शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

‘हॅलो फॉरेस्ट’ ही संकल्पना ठरतेय सकारात्मक; हेल्पलाइनद्वारे जिल्ह्यातील ३६ वणवे विझवण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 05:18 IST

जंगलांना लागणारे वणवे रोखण्यासाठी वनविभागाने सुरू केलेल्या ‘हॅलो फॉरेस्ट’ या हेल्पलाइनद्वारे रायगड जिल्ह्यातील ३६ वणवे विझवण्यात वन विभागाला यश आले आहे.

- आविष्कार देसाईअलिबाग : जंगलांना लागणारे वणवे रोखण्यासाठी वनविभागाने सुरू केलेल्या ‘हॅलो फॉरेस्ट’ या हेल्पलाइनद्वारे रायगड जिल्ह्यातील ३६ वणवे विझवण्यात वन विभागाला यश आले आहे. वणवे लागलेल्या ठिकाणी तेथील वणवे अधिक उग्ररुप धारण करण्याआधीच वन विभागाची मदत पोचल्याने वन्य जीवांच्या रक्षणासाठी ‘हॅलो फॉरेस्ट’ही संकल्पना सकारात्मक ठरत आहे. वन विभागाचा हेल्पलाइन नंबर सातत्याने खणखणत असल्याने नागरिकांमध्ये ‘हॅलो फॉरेस्ट’बाबत जागृती होत असल्याचे दिसून येते.रायगड जिल्हा हा निसर्ग संपन्नतेने नटलेला जिल्हा आहे. समुद्राबरोबरच येथे मोठ्या प्रमाणात वनसंपदा असल्याने त्याच्या सौंदर्यात भरच पडते. जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने शेती हा व्यवसाय केला जातो. त्यामुळे उन्हाळ््याच्या मोसमामध्ये शेतीची मशागत सुरु असते. त्यावेळी शेतात लावलेल्या आगीमुळे एखादी ठिणगी वनसंपदा नष्ट करण्यास कारणीभूत ठरते. जळती सिगारेट गवतामध्ये फेकल्यानेही आग लागण्याचे कारण ठरत आहे. त्याचप्रमाणे वातावरणातील अतिउष्णतेमुळे दगडाच्या घर्षणामुळे ठिणगी उडूनही गवत पेटल्याची अनेक उदाहरणे आहेत. या सर्व प्रकारांमुळे वनांना वणवे लागण्याच्या घटना घडत असतात. रात्री अपरात्री वणवे लागल्यास त्याबाबत काहीच माहिती मिळत नसायची. त्यामुळे मोठ्या संख्येने वनसंपदा जळून खाक होत होती. तसेच काही वेळेला वन्य प्राणी मानवी वस्तीमध्ये घुसणे, जंगलाची अनधिकृत तोड करणे, वन जमिनीतून बेकायदा उत्खनन करणे अशा घटनाही सातत्याने घडत होत्या.वन विभागाचे क्षेत्र मोठे असल्याने सर्वच ठिकाणी लक्ष देणे कठीण होते. यासाठी ६ जानेवारी २०१७ साली सरकारने ‘हॅलो फॉरेस्ट’ ही संकल्पना अस्तित्वात आणली. यासाठी १९२६ हा टोल फ्री क्रमांक नागरिकांसाठी खुला करण्यात आला. अलिबाग, उरण, कर्जत, पनवेल तालुक्यातील नागरिकांनी या हेल्पलाइनचा आतापर्यंत सर्वाधिक वापर केला आहे. २०१७ या कालावधीत १० आणि २०१८मध्ये २६ वणवे लागण्याच्या घटना घडल्याबाबत त्यांनी माहिती वन विभागाला दिली आहे. त्यामुळे वन विभागाला वेळीच उपाययोजना करणे शक्य झाले आहे. तातडीने त्या ठिकाणी मदत पोचवून आग विझवण्यात वन विभागाला यश आले आहे. वेळीच माहिती उपलब्ध झाल्याने लागलेल्या वणव्याचे रूपांतर फार मोठ्या आगीत झालेले नाही. त्यामुळे वन संपदेचे होणारे नुकसान टाळता आले आहे.‘हॅलो फॉरेस्ट’ हेल्पलाइनवर कोणीही सर्वसामान्य नागरिक वनविभागाशी संबंधित तक्र ार करु शकतो. तक्र ार केल्यानंतर मुंबई येथील केंद्रीय नियंत्रण कक्षातून संबंधित वन अधिकाऱ्यांना एसएमएस येतो. त्यानंतर वन अधिकारी संबंधित अधिकाºयाकडे माहिती देतो. त्यानंतर तातडीने कार्यवाही केली जाते. त्यानंतरही नियंत्रण कक्षातून त्या तक्रारीचा पाठपुरावा केला जात असल्याने तक्रारी सुटण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते.तत्काळ मदत पोचवणे सहज शक्यरायगड जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या बेकायदेशीर शिकारी केल्या जातात. जैवविविधता धोक्यात आणणारी ही बेकायदेशीर शिकार रोखण्यासाठीही या हेल्पलाइनचा वापर आता रायगड जिल्ह्यात होत आहे. २४ तास कार्यरत असणाºया या हेल्पलाइनमुळे वनविभाग कर्मचारी, वनसमितीचे सदस्य, सर्पमित्र, निसर्ग मित्र यांच्या मदतीने तत्काळ मदत पोचवणे सहज शक्य झाले आहे.त्याचप्रमाणे मालकी क्षेत्रात शिरणाºया वन्य प्राण्यांमुळे शेतकºयांचे मोठे नुकसान होते. हे वाचविण्यासाठीही ही हेल्पलाइन उपयुक्त ठरत आहे. काही लोकांच्या घरामध्ये साप शिरल्याच्या तक्रारी हे हेल्पलाइनवर आल्या आहेत. त्यानुसार संबंधित सर्प मित्रांना तेथे पाठवणे सोपे झाले आहे. नागरिकांच्या तक्र ारीचे तत्काळ निरसन केले जात असल्याने या हेल्पलाइनची चांगली मदत होत आहे.वणवे लागल्याने वनसंपदेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. कारण वणवे लागल्याची माहिती खूपच उशिरा मिळत होती. हेल्पलाइनवर मोठ्या संख्येने फोन, एसएमएस येत असल्याने लागलेले वणवे तातडीने आटोक्यात आणण्यात यश येत आहे. नागरिकांमध्ये चांगलीच जागरुकता आली आहे. त्यामुळे वनांसह वन्य प्राण्यांचे रक्षण करता येत आहे.- मनीष कुमार, जिल्हा वन अधिकारी, रायगड

टॅग्स :fireआग