शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

म्हसळा तालुक्यात पीक लागवड क्षेत्रात वाढ; चाकरमान्यांचा शेतीकडे कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 23:56 IST

मनुष्यबळ वाढल्याने उत्पन्न वाढीवर भर

म्हसळा : तालुक्यात कोरोनाच्या कालावधीत शहरी व ग्रामीण जनजीवनात बदल झाले असतानाच, तालुक्यांतील ३९ ग्रामपंचायतींतील ८० गाव-वाड्यांतून सुमारे २० ते २१ हजार चाकरमानी दाखल झाले होते, त्यापैकी बहुतांश चाकरमान्यांनी शहरे लॉकडाऊन आसल्याने आपले लक्ष पारंपरिक शेतीकडे केंद्रित केले. त्यामुळे तालुक्यातील पीक लागवड क्षेत्र वाढले असल्याची माहिती कृषी विभागाकडून प्राप्त झाली.

यावेळी ७५ हेक्टर क्षेत्रांत भात, २० हेक्टर क्षेत्रांत नाचणी व सुमारे १५ हेक्टर क्षेत्रांत वरी पीक वाढले आसल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. तालुक्यात मागील वर्षी २,४०० हेक्टर क्षेत्रात भाताची, ४०० हेक्टर क्षेत्रात नाचणी तर सुमारे १०० हेक्टर क्षेत्रांवर वरील पिके घेतली होती. यंदा शहरातील चाकरमानी शेतात आल्याने मनुष्यबळही वाढले असल्याने, अधिक क्षेत्रात पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे.

तालुक्यात भातलावणी पूर्ण झाली असून, आता म्हसळा तालुक्यातील शेतकरी फळ बागायतींच्या मशागतीकडे वळला आहे. चाकरमानी आपल्या बागायतींना खते व अंतर्गत मशागतीची कामे करण्यात व्यस्त झाला आहे. काही शेतकरी रोजगार हमी योजनेंतर्गत काजू, आंबा लागवड करीत आहेत. यावेळी लावणीमध्येही तालुक्यातील चाकरमानी युवकांनी यावेळी चिखलणीसाठी यंत्राचा वापर चांगल्या पद्धतीने केला असल्याचे कृषी विस्तार अधिकारी मंगेश साळी यांनी सांगितले.

चालू हंगामात ग्रामीण भागांतून भात संकरीत व सुधारित जातीच्या बियाण्याची मागणी बºयापैकी होती. मागील वेळेपेक्षा दोन क्विंटल भाताचे बियाणे जास्त विकले गेले असल्याची माहिती खत व बियाणे विक्रेते नीलेश सायगावकर यांनी दिली.

ग्रामीण भागातील तरुणांचा कल बºयापैकी शेतीकामाकडे झुकला आहे. खरीपात तालुक्यात भात, नागली, वरी व्यतिरिक्त शेतकऱ्यांनी अन्य भाजीपाल्याचीही बºयापैकी लागवड केली आहे. रब्बीतील लागवडीबाबतही शेतकरी चौकशी करत आहेत.- सुजय कुसाळकर, कृषी पर्यवेक्षक, कृषी विभाग, म्हसळा

आमच्या गावात कोविड १९च्या लॉकडाऊनमध्ये आलेल्या ग्रामस्थांनी चालू खरीप हंगामात शेतीकडे विशेष लक्ष दिले आहे. खरसई, मेंदडी, बनोटी पट्ट्यांतील बहुतांश शेती व वरकस शेती लागवडीखाली आणली गेली आहे.- नीलेश मांदाडकर, सरपंच, खरसई

टॅग्स :FarmerशेतकरीRaigadरायगड