शहरं
Join us  
Trending Stories
1
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
2
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
3
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
4
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
5
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
6
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
7
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
8
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
9
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
10
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
11
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
12
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
13
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
14
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
15
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
16
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
17
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
18
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
19
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
20
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?

जिल्ह्यात पावसामुळे बळीराजा सुखावला

By निखिल म्हात्रे | Updated: August 23, 2023 14:48 IST

किमान आठवडा भरासाठी भात पिकाला कोणताही धोका राहणार नसल्याने शेतकऱ्यांची चिंता काही कालावधीसाठी मिटली आहे...

अलिबाग - गेल्या काही दिवसापासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे पिकांवर करप्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या स्थितीमुळे जिल्ह्यातील भाताचे पीक धोक्यात आले होते. आज पाऊस बरसला आहे. त्यामुळे किमान आठवडा भरासाठी भात पिकाला कोणताही धोका राहणार नसल्याने शेतकऱ्यांची चिंता काही कालावधीसाठी मिटली आहे.

यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्याने सर्वांचीच चिंता वाढली होती. त्यानंतर पावसाने जोरदार बॅटिंग केली होती. सततच्या बरसणाऱ्या पावसामुळे शेतामध्ये पाणी साचून राहात असल्याने 95 हजार हेक्टरवरील पिक खराब होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मोठ्या मेहनतीने लावले पिक हातून जाणार अशी भीती शेतकऱ्यांना वाटत होती.

कालांतराने पावसाने विसावा घेतल्याने पीक काही प्रमाणात वाचण्यास मदत झाली. त्यानंतर पावसाने एकदम दडी मारली. भाताचे पीक शेतात उभे राहीले होते. एकीकडे पावसाने बरसने थांबवले, तर दुसरीकडे उन्हाच्या तडाख्याने पुन्हा पिकाला धोका निर्माण झाला होता. कडक उन्हामुळे पिकांवर करप्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत होता. पोलादपूर तालुक्यात असा प्रकार समोर आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांसह कृषी विभागाची देखील चिंता वाढली होती. कृषी विभागाने पिकांवर तातडीने औषध फवारणीच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शेतकऱ्यांनी औषध फवारणीला सुरुवात केली होती. जिल्ह्यात अशी परिस्थिती उद्भवण्याआधीच कृषी विभागाने सर्वांनाच सर्तक केले.

पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या जीवात जीव आला आहे. पुढील एक आठवडा तरी पिकाला धोका पोचणार सुरुवातीला पावसाला उशीराने सुरुवात झाली. त्यानंतर तो जोरदार बरसला. नंतर अचानक गायब झाला. या लहरी हवामानाचा फटका शेतीला बसत आहे. शेतकऱ्यांनी वेळोवेळी स्थानिक पातळीवरील कृषी विभागाच्या संपर्कात राहावे.- उज्वला बाणखेले, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी. 

टॅग्स :RaigadरायगडRainपाऊसFarmerशेतकरी