शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

महाड, पोलादपूर विभागात महामार्गाचे काम रखडणार? ठेकेदार कंपनी अडचणीत  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2020 23:45 IST

Mumbai Goa highway : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे चौपदरीकरणाचे काम इंदापूर ते कोकणच्या तळापर्यंत सुरू आहे. हे काम दोन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित होते. त्याप्रमाणे वर्क ऑर्डर देताना काम पूर्ण करण्याची अंतिम तारीख २६ नोव्हेंबर २०२० अशी होती.

- सिकंदर अनवारेदासगाव : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे दुसऱ्या टप्प्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. कोरोनामुळे सात महिने हे काम बंद होते. आता पुन्हा या कामाला तेजी आली असली तरी महाड आणि पोलादपूर विभागात आजही १५ टक्के जमीन महामार्गाकडे वर्ग नसल्याने हे काम त्या ठिकाणी थांबले आहे. ठेकेदार कंपनीही हे काम वेळेवर पूर्ण करू शकत नाही. अशा वेळी महाड व पोलादपूर विभागातील महामार्गाचे काम अडचणीत आले आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे चौपदरीकरणाचे काम इंदापूर ते कोकणच्या तळापर्यंत सुरू आहे. हे काम दोन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित होते. त्याप्रमाणे वर्क ऑर्डर देताना काम पूर्ण करण्याची अंतिम तारीख २६ नोव्हेंबर २०२० अशी होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले सहा महिने काम बंद होते. त्यामुळे ठेकेदार कंपनीला मुदतवाढ देत जून २०२१ करण्यात आली. जरी मुदतवाढ देण्यात आली असली तरी महाड आणि पोलादपूर तालुक्यामध्ये होत असलेल्या चौपदरीकरणाच्या कामामधील जवळपास १५ टक्के जमिनी आजही महामार्ग विभागाकडे वर्ग नाहीत. अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी दुसऱ्या टप्प्याचे चौपदरीकरणाचे काम थांबले आहे. जरी इतर ठिकाणी ठेकेदार कंपनी काम करत असली तरी जोपर्यंत महामार्ग विभागाकडून १५ टक्के जमिनीचा खुलासा होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी कामाला हात लावू शकत नाही. ठेकेदार कंपनीकडून दिलेल्या माहितीप्रमाणे, राष्ट्रीय महामार्ग विभागाने ठेकेदार कंपनीला डिसेंबर २०१९ पर्यंत सर्व जमिनी ताब्यात देण्याचे ठरविले होते....तरच चौपदरीकरणाचे काम पूर्ण करणारमहाड आणि पोलादपूर तालुक्यातील १५ टक्के जमिनीवर सध्या महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम थांबले आहे. ठेकेदार एल अ‍ॅण्ड टी कंपनीचे अधिकारी जगमोहन नायडू यांच्याकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, जून २०२१ पर्यंत ही कंपनी आपल्या हद्दीतील चौपदरीकरणाचे काम पूर्ण करणार आहे. १५ टक्के काम जर क्लीअर झाले नाही, तर ठेकेदार कंपनीकडून केले जाणार नाही. जर ८५ टक्के काम पूर्ण करून ठेकेदार कंपनी निघून गेली तर हे दुसऱ्या टप्प्याचे काम अर्धवट राहून हा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग पुन्हा अडचणीत येऊन पहिल्या टप्प्याप्रमाणे पडून राहणार आहे. तरी संबंधित खात्याने गांभीर्याने यात लक्ष घालणे गरजेचे आहे.७ टक्के जमिनी वनविभागाच्या १५ टक्केमध्ये ७ टक्के जमिनी वनविभागाच्या आहेत तर ८ टक्के जमिनी या खाजगी मालकीच्या आहेत. या मालकीच्या जमिनींमध्ये काही ठिकाणी बांधकामेही आहेत. १५ वर्षांपूर्वी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचा आराखडा तयार करण्यात आला होता. पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्यातील जमिनी त्याच वेळी भूसंपादित करण्यात आल्या. शेतकऱ्यांना मोबदलाही मिळाला. दुसऱ्या टप्प्यातील जमिनी चार वर्षांपूर्वी संपादित झाल्या. मग या १५ टक्के जमिनी सरकारकडून झुलवत का ठेवण्यात आल्या? चार वर्षांत वन विभागाच्या जमिनींचा निर्णय कळविण्यात आला नाही. जे खाजगी जमीन मालक आहेत त्यांच्यादेखील अडचणी का दूर करण्यात आल्या नाहीत, असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत असून, गेल्या चार वर्षांपासून शासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. परिणामी, आज या अडचणी समोर आल्या आहेत.एल अ‍ॅण्ड टी कंपनीने घेतलेले काम जून २०२१ पर्यंत पूर्ण केले जाणार आहे. उर्वरित जमीन क्लीअर करून दिली, तर सर्व काम जूनपर्यंत पूर्ण केले जाईल.    - जगमोहन नायडू,     प्रोजेक्ट अधिकारी,     एल अ‍ॅण्ड टी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले सहा महिने काम बंद होते. त्यामुळे ठेकेदार कंपनीला मुदतवाढ देत जून २०२१ करण्यात आली.

टॅग्स :Raigadरायगडhighwayमहामार्ग