शहरं
Join us  
Trending Stories
1
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
2
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
3
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
4
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
5
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
6
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
7
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
8
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
9
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
10
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
11
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
12
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
13
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
14
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
15
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
16
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
17
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
18
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
19
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
20
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका

जेएनपीएत हर घर तिरंगा; स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2023 17:05 IST

जेएनपीएने 'आझादी का अमृत महोत्सव' अंतर्गत भारताचा ७६ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

मधुकर ठाकूर 

उरण : जेएनपीएने 'आझादी का अमृत महोत्सव' अंतर्गत भारताचा ७६ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जनेपप्रा प्रशासन भवन येथे जेएनपोर्ट समुदायाने उत्सवात सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात जेएनपीएचे उपाध्यक्ष उन्मेष शरद वाघ  यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. यावेळी जेएनपीएचे विभाग प्रमुख आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अधिकारी यांच्या उपस्थित होते.

"स्वातंत्र्य दिनाचे स्मरण करत असताना गेल्या वर्षभरात जेएनपीएने आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत अनेक उपक्रमांचे आयोजन केले होते. बंदराच्या वैविध्यपूर्ण कामगिरी आणि योगदानामुळे विविध क्षेत्रांमध्ये आपल्या देशाची प्रतिष्ठा वाढली आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारताच्या सागरी क्षेत्राने आणि बंदरांनी देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. जेएनपोर्टने ३४ वर्षांपासून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आम्ही सर्वोत्तम- भारतातील बंदराची कामगिरी कायम ठेवत येत्या काही दिवसांत जागतिक स्तरावर देशाचे नाव उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहू." अशी ग्वाही स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात बोलताना उपाध्यक्ष उन्मेष शरद वाघ यांनी दिली. यावेळी आझादी का अमृत महोत्सवात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल कर्मचाऱ्यांचा उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांच्या हस्ते गौरवही केला.

जेएनपीएने भारत सरकारच्या बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आझादी का अमृत महोत्सवाचा भाग म्हणून या वर्षभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. ज्यामुळे कर्मचारी आणि नागरिक या दोघांनाही लाभ झाला. या उपक्रमांमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, बंदर क्षेत्राविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी बंदरावर शैक्षणिक भेटी, विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, वृक्षारोपण उपक्रम आणि इतर काही उपक्रमांचा समावेश होता. उन्मेष शरद वाघ यांनी सर्व जेएनपीए कर्मचारी, कामगार विश्वस्त आणि भागधारकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन स्वातंत्र्य दिन उत्सवाचा समारोप केला.  

यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अधिकार्‍यांनी देशभक्ती या विषयावर केंद्रीत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता.जेएनपीए हे भारतातील प्रमुख कंटेनर हाताळणी बंदरांपैकी एक आहे. २६ मे १९८९ रोजी स्थापन झाल्यापासून, जेएनपीए बल्क-कार्गो टर्मिनलमधून देशातील प्रमुख कंटेनर बंदर बनले आहे. सध्या जेएनपीए न्हावा -शेवा फ्रंट टर्मिनल,न्हावा -शेवा इंटरनॅशनल कंटेनर टर्मिनल,एनएसआय, बीएमसीटी आणि एपीएमटी अशी पाच कंटेनर टर्मिनल्स चालवते. बंदरात सामान्य मालवाहतूक करण्यासाठी शॅलो वॉटर बर्थ आणि दुसरा लिक्विड कार्गो टर्मिनल आहे. जो बीपीसीएल ,आयओसीएल कन्सोर्टियम आणि नव्याने बांधलेल्या कोस्टल बर्थद्वारे व्यवस्थापित केला जातो.