शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

महाड तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे अर्धवट, शेतकऱ्यांवर येणार उपासमारीची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2020 00:47 IST

Raigad News : परतीच्या पावसाने महाड तालुक्याला एक आठवडा झोडपून काढले होते. या लागणाऱ्या पावसामुळे जवळपास ८० टक्के शेती झोपून गेली. जी उर्वरित शेती होती, तीही दोन दिवस लागणाऱ्या पावसाने अडचणीत अली.

दासगाव - परतीच्या पावसाने संपूर्ण महाड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणले. सध्या शेतकरी सरकारकडून मिळणाऱ्या मदतीवरअवलंबून असून, सरकारने तातडीची मदत जाहीर करावी, पंचनामे लवकर पूर्ण करावेत, नाहीतर शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे, असा आक्रोश महाड तालुक्यातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.परतीच्या पावसाने महाड तालुक्याला एक आठवडा झोडपून काढले होते. या लागणाऱ्या पावसामुळे जवळपास ८० टक्के शेती झोपून गेली. जी उर्वरित शेती होती, तीही दोन दिवस लागणाऱ्या पावसाने अडचणीत अली. अशा वेळी मात्र, १०० टक्के भात शेती बाद झाली आहे. या शेतीचे पंचनामे आजही सुरू आहेत. सरकारने पॅकेज जरी जाहीर केले असले, तरी गुंठा किंवा हेक्टरी किती मदत मिळणार ही निच्छित केलेले नाही. आज शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झाला असून, सरकारच्या मिळणाऱ्या मदतीवर अवलंबून आहे. भातपीक नष्ट झाले, गुरांचा चारा संपला, अशा वेळी शासनाकडून जी मदत मिळणार आहे, ती जेवढे नुकसान झाले आहे, त्याचप्रमाणे मिळणे शेतकऱ्यांना अपेक्षित आहे.सध्या अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये जायचेच बंद केले आहे, तर अनेक शेतकऱ्यांना शासनाच्या मिळणाऱ्या मदतीवर विश्वासही राहिलेला नाही. अनेक वेळा पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. मात्र, त्या नुकसानीच्या मोबदल्यात १० टक्केही मदत शासनाकडून मिळालेली नव्हती. त्यामुळे आता तरी शासनाने झालेल्या नुकसानीची पुरेपूर भरपाई द्यावी, नाहीतर महाड तालुक्यातील शेतकाऱ्यांवर उपासमारीची वेळ येईल. लवकर पंचनामे पूर्ण करण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. 

शेतामध्ये साचले पाणीबहुतेक शेतकऱ्यांची शेती पाण्यात आहे. मात्र, शासनाकडून पुरेपूर मदतीची अपेक्षा शेतकरी वर्गाला नसल्याने, अनेक शेतकरी पाण्यातून भातकापणी करत, सपाटीवर भात सुकविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, शेतकऱ्याच्या या मेहनतीला थोडे-फार यश आले, तरी गुरांचा चारा हा संपूर्ण नष्ट झाला आहे. सध्या महाड तालुक्यातील शेतकऱ्यांना आपली वर्षाची बुडालेली मेहनत बघून त्याला अश्रू अनावर होत आहेत. त्यामुळे प्रत्येक शेतकरी सरकारी मदतीच्या अपेक्षेवर बसला आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीRaigadरायगड