शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
5
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
6
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
7
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
8
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
9
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
10
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
11
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
12
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
13
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
14
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
15
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
16
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
17
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
18
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
19
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
20
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता

शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या योजनांची अंमलबजावणी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 04:39 IST

शेतकऱ्यांच्या मनात आहे तरी काय? । कोणता मुद्दा आहे महत्त्वाचा? । ‘लोकमत’चे बांधावरून रिपोर्टिंग. नुकसानीचे पंचनामेच होत नाहीत

नागोठणे शहरात अनेक शेतकऱ्यांच्या वडिलोपार्जित शेतजमिनी आहेत. काही नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास परिसरातील सर्व गावांमधील शेतीचे पंचनामे होतात. मात्र, अशावेळी नागोठणेतील शेतकºयांच्या शेतीचे पंचनामेच होत नसल्यामुळे सरकारकडून मिळणाºया लाभापासून शेतकºयांना कायम वंचित राहावे लागत असते. शहरातील हॉटेल व्यावसायिक तसेच इतर घरे, इमारतींचे सांडपाणी शेतात सोडले जात असल्याने पिकलेल्या वाल - पावटासारख्या कडधान्यांना वाजवी दर मिळत नाही याचीच खंत वाटते.-जनार्दन सकपाळ, खडकआळी, नागोठणेभाताला वाढीवदर मिळावेमुंबई-गोवा महामार्गापासून बाळसईमार्गे वांगणी ते वरवठणेपर्यंत जुन्या डावा तीर कालव्याचा तीन-चार वर्षांपूर्वी गाळ काढून साफसफाई केली होती. मात्र, प्रत्यक्षात त्यात अजूनही पाणीच सोडले नसल्याने शेकडो शेतकरी दुबार शेतीपासून वंचितच राहिले आहेत, त्याचा फटका अडीचशे ते तीनशे एकर शेतीला बसत आहे. यामुळे आम्हाला फक्त पावसाळी भातशेतीच करावी लागत आहे. सध्या क्विंटलला बाराशे ते तेराशेचा भाव मिळत असून वाढीव दर मिळणे गरजेचे आहे. - विठोबा दामा शिर्के, वांगणीशेतमालाला हमीभाव मिळावासरकार कोणत्याही पक्षाचे येवो शेतमालाला हमी भाव मिळाला पाहिजे. हंगामानुसार बियाणे खात्रीलायक व कमी दरात उपलब्ध करून द्यावीत. मोठे ओढे नद्यांना मिळतात. या ओढ्यांना काही भागात मार्च-एप्रिलपर्यंत पाणी असते. त्या पाण्यावर भाजीपाला घेतला जातो. शेतकरी अशा ओढ्यांवर दगड, मुरुम, मातीने बांध बांधून पाणी अडवितो. पुढच्या पावसाळ्यात हे कच्चे बांध फुटून जातात. शासनाने ज्या मोठ्या ओढ्यांना पाणी असते त्या ओढ्यांवर छोटे पक्के बंधारे बांधावेत.- सुदाम कडपे, तळेगाववाडी, रसायनीबळीराजाची काळजीघेणारे सरकार हवेकोकणातील शेतकºयांना उत्पन्न जोमाने मिळाले असले तरी शेतीमाल विक्र ीला बाजारपेठ उपलब्ध नसल्याने किरकोळ विक्र ीत शेतकºयांचे नुकसान होते, तर दुसरीकडे हवामान बदलामुळे शेती करपली की अशा स्थितीत शेतकºयाला मदतीची अपेक्षा असते. शासनाचे मदत मिळण्याचे प्रस्ताव असले तरी ते वेळेत मिळत नाही. पावसाच्या आधारावर एकवेळच पीक निघताना नाकीनऊ. त्यामुळे बºयाचदा शेती ओस ठेवली जाते, यामुळे येथील तरु ण शहरात जाऊन चाकरमानी बनलाय. शेतीसाठी आधुनिक पद्धतीने उपाययोजना करणारे सरकार हवेय. येणारे सरकार बळीराजाची काळजी घेणारे असावे.- शरद खेडेकर, शेतकरी, खुजारे, श्रीवर्धनकं पनीच्याप्रदूषणामुळेशेतीचे नुकसानचार वर्षांपूर्वी शासनाने आदिवासी बांधवांना दळी प्लॉट त्यांच्या नावावर करून त्यांना सातबारा उतारा दिला जाईल, या दिलेल्या आश्वासनाची अजून पूर्तता झालेली नाही. वरी, नाचणी तसेच भात ही आमची प्रमुख उत्पादने आहेत व त्यावरच आमची उपजीविका होत असते. मिरची, काकडी, टरबूज याची पिके घेण्याचा प्रयत्न केला तर, कंपनीच्या प्रदूषणामुळे ती पूर्ण तयारच होत नाहीत. वाडीत दोनच विहिरी असल्याने उन्हाळ्यात त्या आटून जात असल्याने दरवर्षी पाणीटंचाई निर्माण होत असते. शासनाने या भागात विंधण विहिरी उपलब्ध कराव्यात. आमच्या डोंगराळ भागात पाच कि. मी. लांबीचा केलेला रस्ता सध्या ढासळत असल्याने शेतकºयांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.- डॉ. जानू भाग्या हंबीर, चेराठी आदिवासीवाडी

टॅग्स :FarmerशेतकरीVotingमतदान