शहरं
Join us  
Trending Stories
1
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
2
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
3
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
5
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
6
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
7
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
8
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
9
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
10
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
11
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
12
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
13
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
14
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
15
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
16
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
17
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
18
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
19
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
20
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले

टोळ, दादली पुलावरून अवजड वाहतूक सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 01:39 IST

स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली

सिकंदर अनवारे 

दासगाव : रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांस जोडणारे दादली, टोळ आणि आंबेत हे तीन पूल कमकुवत झाल्याने या पुलांची दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. या पुलावरील अवजड वाहतूक बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहेत. मात्र, स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आजही पुलांवरील अवजड वाहतूक सुरूच आहे.

महाड जवळील दादली गावाजवळ, आंबेत गावानजीक आणि खाडीपट्टा विभागातील टोळ गावाजवळील पूल हे सावित्री नदीवर बांधण्यात आले आहेत. १९८० च्या सुमारास बांधण्यात आले असून तिन्ही पुलांवरून पूर्वीपेक्षा वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे.अवजड वाहतूक आणि वाढलेल्या वाहनांच्या संख्येमुळे पुलांचे नुकसान झाले आहे, शिवाय सावित्री नदीतील पूल वाहून गेल्याच्या घटनेनंतर या मोठ्या पुलांचीही तपासणी करण्यात आली. पाण्याखालील यंत्रणा वापरून पुलांची तपासणी केली असता पुलांच्या पायथ्याशी दुरुस्ती होणे आवश्यक असल्याचे निरीक्षण करणाºया एजन्सीने सार्वजनिक बांधकाम विभागाला सुचवले. त्यानंतर आंबेत पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. यामुळे पुलावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसा सूचना फलकही पुलालगत लावण्यात आला आहे. या मार्गावरील एसटी बसेसही महाड मार्गे वळवण्यात आल्या आहेत. मात्र, आंबेत पुलावरील वाहतूक बंद केली असली तरी टोळ आणि दादली पुलावरील अवजड वाहतूक सुरूच आहे. दादली, टोळ आणि आंबेत हे तिन्ही पूल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येतात. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ फलक लावून आपली जबाबदारी झटकली आहे तीन पुलांपैकी दादली आणि टोळ पुलावरून अवजड वाहतूक सुरूच आहे.दादली आणि टोळ या दोन्ही पुलावरून वाळू, माती आणि खडी वाहतूक करणारे मोठे ट्रक सतत ये-जा करतात. दोन्ही पुलांजवळ पोलीस तपासणी नाके आहेत. मात्र, पुलाजवळ सूचना फलक लावूनही पोलीस कर्मचाऱ्यांच्या समोरूनच ही अवजड वाहने ये-जा करत आहेत. अवजड वाहने जाणार नाहीत याकरिता त्या उंचीचे बॅरिकेड लावणे आवश्यक आहे. मात्र, हे बॅरिकेड लावण्यावरून सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन आणि महसूल विभागामध्ये तू तू मै मै सुरू आहे. हे पूल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असल्याने त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असल्याचे सांगितले जात आहे. तर वाहतुकीचा प्रश्न असल्याने पोलिसांनी कारवाई करावी, अशी भूमिकाही घेतली जात आहे. आंबेत पुलाचे काम सुरू होण्यापूर्वी या पुलावरूनही अवजड वाहतूक सुरूच होती. पुलाचे काम सुरू झाल्याने जिल्हाधिकाºयांनी या पुलावरील वाहतूक थांबवण्याचे आदेश दिले. मात्र, जर तिन्ही पूल कमकुवत आहेत तर दादली आणि टोळ पुलावरील अवजड वाहतूकही थांबवावी, अशी मागणी केली जात आहे.माती उत्खननही सुरूचच्टोळ आणि दादली पुलावरून मोठ्या प्रमाणात वाळू आणि माती वाहून नेणारे ट्रक ये-जा करत असतात. टोळ जवळही सध्या माती उत्खनन सुरू असून या याकरिता स्थानिक प्रशासन या पुलावरून अवजड वाहतूक बंद करत नसल्याची तक्रार स्थानिक नागरिक करत आहेत. अवजड वाहतुकीला स्थानिक प्रशासन पाठबळ देत असल्याचे समोर आले आहे.टोळ पुलावर सार्वजनिक बांधकाम विभागाने सूचना फलक लावला आहे. मात्र, वाहतुकीशी संबंधित विषय असल्याने वाहतूक पोलिसांनी याबाबत कारवाई करणे गरजेचे आहे.- एस. व्ही. पठाडे, उपभियंता,बांधकाम विभाग, महाडपुलांची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे, यामुळे बॅरिकेड लावून अवजड वाहतुकीला आळा घालता येणे शक्य आहे.- चंद्रसेन पवार, तहसीलदार, महाडआंबेत पुलाची दुरुस्ती सुरू असल्याने जवळपास दोन महिने तरी अवजड वाहतूक बंद राहणार आहे.- शिवलिंग उल्लागडे,शाखा अभियंता, माणगाव 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूकRaigadरायगड