शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

म्हसळा तालुक्यात पीक लागवड क्षेत्रात वाढ; चाकरमान्यांचा शेतीकडे कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 23:56 IST

मनुष्यबळ वाढल्याने उत्पन्न वाढीवर भर

म्हसळा : तालुक्यात कोरोनाच्या कालावधीत शहरी व ग्रामीण जनजीवनात बदल झाले असतानाच, तालुक्यांतील ३९ ग्रामपंचायतींतील ८० गाव-वाड्यांतून सुमारे २० ते २१ हजार चाकरमानी दाखल झाले होते, त्यापैकी बहुतांश चाकरमान्यांनी शहरे लॉकडाऊन आसल्याने आपले लक्ष पारंपरिक शेतीकडे केंद्रित केले. त्यामुळे तालुक्यातील पीक लागवड क्षेत्र वाढले असल्याची माहिती कृषी विभागाकडून प्राप्त झाली.

यावेळी ७५ हेक्टर क्षेत्रांत भात, २० हेक्टर क्षेत्रांत नाचणी व सुमारे १५ हेक्टर क्षेत्रांत वरी पीक वाढले आसल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. तालुक्यात मागील वर्षी २,४०० हेक्टर क्षेत्रात भाताची, ४०० हेक्टर क्षेत्रात नाचणी तर सुमारे १०० हेक्टर क्षेत्रांवर वरील पिके घेतली होती. यंदा शहरातील चाकरमानी शेतात आल्याने मनुष्यबळही वाढले असल्याने, अधिक क्षेत्रात पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे.

तालुक्यात भातलावणी पूर्ण झाली असून, आता म्हसळा तालुक्यातील शेतकरी फळ बागायतींच्या मशागतीकडे वळला आहे. चाकरमानी आपल्या बागायतींना खते व अंतर्गत मशागतीची कामे करण्यात व्यस्त झाला आहे. काही शेतकरी रोजगार हमी योजनेंतर्गत काजू, आंबा लागवड करीत आहेत. यावेळी लावणीमध्येही तालुक्यातील चाकरमानी युवकांनी यावेळी चिखलणीसाठी यंत्राचा वापर चांगल्या पद्धतीने केला असल्याचे कृषी विस्तार अधिकारी मंगेश साळी यांनी सांगितले.

चालू हंगामात ग्रामीण भागांतून भात संकरीत व सुधारित जातीच्या बियाण्याची मागणी बºयापैकी होती. मागील वेळेपेक्षा दोन क्विंटल भाताचे बियाणे जास्त विकले गेले असल्याची माहिती खत व बियाणे विक्रेते नीलेश सायगावकर यांनी दिली.

ग्रामीण भागातील तरुणांचा कल बºयापैकी शेतीकामाकडे झुकला आहे. खरीपात तालुक्यात भात, नागली, वरी व्यतिरिक्त शेतकऱ्यांनी अन्य भाजीपाल्याचीही बºयापैकी लागवड केली आहे. रब्बीतील लागवडीबाबतही शेतकरी चौकशी करत आहेत.- सुजय कुसाळकर, कृषी पर्यवेक्षक, कृषी विभाग, म्हसळा

आमच्या गावात कोविड १९च्या लॉकडाऊनमध्ये आलेल्या ग्रामस्थांनी चालू खरीप हंगामात शेतीकडे विशेष लक्ष दिले आहे. खरसई, मेंदडी, बनोटी पट्ट्यांतील बहुतांश शेती व वरकस शेती लागवडीखाली आणली गेली आहे.- नीलेश मांदाडकर, सरपंच, खरसई

टॅग्स :FarmerशेतकरीRaigadरायगड