शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

रायगडमध्ये जोरदार पावसाला सुरुवात; राब करपण्याची भीती झाली दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 01:10 IST

शेतीच्या कामांना वेग : २४ तासांत ३३६ मिमी पाऊस,

रायगड : जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये ३३६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाला सुरुवात झाल्याने शेतीच्या कामांना वेग आल्याने बळीराजा चांगलाच सुखावला आहे. काही ठिकाणी भात लावणीच्या कामांना वेग आला आहे. ४ जुलै रोजी तुरळक ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर ५, ६ आणि ७ जुलै रोजी रायगड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविलेली आहे. तरी त्या अनुषंगाने आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाकडून कळविण्यात आले आहे.

रायगड जिल्ह्यात एक लाख पाच हजार हेक्टर क्षेत्रावर भाताचे पीक घेतले जाते. पावसाची अनिश्चितता असल्याने बळीराजा चिंतातुर झाला होता. अख्खा जून महिना कोरडा गेला होता. कमी-अधिक पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी शेतात राब टाकले होते, परंतु पाऊस गायब झाल्याने राब करपण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत होती. राब करपले असते, तर शेतकºयांचे आर्थिक नुकसान झाले असते, परंतु जुलै महिना लागताच पावसाने दमदार सुरुवात केल्याने शेतकºयांची चिंता दूर झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून पाऊस पडत असल्याने आता शेतीच्या कामांना वेग आला आहे. काही ठिकाणी भात लावणीच्या कामेही सुरू आहेत.

अलिबाग, पेण, रोहा, कर्जत, माणगाव, म्हसळा, खालापूर, पाली, पनवेल यासह अन्य तालुक्यांमध्ये भाताचे पीक घेतले जाते. त्यामुळे या ठिकाणी शेतीच्या कामांनी वेग घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतीची कामे रखडली होती. शेतात टाकलेला राबही करपण्याची भीती निर्माण झाली होती. आता पावसाने सुरुवात केल्याने मनातील भीती दूर झाली आहे. पावसामुळे आता भात लावणीच्या कामांना वेग आला आहे, असे अलिबाग तालुक्यातील आत्माराम पाटील यांनी स्पष्ट केले.

समुद्रात चार मीटर उंचीच्या लाटा उसळणारनिसर्ग चक्रीवादळाने ३ जून रोजी जोरदार तडाखा दिल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातून जिल्हा सावरत आहे. त्यातच आता भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार ३ जुलै ते ८ जुलै रोजी समुद्र खवळलेला राहणार आहे. या कालावधीत समुद्रामध्ये सुमारे चार मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळे समुद्रात कोणीच जाऊन नये, असा इशारा दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाºयानंतर जिल्हा प्रशासनाने संबंधित यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीagricultureशेती