शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

गांधारी नदीपात्रात बेकायदा वाळूउपसा; राजकीय वरदहस्तामुळे महाडमध्ये महसूल विभागाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 00:17 IST

वाळूउपसा करण्यास असलेली बंदी झुगारून महाड शहराजवळ महामार्गालगत असलेल्या गांधारी नदीच्या पात्रात दररोज शेकडो ब्रास वाळूचा बेकायदेशीर उपसा केला जात आहे.

- संदीप जाधवमहाड : वाळूउपसा करण्यास असलेली बंदी झुगारून महाड शहराजवळ महामार्गालगत असलेल्या गांधारी नदीच्या पात्रात दररोज शेकडो ब्रास वाळूचा बेकायदेशीर उपसा केला जात आहे. या गंभीर बाबीकडे महसूल विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे आरोप स्थानिकांकडून केले जात आहेत. पोकलेन आणि दोन जेसीबीच्या साहाय्याने बेधडकपणे सुरू असलेल्या वाळूउपशामुळे महामार्गावरील गांधारी पुलाशेजारी सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामातील नवीन पुलाच्या बांधकामातही मोठे अडथळे निर्माण होत आहेत.गांधारी नदीपात्रात गेल्या काही दिवसांपासून बेकायदा वाळूउपसा करण्यात येत आहे. वाळूउपसा करणारे सत्ताधारी राजकीय पक्षांशी संबंधित असून, राजकीय वरदहस्तामुळे या वाळमाफियांवर कारवाई करण्याचे धाडस महसूल विभागाकडून होत नसल्याची परिसरात चर्चा आहे.नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर उपसा केलेली वाळू महाड-रायगड मार्गावरील नाते गावच्या पुढे एक कि.मी. असलेल्या एका खासगी जागेत ठेवण्यात येत आहे. या बेकायदेशीर वाळूच्या साठ्यांकडे तलाठी वा मंडल अधिकारी जाणीवपूर्वक डोळेझाक करीत असल्याचे दिसून येते. बंदी असतानाही गांधारी नदीपात्रात बेसुमारपणे होत असलेला हा वाळूउपसा त्वरित थांबवून वाळूमाफियांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.महाडमधील पुलाच्या कामात अडथळारायगड जिल्ह्यातून उल्हास, गाढी, पातळगंगा, सावित्री, काळू, अंबा या नद्या वाहतात; मात्र गेल्या काही दिवसांपासून या नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन होत असल्याच्या घटना समोर येत आहेत.१उपसा होत असलेल्या ठिकाणी पुलाचे पिलर्स उभारण्याचे काम सुरू असून, उपशामुळे पुलाच्या कामातदेखील अडथळे येत असल्याच्या तक्र ारी होत आहेत. मात्र, दहशतीच्या बळावर हा रात्रंदिवस उपसा सुरूच आहे.२उपसा केलेल्या वाळूची दोन ते तीन डंपर्समधून विक्र ीसाठी वाहतूक केली जात असून, कुठल्याही प्रकारची रॉयल्टी न भरता वाळूची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याचे दिसून येत असतानाही महसूल विभागाचे अधिकारी त्याकडे कानाडोळा करीत आहेत.३या वाळूतस्करांवर कारवाई करून बेकायदेशीर उपसा केलेले वाळूचे साठे तसेच यंत्रसामग्री महसूल विभाग जप्त करण्याची धमक दाखवेल काय? असा प्रश्न विचारला जात आहे.जिल्ह्यातील महाड ते धरमतर खाडी परिसरात मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन केले जात आहे. त्याबरोबरच किहीम बीचवरही वाळू उत्खनन झाल्याने किनाऱ्यालगतची २५ ते ३० झाडे उत्मळून पडल्याची घटना वर्षभरापूर्वी घडली आहे. परिणामी किनाºयाची धूपही मोठ्या प्रमाणात होत असून पर्यटनावरही परिणाम होत आहे.पनवेल तालुक्यातील जुई कामोठे परिसरात आॅक्टोबर २०१८ मध्ये करण्यात आलेल्या कारवाईत ४० ब्रास वाळू जप्त करण्यात आली. याशिवाय सक्शनपंप नष्ट करण्यात आले. मात्र, या वेळी कुणालाही अटक करण्यात आली नाही. वाळूमाफियांवर कठोर कारवाई केली तरच बेकायदा उत्खननाला आळा बसेल.यावर ठोस कारवाई होत नसल्याने काहीच दिवसांत परिस्थिती जैसे थे होते. वाळूमाफियांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस कारवाईची गरज असल्याचे मत पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Raigadरायगड