शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

भाजप बैठकीत तालुका अध्यक्षाची वरिष्ठांच्या धोरणावर नाराजी, पण तटकरे यांना निवडून आणणार

By राजेश भोस्तेकर | Updated: April 3, 2024 17:21 IST

अशीही खंत व्यक्त करीत उदय काठे यांनी महायुतीचा धर्म आम्ही पाळणार असून सुनील तटकरे यांना निवडून आणणार अशी ग्वाही ही दिली आहे. 

अलिबाग : जिल्ह्यात पक्ष बांधणी करून पक्षाची ताकद वाढवली. २०२४ लोकसभेला भाजपचाच उमेदवार असणार असे प्रत्येक मेळाव्यात नेत्यांनी कार्यकर्त्याच्या मनात बिंबवले आणि शेवटी वरिष्ठ पातळीवरील निर्णयामुळे दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराचे काम करायचे अशी खंत भाजपचे तालुका अध्यक्ष उदय काठे यांनी भाजप बूथ कार्यकर्ता व सुपर वॉरियर्स समलेन आणि नियोजन निवडणूक बैठकित बोलून दाखवली आहे. प्रत्येक लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपला झुकते माप मिळाले आहे. मात्र निवडून आल्यानंतर पक्षालाच नावे ठेवतात. अशीही खंत व्यक्त करीत उदय काठे यांनी महायुतीचा धर्म आम्ही पाळणार असून सुनील तटकरे यांना निवडून आणणार अशी ग्वाही ही दिली आहे. 

रायगड लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तालुका स्तरावर भाजपची बैठक घेण्याबाबत वरिष्ठांनी सूचना केली आहे. त्यानुसार अलिबाग येथे मंगळवारी भाग्यलक्ष्मी सभागृहात भाजप बूथ कार्यकर्ता व सुपर वॉरियर्स समलेन आणि नियोजन निवडणूक बैठीकचे आयोजन करण्यात आले होते. महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे, आमदार रवींद्र चव्हाण, लोकसभा निवडणूक प्रमुख सतीश धारप, गिरीश तुळपुळे, भाजप नेते हेमंत दांडेकर, अलिबाग विधानसभा निवडणूक प्रमुख दिलीप भोईर, सरचिटणीस ऍड महेश मोहिते, राज्य प्रतिनिधी राजेश मापरा, सरचिटणीस गीता पालेरेचा, उपध्याख वैकुंठ पाटील, सोपान जांभेकर, यासह मान्यवर, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

भाजप बैठकीत तालुकाध्यक्ष उदय काठे यांनी पक्षाच्या भूमिकेबाबत कार्यकर्त्यांची खंत पदाधिकारी यांच्यासमोर व्यक्त केली आहे. धैर्यशील पाटील हे भाजपचे लोकसभेचे उमेदवार असणार अशीच धारणा कार्यकर्त्यांची झाली होती. त्यामुळे यंदा कमळ चिन्हावर निवडणूक होईल अशी आशा प्रत्येक कार्यकर्त्याची होती. मात्र नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे यासाठी रायगडाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला दिली आहे. त्यामुळे त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी ही भाजपवर आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी आम्ही पाळणार असून शिवसेना, राष्ट्रवादी पेक्षा भाजप हा तटकरे याना निवडून आणण्यात आघाडीवर असेल असा विश्वास उदय काठे यांनी बोलून दाखवला आहे. मात्र पक्षाच्या धोरणावर स्पष्ट नाराजीही काठे यांनी भर सभेत बोलून दाखवली आहे. त्यामुळे काहीशी पंचायत पदाधिकारी यांची झाली. 

उदय काठे यांनी उपस्थित केलेल्या खंत बाबत सर्वच पदाधिकारी यांनी दुजोरा दिला असला तरी मोदी ना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी प्रत्येकाने एक दिलाने काम करा असे आवाहन हेमंत दांडेकर, सतीश धारप, आमदार रवींद्र चव्हाण, गिरीश तुळपुळे, परशुराम म्हात्रे आणि इतर मान्यवरांनी केले आहे. 

आमचं दुकान बंद करण्याची हिम्मत नाही, आमच्या मुळे तुमची दुकाने सुरू -२०१९ ला लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेचे काम केले. अलिबाग विधानसभा शिवसेनेकडे होती. त्याचे काम करून महेंद्र दळवी याना निवडून आणले. भाजपच्या मतावर आमदार निवडून आले. मात्र निवडून आणल्यानंतर हेच आमदार विचारतात तुमची भाजप कुठे आहे. अनेकांना आमदार सांगतात भाजप वाढणार नाही तुमचे दुकान बंद करा असे म्हणत आहेत. पण मी जाहीर सांगतो आमचे दुकान बंद करण्याची कोणाची हिम्मत नाही आहे. त्याची दुकाने आमच्या मुळे चालू आहेत असा टोला महायुतीचे आमदार महेंद्र दळवी याना काठे यांनी मारला आहे. 

टॅग्स :RaigadरायगडBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस