शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
3
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
4
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
5
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
6
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
7
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
8
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
9
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
10
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
11
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
12
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
13
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
14
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
15
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
16
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
17
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
18
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
19
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
20
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु

शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या योजनांची अंमलबजावणी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 04:39 IST

शेतकऱ्यांच्या मनात आहे तरी काय? । कोणता मुद्दा आहे महत्त्वाचा? । ‘लोकमत’चे बांधावरून रिपोर्टिंग. नुकसानीचे पंचनामेच होत नाहीत

नागोठणे शहरात अनेक शेतकऱ्यांच्या वडिलोपार्जित शेतजमिनी आहेत. काही नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास परिसरातील सर्व गावांमधील शेतीचे पंचनामे होतात. मात्र, अशावेळी नागोठणेतील शेतकºयांच्या शेतीचे पंचनामेच होत नसल्यामुळे सरकारकडून मिळणाºया लाभापासून शेतकºयांना कायम वंचित राहावे लागत असते. शहरातील हॉटेल व्यावसायिक तसेच इतर घरे, इमारतींचे सांडपाणी शेतात सोडले जात असल्याने पिकलेल्या वाल - पावटासारख्या कडधान्यांना वाजवी दर मिळत नाही याचीच खंत वाटते.-जनार्दन सकपाळ, खडकआळी, नागोठणेभाताला वाढीवदर मिळावेमुंबई-गोवा महामार्गापासून बाळसईमार्गे वांगणी ते वरवठणेपर्यंत जुन्या डावा तीर कालव्याचा तीन-चार वर्षांपूर्वी गाळ काढून साफसफाई केली होती. मात्र, प्रत्यक्षात त्यात अजूनही पाणीच सोडले नसल्याने शेकडो शेतकरी दुबार शेतीपासून वंचितच राहिले आहेत, त्याचा फटका अडीचशे ते तीनशे एकर शेतीला बसत आहे. यामुळे आम्हाला फक्त पावसाळी भातशेतीच करावी लागत आहे. सध्या क्विंटलला बाराशे ते तेराशेचा भाव मिळत असून वाढीव दर मिळणे गरजेचे आहे. - विठोबा दामा शिर्के, वांगणीशेतमालाला हमीभाव मिळावासरकार कोणत्याही पक्षाचे येवो शेतमालाला हमी भाव मिळाला पाहिजे. हंगामानुसार बियाणे खात्रीलायक व कमी दरात उपलब्ध करून द्यावीत. मोठे ओढे नद्यांना मिळतात. या ओढ्यांना काही भागात मार्च-एप्रिलपर्यंत पाणी असते. त्या पाण्यावर भाजीपाला घेतला जातो. शेतकरी अशा ओढ्यांवर दगड, मुरुम, मातीने बांध बांधून पाणी अडवितो. पुढच्या पावसाळ्यात हे कच्चे बांध फुटून जातात. शासनाने ज्या मोठ्या ओढ्यांना पाणी असते त्या ओढ्यांवर छोटे पक्के बंधारे बांधावेत.- सुदाम कडपे, तळेगाववाडी, रसायनीबळीराजाची काळजीघेणारे सरकार हवेकोकणातील शेतकºयांना उत्पन्न जोमाने मिळाले असले तरी शेतीमाल विक्र ीला बाजारपेठ उपलब्ध नसल्याने किरकोळ विक्र ीत शेतकºयांचे नुकसान होते, तर दुसरीकडे हवामान बदलामुळे शेती करपली की अशा स्थितीत शेतकºयाला मदतीची अपेक्षा असते. शासनाचे मदत मिळण्याचे प्रस्ताव असले तरी ते वेळेत मिळत नाही. पावसाच्या आधारावर एकवेळच पीक निघताना नाकीनऊ. त्यामुळे बºयाचदा शेती ओस ठेवली जाते, यामुळे येथील तरु ण शहरात जाऊन चाकरमानी बनलाय. शेतीसाठी आधुनिक पद्धतीने उपाययोजना करणारे सरकार हवेय. येणारे सरकार बळीराजाची काळजी घेणारे असावे.- शरद खेडेकर, शेतकरी, खुजारे, श्रीवर्धनकं पनीच्याप्रदूषणामुळेशेतीचे नुकसानचार वर्षांपूर्वी शासनाने आदिवासी बांधवांना दळी प्लॉट त्यांच्या नावावर करून त्यांना सातबारा उतारा दिला जाईल, या दिलेल्या आश्वासनाची अजून पूर्तता झालेली नाही. वरी, नाचणी तसेच भात ही आमची प्रमुख उत्पादने आहेत व त्यावरच आमची उपजीविका होत असते. मिरची, काकडी, टरबूज याची पिके घेण्याचा प्रयत्न केला तर, कंपनीच्या प्रदूषणामुळे ती पूर्ण तयारच होत नाहीत. वाडीत दोनच विहिरी असल्याने उन्हाळ्यात त्या आटून जात असल्याने दरवर्षी पाणीटंचाई निर्माण होत असते. शासनाने या भागात विंधण विहिरी उपलब्ध कराव्यात. आमच्या डोंगराळ भागात पाच कि. मी. लांबीचा केलेला रस्ता सध्या ढासळत असल्याने शेतकºयांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.- डॉ. जानू भाग्या हंबीर, चेराठी आदिवासीवाडी

टॅग्स :FarmerशेतकरीVotingमतदान