शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पुढील दोन दिवस अतिदक्षतेचा इशारा; हजारो बोटींनी टाकले नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 01:23 IST

‘महा’ चक्रीवादळाची तीव्रता ८ नोव्हेंबरपर्यंत : सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने प्रवासी वाहतूक थांबवली

आविष्कार देसाई 

अलिबाग : ‘महा’ चक्रीवादळाची तीव्रता ८ नोव्हेंबरपर्यत राहणार आहे. या कालावधीत ताशी ८० किमीच्या वेगाने वारे वाहणार आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्याच्या विविध ठिकाणी ६०० पेक्षा अधिक मासेमारी बोटींनी नांगर टाकला आहे. प्रवासी वाहतूक करणाºया बोटींनाही वाहतूक बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने जिल्ह्यात चांगलाच धुमाकूळ घातल्यानंतर क्यार चक्रीवादळ आणि गेल्या चार दिवसांपासून महा चक्रीवादळामुळे जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये हाहाकार उडवून दिला आहे. सोबतीला मुसळधार पाऊस असल्याने नागरिक कमालीचे भयभीत झाले आहेत. अवकाळी, परतीचा पावसामुळे शेतातील पीक आडवे झाले आहे. हातातोंडाशी आलेल्या भाताच्या पिकाचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

मासेमारी व्यावसायिकांनाही या कालावधीत मासेमारी करता न आल्याने तेही नुकसानीच्या खाईत लोटले गेले आहेत. जमिनीवरील शेतकरी आणि समुद्रातील मच्छीमार अशा अर्थव्यवस्थेतील प्रमुख दोन्ही घटकांना वादळाचा तडाखा बसला आहे. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले असले तरी, अद्यापही प्रशासन काही ठिकाणच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले नाही ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. २०१६-१७ आणि २०१७-१८ या कालावधीत अवकाळी पावसाने शेतकºयांसह बागायतदारांचे नुकसान झाले होते. प्रशासनाने पंचनामे केल्यानंतर दोन्ही वर्षांचे मिळून तब्बल १७ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे पुढे आले होते. तेव्हाच्या नुकसानभरपाईच्या रकमेचे वाटप शेतकºयांना आता करण्यात येत आहे. त्यामुळे आता सुरू करण्यात आलेल्या पंचनाम्याची आर्थिक नुकसानभरपाई तीन वर्षांनी मिळणार काय, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महा चक्रीवादळाची तीव्रता ८ नोव्हेंबरपर्यंत राहणार आहे. त्याचप्रमाणे विजेचा कडकडाट आणि वादळी वाºयासह जोरदार पाऊस पडणार असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी लोकमतशी बोलताना दिली. पुढील दोन दिवस सोसाट्याचा वारा वाहणार असल्याने समुद्र खवळलेल्या स्थितीमध्ये राहणार आहे. ताशी ८० किमीच्या वेगाने वारे वाहणार असल्याने समुद्रात मासेमारी करण्यास मनाई करण्यात आली आहे. आधीच हजारो बोटी किनाºयावर उभ्या आहेत. त्यामध्ये आज ६०० बोटींची भर पडली आहे. जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये बोटी नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. पीएनपी, मालदार, अजंठा यांच्यासह रेवस, मोरा येथे प्रवासी वाहतूक करणाºया बोटींनी प्रवासी वाहतूक करू नये, असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत, असेही पाठक यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे अवाहन प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :Raigadरायगडraigad-pcरायगडRainपाऊस