शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

उरण तालुक्यातील शिलालेख अडगळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 23:53 IST

अंधश्रद्धेमुळे फासला शेंदूर : पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष; ऐतिहासिक ठेवा नामशेष होण्याच्या मार्गावर!

मधुकर ठाकूर।

उरण : उरण तालुक्यात चिरनेर, कळंबुसरे, आवरे आदी परिसरांत अनेक वर्षांपूर्वी सापडलेले अति पुरातनकालीन पाषाणातील दुर्मीळ शिलालेख आढळून आले आहेत. ऐतिहासिक नोंदीत ‘गधेगळ’ नावाने ओळखले जाणारे शिल्प, शिलालेख जतन करण्याची आवश्यकता असताना, पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे अडगळीत पडलेले आहेत, तर अंधश्रद्धेमुळे देवी-देवतांच्या नावाने शेंदूर फासलेल्या अवस्थेत आढळून येत आहेत. त्यामुळे ऐतिहासिक ठेवा जतन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

चिरनेर येथील शिवमंदिराच्या उभारणीच्या कामासाठी उत्खनन सुरू होते. या उत्खननात शिलालेख सापडले होते. चिरनेर येथे काही वर्षांपूर्वी सापडलेल्या दोन शिलालेखांपैकी एक शिलालेख शंकर मंदिराच्या तळ्याकाठी धूळखात अस्तित्वहिन अवस्थेत पडून आहे, तर दुुसरा शिलालेख चिरनेर येथीलच भैरवनाथ मंदिराच्या परिसरात शेंदूर फासलेल्या अवस्थेत आढळून आला असल्याची माहिती येथील रहिवासी जीवन केणी यांनी दिली, तसेच असेच ऐतिहासिक शिलालेख कळंबुसरे येथील गावात तीन, तर आवरे गावात दोन ठिकाणी आढळून आले आहेत. यापैकी काही शिलालेख शेतीच्या बांधावर, घर, मंदिर तर काही शिलालेख मंदिर परिसरात सापडले आहेत.

शिलालेख केवळ त्यांच्या निर्मितीचा इतिहासच सांगत नाहीत, तर तेव्हाची सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थितीही कथन करतात.मध्ययुगीन भाषिक इतिहासावरही प्रकाश टाकता येतो. अंधश्रद्धा बाळगण्यापेक्षा त्यांचा ऐतिहासिक वारसा म्हणून महत्त्व समजून घेणं अपेक्षित असताना मात्र, ऐतिहासिक ठेवा पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे अडगळीत पडलेल्या अवस्थेत आढळून येत आहे.यामुळे इतिहासाचा साक्षीदार असलेला तो अस्सल पुरावाउपेक्षित ठेवण्याऐवजी जतनकरण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.१० ते १६व्या शतकातील शिलाहार राजघराण्याशी संबंधाचा निष्कर्ष‘गधेगळ’ म्हणून ओळखला जाणारा प्रत्येक शिलालेख आणि शिल्प तीन टप्प्यांत विभागली गेली आहेत. वरच्या टप्प्यात चंद्र, सूर्य आणि कलश यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. मधल्या टप्प्यात काही मजकूर कोरलेले दिसतात, तर खालच्या टप्प्यात एक गाढव महिलेवर आरूढ असल्याची कोरीव प्रतिमा दिसत आहे. अशी प्रतिमा आणि आलेख असल्यानेच या शिलालेखाला ‘गधेगळ’ नाव पडले असल्याचे इतिहास संशोधकांचे म्हणणे आहे. ते १० ते १६व्या शतकातील शिलाहार राजघराण्याशी संबंधित असल्याचा निष्कर्षही इतिहास संशोधकांनी काढला आहे.

टॅग्स :Raigadरायगड