शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
5
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
6
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
7
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
8
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
9
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
10
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
11
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
12
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
13
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
14
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
15
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
16
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
17
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
18
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
19
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
20
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख

गांधारी नदीपात्रात बेकायदा वाळूउपसा; राजकीय वरदहस्तामुळे महाडमध्ये महसूल विभागाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 00:17 IST

वाळूउपसा करण्यास असलेली बंदी झुगारून महाड शहराजवळ महामार्गालगत असलेल्या गांधारी नदीच्या पात्रात दररोज शेकडो ब्रास वाळूचा बेकायदेशीर उपसा केला जात आहे.

- संदीप जाधवमहाड : वाळूउपसा करण्यास असलेली बंदी झुगारून महाड शहराजवळ महामार्गालगत असलेल्या गांधारी नदीच्या पात्रात दररोज शेकडो ब्रास वाळूचा बेकायदेशीर उपसा केला जात आहे. या गंभीर बाबीकडे महसूल विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे आरोप स्थानिकांकडून केले जात आहेत. पोकलेन आणि दोन जेसीबीच्या साहाय्याने बेधडकपणे सुरू असलेल्या वाळूउपशामुळे महामार्गावरील गांधारी पुलाशेजारी सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामातील नवीन पुलाच्या बांधकामातही मोठे अडथळे निर्माण होत आहेत.गांधारी नदीपात्रात गेल्या काही दिवसांपासून बेकायदा वाळूउपसा करण्यात येत आहे. वाळूउपसा करणारे सत्ताधारी राजकीय पक्षांशी संबंधित असून, राजकीय वरदहस्तामुळे या वाळमाफियांवर कारवाई करण्याचे धाडस महसूल विभागाकडून होत नसल्याची परिसरात चर्चा आहे.नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर उपसा केलेली वाळू महाड-रायगड मार्गावरील नाते गावच्या पुढे एक कि.मी. असलेल्या एका खासगी जागेत ठेवण्यात येत आहे. या बेकायदेशीर वाळूच्या साठ्यांकडे तलाठी वा मंडल अधिकारी जाणीवपूर्वक डोळेझाक करीत असल्याचे दिसून येते. बंदी असतानाही गांधारी नदीपात्रात बेसुमारपणे होत असलेला हा वाळूउपसा त्वरित थांबवून वाळूमाफियांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.महाडमधील पुलाच्या कामात अडथळारायगड जिल्ह्यातून उल्हास, गाढी, पातळगंगा, सावित्री, काळू, अंबा या नद्या वाहतात; मात्र गेल्या काही दिवसांपासून या नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन होत असल्याच्या घटना समोर येत आहेत.१उपसा होत असलेल्या ठिकाणी पुलाचे पिलर्स उभारण्याचे काम सुरू असून, उपशामुळे पुलाच्या कामातदेखील अडथळे येत असल्याच्या तक्र ारी होत आहेत. मात्र, दहशतीच्या बळावर हा रात्रंदिवस उपसा सुरूच आहे.२उपसा केलेल्या वाळूची दोन ते तीन डंपर्समधून विक्र ीसाठी वाहतूक केली जात असून, कुठल्याही प्रकारची रॉयल्टी न भरता वाळूची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याचे दिसून येत असतानाही महसूल विभागाचे अधिकारी त्याकडे कानाडोळा करीत आहेत.३या वाळूतस्करांवर कारवाई करून बेकायदेशीर उपसा केलेले वाळूचे साठे तसेच यंत्रसामग्री महसूल विभाग जप्त करण्याची धमक दाखवेल काय? असा प्रश्न विचारला जात आहे.जिल्ह्यातील महाड ते धरमतर खाडी परिसरात मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन केले जात आहे. त्याबरोबरच किहीम बीचवरही वाळू उत्खनन झाल्याने किनाऱ्यालगतची २५ ते ३० झाडे उत्मळून पडल्याची घटना वर्षभरापूर्वी घडली आहे. परिणामी किनाºयाची धूपही मोठ्या प्रमाणात होत असून पर्यटनावरही परिणाम होत आहे.पनवेल तालुक्यातील जुई कामोठे परिसरात आॅक्टोबर २०१८ मध्ये करण्यात आलेल्या कारवाईत ४० ब्रास वाळू जप्त करण्यात आली. याशिवाय सक्शनपंप नष्ट करण्यात आले. मात्र, या वेळी कुणालाही अटक करण्यात आली नाही. वाळूमाफियांवर कठोर कारवाई केली तरच बेकायदा उत्खननाला आळा बसेल.यावर ठोस कारवाई होत नसल्याने काहीच दिवसांत परिस्थिती जैसे थे होते. वाळूमाफियांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस कारवाईची गरज असल्याचे मत पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Raigadरायगड