शहरं
Join us  
Trending Stories
1
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
2
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
3
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
4
सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
5
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
7
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
8
अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती
9
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
10
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
11
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
12
डोक्याला ताप! दिवसभर इन्स्टाग्रामवर रील बनवायची बायको; नवरा ओरडल्यावर मुलासह गायब
13
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
14
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
15
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
16
"बेबी, स्वीटी, तू माझ्यासोबत...!" विद्यार्थीनीसोबत एवढ्या घाणेरड्या गप्पा, समोर आलं चैतन्यानंदचं घृणास्पद चॅट
17
IMD: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार; ओडिशा किनारपट्टीला धोका!
18
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
19
IND vs WI : जादूगर आला अन् जादू दाखवून गेला! काही कळायच्या आत कुलदीपनं कॅरेबियन बॅटरचा खेळ केला खल्लास (VIDEO)
20
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त

'शेतकऱ्यांना एकरी ८० हजार रुपये मदत करा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 02:28 IST

जिल्ह्यात तयार झालेले भाताचे पीक काही ठिकाणी कापण्यात आले होते.

अलिबाग : परतीच्या पावसाने रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे येथील शेतकरी देशोधडीला लागला आहे. नुकसानग्रस्त शेतकºयांना एकरी ८० हजार रुपये शासनाने मदत म्हणून तत्काळ द्यावी, याबाबतचे निवेदन अलिबागमधील वकिलांनी निवासी उप जिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांना शनिवारी दिले.

जिल्ह्यात तयार झालेले भाताचे पीक काही ठिकाणी कापण्यात आले होते. मात्र, परतीच्या पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचल्यामुळे तयार लोंबींना कोंब आल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाच्या अनेक योजनांपासून येथील शेतकरी आजही वंचित आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अलिबागचे थोर नेते नारायण नागू पाटील यांनी कूळ कायदा निर्माण करूनही शेतकरी आजही ७/१२ मालकी हक्कापासून बेदखल असल्याचे या वेळी निवेदनात नमूद करण्यात आले आहे. जिल्ह्यातील भातशेती ही डोंगरखोºयांच्या उतारावर असल्यामुळे १० ते १५ गुंठे क्षेत्रात खाचरांची शेती केली जाते. येथील शेतकºयांच्या वाट्याला १५ ते २० गुंठे इतके क्षेत्र आहे, त्यातही कौटुंबिक भाऊबंदकी आहे. एका मजुराची मजुरी ३५० ते ४०० रुपयांवर जाते, त्यामुळे शेती परवडेनासी झाली आहे.

जिल्ह्यातील मंदिर, मस्जीद, चर्चच्या ट्रस्टीकडे लाखो रुपये पडून असून रायगड जिल्ह्याच्या जेएनपीटी, रिलायन्स, जेएसडब्ल्यू, आरसीएफ, गेल, एचपी गॅस, पॉस्को, प्रीव्ही, दीपक फर्टिलायझर्स, सुदर्शन केमिकल्स सारखे प्रकल्प येथील शेतकºयांनी दिलेल्या जमिनींच्या त्यागावर उभे आहेत. या प्रकल्पामुळे राज्याबरोबरच देशाच्या महसुलात हजारो कोटींचा फायदा होत आहे. त्यामुळे सदरच्या कंपन्या व ट्रस्टींकडून शेतकºयांना मदत करणे गरजेचे आहे. शेतकºयांना प्रतिगुंठा दोन हजार रुपये मदत देणे शासनाला कठीण नाही. शासनाने केलेल्या विकासकामांच्या जाहिरातींचा खर्च बंद करून तो निधी शेतकºयांना देण्यात यावा, अशी मागणी अ‍ॅड. राकेश पाटील यांनी केली आहे. शासन मदत करताना हेक्टरीच्या हिशोबाने मदत करते. महाराष्ट्रातील शेतकºयांच्या प्रश्नांपेक्षा रायगड जिल्ह्यातील शेतकºयांचे प्रश्न भिन्न आहेत. ज्या वेळी शासन एकरी ८० हजार रुपये देईल, त्या वेळी इथल्या शेतकºयांच्या पदरात किमान चार ते पाच हजार मिळणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रसंगी अ‍ॅड. नम्रता पाटील, अ‍ॅड. समीर नाईक, अ‍ॅड. अभिजीत बागवे, अ‍ॅड. प्रशांत म्हात्रे, अ‍ॅड. नीतेश ठाकूर, अ‍ॅड. गणेश भगत, अ‍ॅड. नभेश ठाकूर, अ‍ॅड. ॠग्वेद ठाकूर, अ‍ॅड. पंकज पाटील हे उपस्थित होते.

अलिबागमधील वकिलांचे निवेदन। रायगडमधील शेतकºयांचे प्रश्न वेगळेजिल्ह्यातील शेतकरी हा १० ते १५ गुंठे आकाराच्या क्षेत्राच्या खाचरांची शेती करतो. महाराष्ट्रातल्या शेतकºयांच्या प्रश्नांपेक्षा येथील शेतकºयांचे प्रश्न भिन्न आहेत. त्यामुळे येथील शेतकºयांना मदत देताना हेक्टरीमध्ये न देता ती एकरीमध्ये देण्यात यावी.- अ‍ॅड. राकेश पाटील,वंचित बहुजन आघाडी 

टॅग्स :RaigadरायगडFarmerशेतकरी