शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना
3
काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
4
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
5
'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
6
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
7
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
8
२ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
9
साडेसहा महिन्यांच्या गर्भवती तिरंदाजाची कमाल; पोटात बाळाची हालचात तरी अचूक साधला नेम
10
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
11
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
12
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
13
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
14
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
15
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
16
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
17
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
18
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
19
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
20
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी

शाळांना सुट्टी मात्र खासगी क्लासेस सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 01:32 IST

मुलांच्या सुरक्षेचे काय?; संबंधितांवर कारवाईची मागणी

- सिकंदर अनवारेदासगाव : गेल्या पाच दिवसांपासून संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस कोसळत असून सर्वत्र पुराचे पाणी शिरल्याने मुलांच्या सुरक्षेच्या कारणास्तव सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर केली. मात्र, खासगी क्लासेसकडून क्लासेस सुरूच ठेवले गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. क्लासेस सुरू ठेवल्याने अनेक मुलांना ग्रामीण भागातून पुराच्या पाण्यातून वाट काढत यावे लागले आहे. शासकीय आदेश न पाळणाऱ्या या खासगी क्लासेसवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.मुसळधार पावसाने दाणादाण उडाली असून, महाड तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. ग्रामीण भागातील एस.टी. सेवा आणि खासगी वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. महाड आणि परिसरात सातत्याने पाणी रस्त्यांवर येत आहे. तर हवामान खात्याने दिलेल्या इशाºयामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सर्व प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळा बंद ठेवण्यात आल्या. तालुक्यातील बहुतांश शाळा या ग्रामीण भागात आणि नदी, नाले आणि ओठ्याकाठी आहेत. तर शहरातही पूरस्थिती असल्याने शाळा, महाविद्यालये, बंद ठेवण्यात आल्या. शहरात पुराचे पाणी असल्याने कोणताच धोका निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला असला तरी खासगी क्लासेसने मात्र याकडे दुर्लक्ष करून क्लासेस सुरूच ठेवले आहेत.महाड शहरात अनेक खासगी क्लासेस आहेत. यामध्ये शेकडो मुले शिक्षण घेत आहेत. क्लास असल्याने विद्यार्थीही क्लासला येण्यासाठी कोसळणाºया पावसाचा विचार न करता क्लासमध्ये दाखल होत आहेत. महाडमध्ये आजूबाजूच्या गावातूनही खासगी क्लासमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दादली पूल, गांधारी पूल, महाड दस्तुरी नाका, बिरवाडी आदी भागात गेले पाच दिवस पुराचे पाणी कायम आहे. क्लासमध्ये विद्यार्थी दाखल झाल्यानंतर पाणी पातळीत वाढ झाल्यास घरी सुरक्षितपणे जाणे कठीण होणार आहे. याचा विचार मात्र खासगी क्लासेस चालकांनी न करता क्लासेस सुरूच ठेवले. यामुळे पालकांनी आश्चर्य व्यक्त के लेआहे. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी क्लासचालकांची उठाठेव सुरू आहे.याबाबत माहिती प्राप्त झाल्यास चौकशी करून तत्काळ करवाई केली जाईल.- सागर पाठक, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, अलिबाग