शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

श्रीवर्धन, म्हसळा तालुक्यातील शेकडो गावे अजूनही अंधारात, काम थंडावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 00:31 IST

कोरोना प्रादुर्भाव, कमी पडत असलेले मनुष्यबळ, वीज पूर्ववत करण्यासाठी आवश्यक ते साहित्य आणि पावसाचे दिवस यामुळे व्यत्यय येत असल्याचे सांगितले जाते.

म्हसळा : निसर्ग चक्रीवादळातून विजेचे वीजप्रवाह खांबसुद्धा सुटले नाहीत. यामुळे सगळीकडे अंधार पडला आहे. रायगडचे खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांनी वीज वितरण कार्यकारी अभियंता रघुनाथ माने, सहा.अभियंता खांडेकर आणि त्यांचे सहकारी अधिकारी, कर्मचारी यांच्या मदतीने म्हसळा, श्रीवर्धन तालुक्यात कोलमडलेली वीज वितरण व्यवस्था तातडीने सुरळीत होईल, असे प्रयत्न केले आहेत, पण कोरोना प्रादुर्भाव, कमी पडत असलेले मनुष्यबळ, वीज पूर्ववत करण्यासाठी आवश्यक ते साहित्य आणि पावसाचे दिवस यामुळे व्यत्यय येत असल्याचे सांगितले जाते.तालुका शहरे वगळली, तर गेली महिनाभरात शेकड्यांनी गावे अंधारात आहेत. महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे काम आणि सांगण्यात येत असलेली कारणे अशीच सुरू राहिले, तर खेडेगावात महिना दोन महिने नव्हे, वर्ष, दोन वर्षे वीजपुरवठा खंडित राहील, असे वीज वितरण कंपनीतल कर्मचारी लोकांना सांगत आहेत.शासन स्तरावर वीजपुरवठा करण्यासाठी युद्धपातळीवर यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. मुख्यकरून ताप, सर्दी, खोकल्याची साथ आणि कोरोनाची भीती असे असताना, वैद्यकीय गरज लागली, तर सेवा मिळवायची कशी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. वीज नसल्याने फोन चार्ज होत नाहीत, नळपाणीपुरवठा योजनेला पाणी येत नाही. गावांमध्ये नेटवर्क नसल्याने डॉक्टर, नर्स कोणालाही फोन करता येत नसल्याचे चित्र आहे. केवळ शहरी भागातील काही ठिकाणी विजेचा पुरवठा झाल्यानंतर, खेडेगावातही उशिरा का होईना, विजेची व्यवस्था व्हायला पाहिजे आहे, ती महिना उलटला तरी होताना दिसत नाही. अखेरीस कंटाळून अनेक गावांतील चाकरमानी कुटुंबे बायका-मुले घेऊन परत मुंबई, पुणे आधी शहरात निघून गेले आहेत.१२ जुलैपर्यंत हीच स्थितीवादळामुळे तब्बल १५ हजार विजेचे खांब पडले होते. विजेच्या तारा, वीज जनित्रे यांचीही मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती. सुरुवातीला तब्बल १,९०६ गावातील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर, महावितरणने युद्ध पातळीवर काम करून वीजपुरवठा पूर्ववत केला आहे. अद्याप माणगाव, म्हसळा, रोहा आणि श्रीवर्धन तालुक्यातील १९० गावांमध्ये विद्युत पुरवठा खंडित आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्याचे महावितरणेचे प्रयत्न सुरू आहेत. ५ जुलैपर्यंत माणगाव, म्हसळा, रोहा तर श्रीवर्धन तालुक्यात १२ जुलैपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत होणार असल्याने अद्यापही गावे अंधारामध्ये चाचपडत आहेत.

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरण