शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

चक्रीवादळाची तीव्रता पालघर जिल्ह्यात मंदावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 05:58 IST

समुद्रात गेलेले ३० मच्छीमार सुखरूप वाचले; बंदी असतानाही गेले होते मासेमारीला

हितेन नाईक ।लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : संपूर्ण कोकण किनारपट्टीसह जिल्ह्यात लोकांच्या उरात धडकी भरवणाऱ्या ‘निसर्ग’ चक्रीवादळाची तीव्रता पालघर जिल्ह्यात कमी झाल्याने जिल्हा प्रशासनासह नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. दरम्यान, समुद्रात मासेमारीला बंदी असतानाही वसई येथील मासेमारीला गेलेल्या दोन बोटींतील सुमारे ३० मच्छीमार वादळात अडकून पडले होते. मात्र वादळाचा वेग मंदावल्याने ते वाचले.जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, उपजिल्हाधिकारी धनाजी तोरस्कर, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, तहसीलदार सुनील शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक, सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी बुधवारी सकाळपासूनच सातपाटीसह उच्छेळी-दांडी, मुरबे, नवापूर, केळवे आदी किनारपट्टीवरील गावांना भेटी देत परिस्थितीची पाहणी केली. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर होणारा संभाव्य धोका पाहता प्रशासनाने गावागावात चोख बंदोबस्त ठेवला होता.किनारपट्टीवरील वसई ते झाई या ११० किलोमीटर अंतरावरील गावांची एनडीआरएफ पथकाने पाहणी करीत स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने धोकादायक भाग असलेल्या डहाणू, बोर्डी, सातपाटी आदी गावांतील किनाºयावर तळ ठोकला होता.वसई तालुक्यातील पाचूबंदर येथील समुद्रात मासेमारीला गेलेल्या दयावान आणि प्रेमळ या दोन मच्छीमार बोटी समुद्रातील वादळी वाºयामुळे अडकून पडल्या होत्या. समुद्रात १९/३१ आणि ७२.२९ अक्षांश, रेखांश आणि साधारणपणे २० नॉटिकल समुद्री क्षेत्रात या दोन्ही बोटींतील ३० मच्छीमार अडकून पडले होते. जिल्हाधिकारी शिंदे यांनी कोस्टगार्डशी संपर्क साधून त्यांना बाहेर काढण्याच्या सूचना दिल्या.सातपाटीमधील मच्छीमार सनी चौधरी यांनी त्या बोटींच्या वायरलेस सेटवर संपर्क साधून त्यांना सातपाटी बंदरात येण्याचे आवाहन केले. उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांनी एनडीआरएफ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मदतकार्य पोचविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले असतानाच समुद्रातील वाºयाचा वेग कमी झाल्याने या दोन्ही बोटी वसईमध्ये उशिराने पोहोचल्या. १ जूनपासून समुद्रात मासेमारी करण्यास बंदी असताना या बोटी समुद्र्रात मासेमारीसाठी राहिल्याने सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त, पालघरकडून त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ