शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

जेएनपीएत हर घर तिरंगा; स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2023 17:05 IST

जेएनपीएने 'आझादी का अमृत महोत्सव' अंतर्गत भारताचा ७६ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

मधुकर ठाकूर 

उरण : जेएनपीएने 'आझादी का अमृत महोत्सव' अंतर्गत भारताचा ७६ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जनेपप्रा प्रशासन भवन येथे जेएनपोर्ट समुदायाने उत्सवात सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात जेएनपीएचे उपाध्यक्ष उन्मेष शरद वाघ  यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. यावेळी जेएनपीएचे विभाग प्रमुख आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अधिकारी यांच्या उपस्थित होते.

"स्वातंत्र्य दिनाचे स्मरण करत असताना गेल्या वर्षभरात जेएनपीएने आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत अनेक उपक्रमांचे आयोजन केले होते. बंदराच्या वैविध्यपूर्ण कामगिरी आणि योगदानामुळे विविध क्षेत्रांमध्ये आपल्या देशाची प्रतिष्ठा वाढली आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारताच्या सागरी क्षेत्राने आणि बंदरांनी देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. जेएनपोर्टने ३४ वर्षांपासून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आम्ही सर्वोत्तम- भारतातील बंदराची कामगिरी कायम ठेवत येत्या काही दिवसांत जागतिक स्तरावर देशाचे नाव उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहू." अशी ग्वाही स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात बोलताना उपाध्यक्ष उन्मेष शरद वाघ यांनी दिली. यावेळी आझादी का अमृत महोत्सवात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल कर्मचाऱ्यांचा उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांच्या हस्ते गौरवही केला.

जेएनपीएने भारत सरकारच्या बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आझादी का अमृत महोत्सवाचा भाग म्हणून या वर्षभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. ज्यामुळे कर्मचारी आणि नागरिक या दोघांनाही लाभ झाला. या उपक्रमांमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, बंदर क्षेत्राविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी बंदरावर शैक्षणिक भेटी, विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, वृक्षारोपण उपक्रम आणि इतर काही उपक्रमांचा समावेश होता. उन्मेष शरद वाघ यांनी सर्व जेएनपीए कर्मचारी, कामगार विश्वस्त आणि भागधारकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन स्वातंत्र्य दिन उत्सवाचा समारोप केला.  

यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अधिकार्‍यांनी देशभक्ती या विषयावर केंद्रीत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता.जेएनपीए हे भारतातील प्रमुख कंटेनर हाताळणी बंदरांपैकी एक आहे. २६ मे १९८९ रोजी स्थापन झाल्यापासून, जेएनपीए बल्क-कार्गो टर्मिनलमधून देशातील प्रमुख कंटेनर बंदर बनले आहे. सध्या जेएनपीए न्हावा -शेवा फ्रंट टर्मिनल,न्हावा -शेवा इंटरनॅशनल कंटेनर टर्मिनल,एनएसआय, बीएमसीटी आणि एपीएमटी अशी पाच कंटेनर टर्मिनल्स चालवते. बंदरात सामान्य मालवाहतूक करण्यासाठी शॅलो वॉटर बर्थ आणि दुसरा लिक्विड कार्गो टर्मिनल आहे. जो बीपीसीएल ,आयओसीएल कन्सोर्टियम आणि नव्याने बांधलेल्या कोस्टल बर्थद्वारे व्यवस्थापित केला जातो.