शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
4
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
5
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
6
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
7
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
8
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
9
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
10
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
11
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
12
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
13
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
14
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
15
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
16
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
17
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
18
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
19
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
20
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट

भाजप बैठकीत तालुका अध्यक्षाची वरिष्ठांच्या धोरणावर नाराजी, पण तटकरे यांना निवडून आणणार

By राजेश भोस्तेकर | Updated: April 3, 2024 17:21 IST

अशीही खंत व्यक्त करीत उदय काठे यांनी महायुतीचा धर्म आम्ही पाळणार असून सुनील तटकरे यांना निवडून आणणार अशी ग्वाही ही दिली आहे. 

अलिबाग : जिल्ह्यात पक्ष बांधणी करून पक्षाची ताकद वाढवली. २०२४ लोकसभेला भाजपचाच उमेदवार असणार असे प्रत्येक मेळाव्यात नेत्यांनी कार्यकर्त्याच्या मनात बिंबवले आणि शेवटी वरिष्ठ पातळीवरील निर्णयामुळे दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराचे काम करायचे अशी खंत भाजपचे तालुका अध्यक्ष उदय काठे यांनी भाजप बूथ कार्यकर्ता व सुपर वॉरियर्स समलेन आणि नियोजन निवडणूक बैठकित बोलून दाखवली आहे. प्रत्येक लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपला झुकते माप मिळाले आहे. मात्र निवडून आल्यानंतर पक्षालाच नावे ठेवतात. अशीही खंत व्यक्त करीत उदय काठे यांनी महायुतीचा धर्म आम्ही पाळणार असून सुनील तटकरे यांना निवडून आणणार अशी ग्वाही ही दिली आहे. 

रायगड लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तालुका स्तरावर भाजपची बैठक घेण्याबाबत वरिष्ठांनी सूचना केली आहे. त्यानुसार अलिबाग येथे मंगळवारी भाग्यलक्ष्मी सभागृहात भाजप बूथ कार्यकर्ता व सुपर वॉरियर्स समलेन आणि नियोजन निवडणूक बैठीकचे आयोजन करण्यात आले होते. महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे, आमदार रवींद्र चव्हाण, लोकसभा निवडणूक प्रमुख सतीश धारप, गिरीश तुळपुळे, भाजप नेते हेमंत दांडेकर, अलिबाग विधानसभा निवडणूक प्रमुख दिलीप भोईर, सरचिटणीस ऍड महेश मोहिते, राज्य प्रतिनिधी राजेश मापरा, सरचिटणीस गीता पालेरेचा, उपध्याख वैकुंठ पाटील, सोपान जांभेकर, यासह मान्यवर, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

भाजप बैठकीत तालुकाध्यक्ष उदय काठे यांनी पक्षाच्या भूमिकेबाबत कार्यकर्त्यांची खंत पदाधिकारी यांच्यासमोर व्यक्त केली आहे. धैर्यशील पाटील हे भाजपचे लोकसभेचे उमेदवार असणार अशीच धारणा कार्यकर्त्यांची झाली होती. त्यामुळे यंदा कमळ चिन्हावर निवडणूक होईल अशी आशा प्रत्येक कार्यकर्त्याची होती. मात्र नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे यासाठी रायगडाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला दिली आहे. त्यामुळे त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी ही भाजपवर आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी आम्ही पाळणार असून शिवसेना, राष्ट्रवादी पेक्षा भाजप हा तटकरे याना निवडून आणण्यात आघाडीवर असेल असा विश्वास उदय काठे यांनी बोलून दाखवला आहे. मात्र पक्षाच्या धोरणावर स्पष्ट नाराजीही काठे यांनी भर सभेत बोलून दाखवली आहे. त्यामुळे काहीशी पंचायत पदाधिकारी यांची झाली. 

उदय काठे यांनी उपस्थित केलेल्या खंत बाबत सर्वच पदाधिकारी यांनी दुजोरा दिला असला तरी मोदी ना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी प्रत्येकाने एक दिलाने काम करा असे आवाहन हेमंत दांडेकर, सतीश धारप, आमदार रवींद्र चव्हाण, गिरीश तुळपुळे, परशुराम म्हात्रे आणि इतर मान्यवरांनी केले आहे. 

आमचं दुकान बंद करण्याची हिम्मत नाही, आमच्या मुळे तुमची दुकाने सुरू -२०१९ ला लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेचे काम केले. अलिबाग विधानसभा शिवसेनेकडे होती. त्याचे काम करून महेंद्र दळवी याना निवडून आणले. भाजपच्या मतावर आमदार निवडून आले. मात्र निवडून आणल्यानंतर हेच आमदार विचारतात तुमची भाजप कुठे आहे. अनेकांना आमदार सांगतात भाजप वाढणार नाही तुमचे दुकान बंद करा असे म्हणत आहेत. पण मी जाहीर सांगतो आमचे दुकान बंद करण्याची कोणाची हिम्मत नाही आहे. त्याची दुकाने आमच्या मुळे चालू आहेत असा टोला महायुतीचे आमदार महेंद्र दळवी याना काठे यांनी मारला आहे. 

टॅग्स :RaigadरायगडBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस