शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

उरण तालुक्यातील शिलालेख अडगळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 23:53 IST

अंधश्रद्धेमुळे फासला शेंदूर : पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष; ऐतिहासिक ठेवा नामशेष होण्याच्या मार्गावर!

मधुकर ठाकूर।

उरण : उरण तालुक्यात चिरनेर, कळंबुसरे, आवरे आदी परिसरांत अनेक वर्षांपूर्वी सापडलेले अति पुरातनकालीन पाषाणातील दुर्मीळ शिलालेख आढळून आले आहेत. ऐतिहासिक नोंदीत ‘गधेगळ’ नावाने ओळखले जाणारे शिल्प, शिलालेख जतन करण्याची आवश्यकता असताना, पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे अडगळीत पडलेले आहेत, तर अंधश्रद्धेमुळे देवी-देवतांच्या नावाने शेंदूर फासलेल्या अवस्थेत आढळून येत आहेत. त्यामुळे ऐतिहासिक ठेवा जतन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

चिरनेर येथील शिवमंदिराच्या उभारणीच्या कामासाठी उत्खनन सुरू होते. या उत्खननात शिलालेख सापडले होते. चिरनेर येथे काही वर्षांपूर्वी सापडलेल्या दोन शिलालेखांपैकी एक शिलालेख शंकर मंदिराच्या तळ्याकाठी धूळखात अस्तित्वहिन अवस्थेत पडून आहे, तर दुुसरा शिलालेख चिरनेर येथीलच भैरवनाथ मंदिराच्या परिसरात शेंदूर फासलेल्या अवस्थेत आढळून आला असल्याची माहिती येथील रहिवासी जीवन केणी यांनी दिली, तसेच असेच ऐतिहासिक शिलालेख कळंबुसरे येथील गावात तीन, तर आवरे गावात दोन ठिकाणी आढळून आले आहेत. यापैकी काही शिलालेख शेतीच्या बांधावर, घर, मंदिर तर काही शिलालेख मंदिर परिसरात सापडले आहेत.

शिलालेख केवळ त्यांच्या निर्मितीचा इतिहासच सांगत नाहीत, तर तेव्हाची सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थितीही कथन करतात.मध्ययुगीन भाषिक इतिहासावरही प्रकाश टाकता येतो. अंधश्रद्धा बाळगण्यापेक्षा त्यांचा ऐतिहासिक वारसा म्हणून महत्त्व समजून घेणं अपेक्षित असताना मात्र, ऐतिहासिक ठेवा पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे अडगळीत पडलेल्या अवस्थेत आढळून येत आहे.यामुळे इतिहासाचा साक्षीदार असलेला तो अस्सल पुरावाउपेक्षित ठेवण्याऐवजी जतनकरण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.१० ते १६व्या शतकातील शिलाहार राजघराण्याशी संबंधाचा निष्कर्ष‘गधेगळ’ म्हणून ओळखला जाणारा प्रत्येक शिलालेख आणि शिल्प तीन टप्प्यांत विभागली गेली आहेत. वरच्या टप्प्यात चंद्र, सूर्य आणि कलश यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. मधल्या टप्प्यात काही मजकूर कोरलेले दिसतात, तर खालच्या टप्प्यात एक गाढव महिलेवर आरूढ असल्याची कोरीव प्रतिमा दिसत आहे. अशी प्रतिमा आणि आलेख असल्यानेच या शिलालेखाला ‘गधेगळ’ नाव पडले असल्याचे इतिहास संशोधकांचे म्हणणे आहे. ते १० ते १६व्या शतकातील शिलाहार राजघराण्याशी संबंधित असल्याचा निष्कर्षही इतिहास संशोधकांनी काढला आहे.

टॅग्स :Raigadरायगड