शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

टोळ, दादली पुलावरून अवजड वाहतूक सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 01:39 IST

स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली

सिकंदर अनवारे 

दासगाव : रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांस जोडणारे दादली, टोळ आणि आंबेत हे तीन पूल कमकुवत झाल्याने या पुलांची दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. या पुलावरील अवजड वाहतूक बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहेत. मात्र, स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आजही पुलांवरील अवजड वाहतूक सुरूच आहे.

महाड जवळील दादली गावाजवळ, आंबेत गावानजीक आणि खाडीपट्टा विभागातील टोळ गावाजवळील पूल हे सावित्री नदीवर बांधण्यात आले आहेत. १९८० च्या सुमारास बांधण्यात आले असून तिन्ही पुलांवरून पूर्वीपेक्षा वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे.अवजड वाहतूक आणि वाढलेल्या वाहनांच्या संख्येमुळे पुलांचे नुकसान झाले आहे, शिवाय सावित्री नदीतील पूल वाहून गेल्याच्या घटनेनंतर या मोठ्या पुलांचीही तपासणी करण्यात आली. पाण्याखालील यंत्रणा वापरून पुलांची तपासणी केली असता पुलांच्या पायथ्याशी दुरुस्ती होणे आवश्यक असल्याचे निरीक्षण करणाºया एजन्सीने सार्वजनिक बांधकाम विभागाला सुचवले. त्यानंतर आंबेत पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. यामुळे पुलावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसा सूचना फलकही पुलालगत लावण्यात आला आहे. या मार्गावरील एसटी बसेसही महाड मार्गे वळवण्यात आल्या आहेत. मात्र, आंबेत पुलावरील वाहतूक बंद केली असली तरी टोळ आणि दादली पुलावरील अवजड वाहतूक सुरूच आहे. दादली, टोळ आणि आंबेत हे तिन्ही पूल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येतात. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ फलक लावून आपली जबाबदारी झटकली आहे तीन पुलांपैकी दादली आणि टोळ पुलावरून अवजड वाहतूक सुरूच आहे.दादली आणि टोळ या दोन्ही पुलावरून वाळू, माती आणि खडी वाहतूक करणारे मोठे ट्रक सतत ये-जा करतात. दोन्ही पुलांजवळ पोलीस तपासणी नाके आहेत. मात्र, पुलाजवळ सूचना फलक लावूनही पोलीस कर्मचाऱ्यांच्या समोरूनच ही अवजड वाहने ये-जा करत आहेत. अवजड वाहने जाणार नाहीत याकरिता त्या उंचीचे बॅरिकेड लावणे आवश्यक आहे. मात्र, हे बॅरिकेड लावण्यावरून सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन आणि महसूल विभागामध्ये तू तू मै मै सुरू आहे. हे पूल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असल्याने त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असल्याचे सांगितले जात आहे. तर वाहतुकीचा प्रश्न असल्याने पोलिसांनी कारवाई करावी, अशी भूमिकाही घेतली जात आहे. आंबेत पुलाचे काम सुरू होण्यापूर्वी या पुलावरूनही अवजड वाहतूक सुरूच होती. पुलाचे काम सुरू झाल्याने जिल्हाधिकाºयांनी या पुलावरील वाहतूक थांबवण्याचे आदेश दिले. मात्र, जर तिन्ही पूल कमकुवत आहेत तर दादली आणि टोळ पुलावरील अवजड वाहतूकही थांबवावी, अशी मागणी केली जात आहे.माती उत्खननही सुरूचच्टोळ आणि दादली पुलावरून मोठ्या प्रमाणात वाळू आणि माती वाहून नेणारे ट्रक ये-जा करत असतात. टोळ जवळही सध्या माती उत्खनन सुरू असून या याकरिता स्थानिक प्रशासन या पुलावरून अवजड वाहतूक बंद करत नसल्याची तक्रार स्थानिक नागरिक करत आहेत. अवजड वाहतुकीला स्थानिक प्रशासन पाठबळ देत असल्याचे समोर आले आहे.टोळ पुलावर सार्वजनिक बांधकाम विभागाने सूचना फलक लावला आहे. मात्र, वाहतुकीशी संबंधित विषय असल्याने वाहतूक पोलिसांनी याबाबत कारवाई करणे गरजेचे आहे.- एस. व्ही. पठाडे, उपभियंता,बांधकाम विभाग, महाडपुलांची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे, यामुळे बॅरिकेड लावून अवजड वाहतुकीला आळा घालता येणे शक्य आहे.- चंद्रसेन पवार, तहसीलदार, महाडआंबेत पुलाची दुरुस्ती सुरू असल्याने जवळपास दोन महिने तरी अवजड वाहतूक बंद राहणार आहे.- शिवलिंग उल्लागडे,शाखा अभियंता, माणगाव 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूकRaigadरायगड