शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
2
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
3
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
4
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
5
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
6
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
7
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
8
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
9
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
10
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना
11
Share Market Today: शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स २७० अंकांनी वधारला; Nifty २४,९४२ च्या पार, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
12
VIDEO: भारताला विजयी केल्यावर जेमिमा रॉड्रिग्जची वडिलांना घट्ट मिठी, बाप-लेकीला भावना अनावर
13
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
14
मंदिरातून झाली 'मदिरा दान'ची घोषणा! आज सकाळपासूनच देशी दारूचा ठेक्यावर उसळली गर्दी, १० ची दिली होती वेळ...
15
₹५ लाखांचं बनतील ₹५० कोटी; ५ स्टेप फॉर्म्युला जो तुम्हाला देईल फायनान्शिअल फ्रीडम आणि अनस्टॉबेल ग्रोथ
16
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
17
Sushant Singh Rajput : सुशांत सिंह राजपूतची हत्या? बहीण श्वेता कीर्तीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, "२ लोकांनी..."
18
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
19
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
20
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड

रायगडमध्ये जोरदार पावसाला सुरुवात; राब करपण्याची भीती झाली दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 01:10 IST

शेतीच्या कामांना वेग : २४ तासांत ३३६ मिमी पाऊस,

रायगड : जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये ३३६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाला सुरुवात झाल्याने शेतीच्या कामांना वेग आल्याने बळीराजा चांगलाच सुखावला आहे. काही ठिकाणी भात लावणीच्या कामांना वेग आला आहे. ४ जुलै रोजी तुरळक ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर ५, ६ आणि ७ जुलै रोजी रायगड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविलेली आहे. तरी त्या अनुषंगाने आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाकडून कळविण्यात आले आहे.

रायगड जिल्ह्यात एक लाख पाच हजार हेक्टर क्षेत्रावर भाताचे पीक घेतले जाते. पावसाची अनिश्चितता असल्याने बळीराजा चिंतातुर झाला होता. अख्खा जून महिना कोरडा गेला होता. कमी-अधिक पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी शेतात राब टाकले होते, परंतु पाऊस गायब झाल्याने राब करपण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत होती. राब करपले असते, तर शेतकºयांचे आर्थिक नुकसान झाले असते, परंतु जुलै महिना लागताच पावसाने दमदार सुरुवात केल्याने शेतकºयांची चिंता दूर झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून पाऊस पडत असल्याने आता शेतीच्या कामांना वेग आला आहे. काही ठिकाणी भात लावणीच्या कामेही सुरू आहेत.

अलिबाग, पेण, रोहा, कर्जत, माणगाव, म्हसळा, खालापूर, पाली, पनवेल यासह अन्य तालुक्यांमध्ये भाताचे पीक घेतले जाते. त्यामुळे या ठिकाणी शेतीच्या कामांनी वेग घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतीची कामे रखडली होती. शेतात टाकलेला राबही करपण्याची भीती निर्माण झाली होती. आता पावसाने सुरुवात केल्याने मनातील भीती दूर झाली आहे. पावसामुळे आता भात लावणीच्या कामांना वेग आला आहे, असे अलिबाग तालुक्यातील आत्माराम पाटील यांनी स्पष्ट केले.

समुद्रात चार मीटर उंचीच्या लाटा उसळणारनिसर्ग चक्रीवादळाने ३ जून रोजी जोरदार तडाखा दिल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातून जिल्हा सावरत आहे. त्यातच आता भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार ३ जुलै ते ८ जुलै रोजी समुद्र खवळलेला राहणार आहे. या कालावधीत समुद्रामध्ये सुमारे चार मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळे समुद्रात कोणीच जाऊन नये, असा इशारा दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाºयानंतर जिल्हा प्रशासनाने संबंधित यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीagricultureशेती