शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

श्रीवर्धन, म्हसळा तालुक्यातील शेकडो गावे अजूनही अंधारात, काम थंडावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 00:31 IST

कोरोना प्रादुर्भाव, कमी पडत असलेले मनुष्यबळ, वीज पूर्ववत करण्यासाठी आवश्यक ते साहित्य आणि पावसाचे दिवस यामुळे व्यत्यय येत असल्याचे सांगितले जाते.

म्हसळा : निसर्ग चक्रीवादळातून विजेचे वीजप्रवाह खांबसुद्धा सुटले नाहीत. यामुळे सगळीकडे अंधार पडला आहे. रायगडचे खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांनी वीज वितरण कार्यकारी अभियंता रघुनाथ माने, सहा.अभियंता खांडेकर आणि त्यांचे सहकारी अधिकारी, कर्मचारी यांच्या मदतीने म्हसळा, श्रीवर्धन तालुक्यात कोलमडलेली वीज वितरण व्यवस्था तातडीने सुरळीत होईल, असे प्रयत्न केले आहेत, पण कोरोना प्रादुर्भाव, कमी पडत असलेले मनुष्यबळ, वीज पूर्ववत करण्यासाठी आवश्यक ते साहित्य आणि पावसाचे दिवस यामुळे व्यत्यय येत असल्याचे सांगितले जाते.तालुका शहरे वगळली, तर गेली महिनाभरात शेकड्यांनी गावे अंधारात आहेत. महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे काम आणि सांगण्यात येत असलेली कारणे अशीच सुरू राहिले, तर खेडेगावात महिना दोन महिने नव्हे, वर्ष, दोन वर्षे वीजपुरवठा खंडित राहील, असे वीज वितरण कंपनीतल कर्मचारी लोकांना सांगत आहेत.शासन स्तरावर वीजपुरवठा करण्यासाठी युद्धपातळीवर यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. मुख्यकरून ताप, सर्दी, खोकल्याची साथ आणि कोरोनाची भीती असे असताना, वैद्यकीय गरज लागली, तर सेवा मिळवायची कशी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. वीज नसल्याने फोन चार्ज होत नाहीत, नळपाणीपुरवठा योजनेला पाणी येत नाही. गावांमध्ये नेटवर्क नसल्याने डॉक्टर, नर्स कोणालाही फोन करता येत नसल्याचे चित्र आहे. केवळ शहरी भागातील काही ठिकाणी विजेचा पुरवठा झाल्यानंतर, खेडेगावातही उशिरा का होईना, विजेची व्यवस्था व्हायला पाहिजे आहे, ती महिना उलटला तरी होताना दिसत नाही. अखेरीस कंटाळून अनेक गावांतील चाकरमानी कुटुंबे बायका-मुले घेऊन परत मुंबई, पुणे आधी शहरात निघून गेले आहेत.१२ जुलैपर्यंत हीच स्थितीवादळामुळे तब्बल १५ हजार विजेचे खांब पडले होते. विजेच्या तारा, वीज जनित्रे यांचीही मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती. सुरुवातीला तब्बल १,९०६ गावातील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर, महावितरणने युद्ध पातळीवर काम करून वीजपुरवठा पूर्ववत केला आहे. अद्याप माणगाव, म्हसळा, रोहा आणि श्रीवर्धन तालुक्यातील १९० गावांमध्ये विद्युत पुरवठा खंडित आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्याचे महावितरणेचे प्रयत्न सुरू आहेत. ५ जुलैपर्यंत माणगाव, म्हसळा, रोहा तर श्रीवर्धन तालुक्यात १२ जुलैपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत होणार असल्याने अद्यापही गावे अंधारामध्ये चाचपडत आहेत.

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरण