शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

जिल्ह्यात पुढील दोन दिवस अतिदक्षतेचा इशारा; हजारो बोटींनी टाकले नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 01:23 IST

‘महा’ चक्रीवादळाची तीव्रता ८ नोव्हेंबरपर्यंत : सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने प्रवासी वाहतूक थांबवली

आविष्कार देसाई 

अलिबाग : ‘महा’ चक्रीवादळाची तीव्रता ८ नोव्हेंबरपर्यत राहणार आहे. या कालावधीत ताशी ८० किमीच्या वेगाने वारे वाहणार आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्याच्या विविध ठिकाणी ६०० पेक्षा अधिक मासेमारी बोटींनी नांगर टाकला आहे. प्रवासी वाहतूक करणाºया बोटींनाही वाहतूक बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने जिल्ह्यात चांगलाच धुमाकूळ घातल्यानंतर क्यार चक्रीवादळ आणि गेल्या चार दिवसांपासून महा चक्रीवादळामुळे जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये हाहाकार उडवून दिला आहे. सोबतीला मुसळधार पाऊस असल्याने नागरिक कमालीचे भयभीत झाले आहेत. अवकाळी, परतीचा पावसामुळे शेतातील पीक आडवे झाले आहे. हातातोंडाशी आलेल्या भाताच्या पिकाचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

मासेमारी व्यावसायिकांनाही या कालावधीत मासेमारी करता न आल्याने तेही नुकसानीच्या खाईत लोटले गेले आहेत. जमिनीवरील शेतकरी आणि समुद्रातील मच्छीमार अशा अर्थव्यवस्थेतील प्रमुख दोन्ही घटकांना वादळाचा तडाखा बसला आहे. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले असले तरी, अद्यापही प्रशासन काही ठिकाणच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले नाही ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. २०१६-१७ आणि २०१७-१८ या कालावधीत अवकाळी पावसाने शेतकºयांसह बागायतदारांचे नुकसान झाले होते. प्रशासनाने पंचनामे केल्यानंतर दोन्ही वर्षांचे मिळून तब्बल १७ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे पुढे आले होते. तेव्हाच्या नुकसानभरपाईच्या रकमेचे वाटप शेतकºयांना आता करण्यात येत आहे. त्यामुळे आता सुरू करण्यात आलेल्या पंचनाम्याची आर्थिक नुकसानभरपाई तीन वर्षांनी मिळणार काय, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महा चक्रीवादळाची तीव्रता ८ नोव्हेंबरपर्यंत राहणार आहे. त्याचप्रमाणे विजेचा कडकडाट आणि वादळी वाºयासह जोरदार पाऊस पडणार असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी लोकमतशी बोलताना दिली. पुढील दोन दिवस सोसाट्याचा वारा वाहणार असल्याने समुद्र खवळलेल्या स्थितीमध्ये राहणार आहे. ताशी ८० किमीच्या वेगाने वारे वाहणार असल्याने समुद्रात मासेमारी करण्यास मनाई करण्यात आली आहे. आधीच हजारो बोटी किनाºयावर उभ्या आहेत. त्यामध्ये आज ६०० बोटींची भर पडली आहे. जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये बोटी नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. पीएनपी, मालदार, अजंठा यांच्यासह रेवस, मोरा येथे प्रवासी वाहतूक करणाºया बोटींनी प्रवासी वाहतूक करू नये, असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत, असेही पाठक यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे अवाहन प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :Raigadरायगडraigad-pcरायगडRainपाऊस