इंटरनेट सेवा वारंवार खंडित होत असल्याने बँका तसेच सरकारी कामकाजावर त्याचा गंभीर परिणाम झाला आहे. सर्वसामान्य ग्राहक त्रस्त झाले असून ऐनवेळी इंटरनेट सेवा बंद होत असल्याने बँॅकेतून रक्कम मिळणे देखील अशक्य झाले आहे.इंटरनेटवर चालणारी एटीएम यंत्रणा ग्रामीण भागांमध्ये देखील सुरू करण्यात आली आहे. परंतु अनेक गावांत एटीएम यंत्रणा महिन्यातून काही दिवस सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे. महाड तालुक्यातील निवृत्त कर्मचाºयांची पेन्शन बँकेत जमा होत असल्याने आपल्या पेन्शनसाठी ग्रामीण भागातून येणाºया लोकांना देखील नेटअभावी वाºया कराव्या लागत आहेत. वारंवार खंडित होणाºया केबल्सप्रकरणी बीएसएनएलकडून कोणत्याही ठोस उपाययोजना करण्यात येत नाही. महाड शहरासह ग्रामीण भागांमध्ये बीएसएनएलच्या इंटरनेट सेवेचा वापर करणारे पाच हजारांपेक्षा अधिक ग्राहक आहेत. दरमहिन्याल्या बिल वेळात येते, मात्र सेवेचा बोजवाजा उडालेला आहे. याविरोधात स्थानिक ग्राहक मंचाकडे तक्र ार करण्याच्या विचारात आहेत.पोस्टामध्ये बीएसएनएलची इंटरनेट सुविधा सातत्याने खंडित होत आहे. याचा टपाल खात्याच्या विविध सेवांवर परिणाम होत आहे. पोस्टाची बँकिंग सुविधा, रेल्वे काऊंटर यामुळे बंद ठेवावे लागतात. त्यामुळे पोस्टातील ग्राहकांच्या संतापाला सामोरे जावे लागते.- भारती शेठ, पोस्ट मास्तर, महाडबीएसएनएलची नेट सुविधा बंद पडल्यानंतर ग्राहकांची गैरसोय होते. बँकेत व्ही. सॅट नेट सुविधा सुरू असली तरी त्याचे नेटवर्क धीम्या गतीने सुरू असते. बीएसएनएल नेटवर्क बंद पडल्यानंतर पासबुक अपडेट, डिपॉझिट रिसीट देताना अडचणी येतात. ग्राहकांना सुविधा देता येत नाही. परिणामी त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागते.- प्रदीप कोटापूरम, व्यवस्थापक,आयसीआयसी बँक,महाड

टॅग्स :InternetइंटरनेटRaigadरायगड