शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जिल्ह्यात पावसामुळे बळीराजा सुखावला

By निखिल म्हात्रे | Updated: August 23, 2023 14:48 IST

किमान आठवडा भरासाठी भात पिकाला कोणताही धोका राहणार नसल्याने शेतकऱ्यांची चिंता काही कालावधीसाठी मिटली आहे...

अलिबाग - गेल्या काही दिवसापासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे पिकांवर करप्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या स्थितीमुळे जिल्ह्यातील भाताचे पीक धोक्यात आले होते. आज पाऊस बरसला आहे. त्यामुळे किमान आठवडा भरासाठी भात पिकाला कोणताही धोका राहणार नसल्याने शेतकऱ्यांची चिंता काही कालावधीसाठी मिटली आहे.

यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्याने सर्वांचीच चिंता वाढली होती. त्यानंतर पावसाने जोरदार बॅटिंग केली होती. सततच्या बरसणाऱ्या पावसामुळे शेतामध्ये पाणी साचून राहात असल्याने 95 हजार हेक्टरवरील पिक खराब होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मोठ्या मेहनतीने लावले पिक हातून जाणार अशी भीती शेतकऱ्यांना वाटत होती.

कालांतराने पावसाने विसावा घेतल्याने पीक काही प्रमाणात वाचण्यास मदत झाली. त्यानंतर पावसाने एकदम दडी मारली. भाताचे पीक शेतात उभे राहीले होते. एकीकडे पावसाने बरसने थांबवले, तर दुसरीकडे उन्हाच्या तडाख्याने पुन्हा पिकाला धोका निर्माण झाला होता. कडक उन्हामुळे पिकांवर करप्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत होता. पोलादपूर तालुक्यात असा प्रकार समोर आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांसह कृषी विभागाची देखील चिंता वाढली होती. कृषी विभागाने पिकांवर तातडीने औषध फवारणीच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शेतकऱ्यांनी औषध फवारणीला सुरुवात केली होती. जिल्ह्यात अशी परिस्थिती उद्भवण्याआधीच कृषी विभागाने सर्वांनाच सर्तक केले.

पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या जीवात जीव आला आहे. पुढील एक आठवडा तरी पिकाला धोका पोचणार सुरुवातीला पावसाला उशीराने सुरुवात झाली. त्यानंतर तो जोरदार बरसला. नंतर अचानक गायब झाला. या लहरी हवामानाचा फटका शेतीला बसत आहे. शेतकऱ्यांनी वेळोवेळी स्थानिक पातळीवरील कृषी विभागाच्या संपर्कात राहावे.- उज्वला बाणखेले, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी. 

टॅग्स :RaigadरायगडRainपाऊसFarmerशेतकरी