शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

जिल्ह्यात पुढील दोन दिवस अतिदक्षतेचा इशारा; हजारो बोटींनी टाकले नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 01:23 IST

‘महा’ चक्रीवादळाची तीव्रता ८ नोव्हेंबरपर्यंत : सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने प्रवासी वाहतूक थांबवली

आविष्कार देसाई 

अलिबाग : ‘महा’ चक्रीवादळाची तीव्रता ८ नोव्हेंबरपर्यत राहणार आहे. या कालावधीत ताशी ८० किमीच्या वेगाने वारे वाहणार आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्याच्या विविध ठिकाणी ६०० पेक्षा अधिक मासेमारी बोटींनी नांगर टाकला आहे. प्रवासी वाहतूक करणाºया बोटींनाही वाहतूक बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने जिल्ह्यात चांगलाच धुमाकूळ घातल्यानंतर क्यार चक्रीवादळ आणि गेल्या चार दिवसांपासून महा चक्रीवादळामुळे जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये हाहाकार उडवून दिला आहे. सोबतीला मुसळधार पाऊस असल्याने नागरिक कमालीचे भयभीत झाले आहेत. अवकाळी, परतीचा पावसामुळे शेतातील पीक आडवे झाले आहे. हातातोंडाशी आलेल्या भाताच्या पिकाचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

मासेमारी व्यावसायिकांनाही या कालावधीत मासेमारी करता न आल्याने तेही नुकसानीच्या खाईत लोटले गेले आहेत. जमिनीवरील शेतकरी आणि समुद्रातील मच्छीमार अशा अर्थव्यवस्थेतील प्रमुख दोन्ही घटकांना वादळाचा तडाखा बसला आहे. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले असले तरी, अद्यापही प्रशासन काही ठिकाणच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले नाही ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. २०१६-१७ आणि २०१७-१८ या कालावधीत अवकाळी पावसाने शेतकºयांसह बागायतदारांचे नुकसान झाले होते. प्रशासनाने पंचनामे केल्यानंतर दोन्ही वर्षांचे मिळून तब्बल १७ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे पुढे आले होते. तेव्हाच्या नुकसानभरपाईच्या रकमेचे वाटप शेतकºयांना आता करण्यात येत आहे. त्यामुळे आता सुरू करण्यात आलेल्या पंचनाम्याची आर्थिक नुकसानभरपाई तीन वर्षांनी मिळणार काय, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महा चक्रीवादळाची तीव्रता ८ नोव्हेंबरपर्यंत राहणार आहे. त्याचप्रमाणे विजेचा कडकडाट आणि वादळी वाºयासह जोरदार पाऊस पडणार असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी लोकमतशी बोलताना दिली. पुढील दोन दिवस सोसाट्याचा वारा वाहणार असल्याने समुद्र खवळलेल्या स्थितीमध्ये राहणार आहे. ताशी ८० किमीच्या वेगाने वारे वाहणार असल्याने समुद्रात मासेमारी करण्यास मनाई करण्यात आली आहे. आधीच हजारो बोटी किनाºयावर उभ्या आहेत. त्यामध्ये आज ६०० बोटींची भर पडली आहे. जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये बोटी नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. पीएनपी, मालदार, अजंठा यांच्यासह रेवस, मोरा येथे प्रवासी वाहतूक करणाºया बोटींनी प्रवासी वाहतूक करू नये, असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत, असेही पाठक यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे अवाहन प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :Raigadरायगडraigad-pcरायगडRainपाऊस