शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

टोळ, दादली पुलावरून अवजड वाहतूक सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 01:39 IST

स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली

सिकंदर अनवारे 

दासगाव : रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांस जोडणारे दादली, टोळ आणि आंबेत हे तीन पूल कमकुवत झाल्याने या पुलांची दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. या पुलावरील अवजड वाहतूक बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहेत. मात्र, स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आजही पुलांवरील अवजड वाहतूक सुरूच आहे.

महाड जवळील दादली गावाजवळ, आंबेत गावानजीक आणि खाडीपट्टा विभागातील टोळ गावाजवळील पूल हे सावित्री नदीवर बांधण्यात आले आहेत. १९८० च्या सुमारास बांधण्यात आले असून तिन्ही पुलांवरून पूर्वीपेक्षा वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे.अवजड वाहतूक आणि वाढलेल्या वाहनांच्या संख्येमुळे पुलांचे नुकसान झाले आहे, शिवाय सावित्री नदीतील पूल वाहून गेल्याच्या घटनेनंतर या मोठ्या पुलांचीही तपासणी करण्यात आली. पाण्याखालील यंत्रणा वापरून पुलांची तपासणी केली असता पुलांच्या पायथ्याशी दुरुस्ती होणे आवश्यक असल्याचे निरीक्षण करणाºया एजन्सीने सार्वजनिक बांधकाम विभागाला सुचवले. त्यानंतर आंबेत पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. यामुळे पुलावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसा सूचना फलकही पुलालगत लावण्यात आला आहे. या मार्गावरील एसटी बसेसही महाड मार्गे वळवण्यात आल्या आहेत. मात्र, आंबेत पुलावरील वाहतूक बंद केली असली तरी टोळ आणि दादली पुलावरील अवजड वाहतूक सुरूच आहे. दादली, टोळ आणि आंबेत हे तिन्ही पूल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येतात. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ फलक लावून आपली जबाबदारी झटकली आहे तीन पुलांपैकी दादली आणि टोळ पुलावरून अवजड वाहतूक सुरूच आहे.दादली आणि टोळ या दोन्ही पुलावरून वाळू, माती आणि खडी वाहतूक करणारे मोठे ट्रक सतत ये-जा करतात. दोन्ही पुलांजवळ पोलीस तपासणी नाके आहेत. मात्र, पुलाजवळ सूचना फलक लावूनही पोलीस कर्मचाऱ्यांच्या समोरूनच ही अवजड वाहने ये-जा करत आहेत. अवजड वाहने जाणार नाहीत याकरिता त्या उंचीचे बॅरिकेड लावणे आवश्यक आहे. मात्र, हे बॅरिकेड लावण्यावरून सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन आणि महसूल विभागामध्ये तू तू मै मै सुरू आहे. हे पूल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असल्याने त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असल्याचे सांगितले जात आहे. तर वाहतुकीचा प्रश्न असल्याने पोलिसांनी कारवाई करावी, अशी भूमिकाही घेतली जात आहे. आंबेत पुलाचे काम सुरू होण्यापूर्वी या पुलावरूनही अवजड वाहतूक सुरूच होती. पुलाचे काम सुरू झाल्याने जिल्हाधिकाºयांनी या पुलावरील वाहतूक थांबवण्याचे आदेश दिले. मात्र, जर तिन्ही पूल कमकुवत आहेत तर दादली आणि टोळ पुलावरील अवजड वाहतूकही थांबवावी, अशी मागणी केली जात आहे.माती उत्खननही सुरूचच्टोळ आणि दादली पुलावरून मोठ्या प्रमाणात वाळू आणि माती वाहून नेणारे ट्रक ये-जा करत असतात. टोळ जवळही सध्या माती उत्खनन सुरू असून या याकरिता स्थानिक प्रशासन या पुलावरून अवजड वाहतूक बंद करत नसल्याची तक्रार स्थानिक नागरिक करत आहेत. अवजड वाहतुकीला स्थानिक प्रशासन पाठबळ देत असल्याचे समोर आले आहे.टोळ पुलावर सार्वजनिक बांधकाम विभागाने सूचना फलक लावला आहे. मात्र, वाहतुकीशी संबंधित विषय असल्याने वाहतूक पोलिसांनी याबाबत कारवाई करणे गरजेचे आहे.- एस. व्ही. पठाडे, उपभियंता,बांधकाम विभाग, महाडपुलांची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे, यामुळे बॅरिकेड लावून अवजड वाहतुकीला आळा घालता येणे शक्य आहे.- चंद्रसेन पवार, तहसीलदार, महाडआंबेत पुलाची दुरुस्ती सुरू असल्याने जवळपास दोन महिने तरी अवजड वाहतूक बंद राहणार आहे.- शिवलिंग उल्लागडे,शाखा अभियंता, माणगाव 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूकRaigadरायगड