शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बंद मोबाइल टाॅवर शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी, महसूल विभागाच्या शेतकऱ्यांना दंडात्मक कारवाईच्या नोटिसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 00:14 IST

महाड तालुक्यात अनेक गावात गेली काही वर्षे बंद असलेले मोबाइल टाॅवरची विनाशेती दंडात्मक वसुली झालेली नाही. यामुळे महसूल विभागाने आर्थिक वर्ष समाप्तीआधी मोबाइल टाॅवरकडून दंड वसुली मोहीम सुरू केली आहे.

- सिकंदर अनवारेदासगाव :  महाड तालुक्यात अनेक गावात गेली काही वर्षे बंद असलेले मोबाइल टाॅवरची विनाशेती दंडात्मक वसुली झालेली नाही. यामुळे महसूल विभागाने आर्थिक वर्ष समाप्तीआधी मोबाइल टाॅवरकडून दंड वसुली मोहीम सुरू केली आहे. या दंडात्मक वसुलीच्या नोटीसा शेतकऱ्यांना देण्यात आल्याने आणि कंपन्यांनी बंद केलेले टाॅवर जागीच पडून राहिल्याने शेतकऱ्यांसाठी हे बंद टाॅवर डोकेदुखीच ठरली आहेत.आर्थिक वर्ष समाप्तीसाठी महसूल विभागाने विनाशेती दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. यामध्ये तालुक्यातील सर्व मोबाइल टाॅवरचादेखील समावेश आहे. जागेचा वापर विनाशेती न करताच व्यावसायिक पद्धतीने होत असल्याने शासनाने या मोबाइल टाॅवरकडून दंड वसुली सुरू केली आहे; मात्र महाड तालुक्यात अनेक गावातील मोबाइल टाॅवर गेली अनेक वर्ष बंद आहेत. या मोबाइल सेवा पुरवणाऱ्या कंपन्या बंद झाल्या तर काही कंपन्या अन्य कंपन्यांमध्ये सामील झाल्या आहेत. मोबाइल टाॅवर बसवताना शेतकऱ्यांबरोबर होत असलेल्या करारनाम्यानुसार शेतकऱ्याला जमीन भाडे दिले जाते.  जमीन विनाशेती केलेली नसल्याने महसूल विभागाकडून शेतकरी आणि मोबाइल टाॅवर कंपन्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत; मात्र महाड तालुक्यात ज्या ठिकाणी मोबाइल टाॅवर बंद झाले आहेत, त्या कंपन्यांकडून शेतकऱ्याला कोणतीच पूर्वकल्पना देण्यात आली नाही. अगर जमिनीतील मोबाइल टाॅवर हटवण्यात आलेला नाही. प्रशासनालादेखील याबाबत कोणतीच कल्पना देण्यात आलेली नसल्याने जमीन वापराबाबत शेतकऱ्यांना नोटीसा देण्यात आलेल्या आहेत. कंपन्यांचे पत्ते बदलण्यात आलेले असल्याने त्यांचा मात्र  संपर्क होत नाही आणि जमीन भाडेदेखील देण्यात आलेले नाही. यामुळे शेतकरी कात्रीत सापडला  आहे. महाड तालुक्यातील बंद मोबाइल टाॅवरमहाड तालुक्यात जवळपास १५ मोबाइल टाॅवर बंद अवस्थेत आहेत. यामध्ये एअरटेल, रिलायन्स, जी.टी.एल., टाटा मोबाइल या कंपन्यांचे महाड शहर, शिरगाव, बारसगाव, टोळ बु., वहूर, दासगाव, गावडी, झोळीचाकोंड, काचले, कोतुर्डे, करंजाडी, लोखंडेकोंड यांचा समावेश आहे. या बंद टाॅवरमुळे महसूल विभागाचा लाखो रुपयांचा दंड थकीत आहे. गव्हाडी गावातील टाॅवरकडून सुमारे १,९३,८४०, महाडमधील टाॅवरकडून २,०१,६८०, दासगाव टाॅवरकडून १,९९,७२०, टोळ बु.मधील टाॅवरकडून ४,७३,९२० रुपये वसूल होणे आहेत. कंपनीमालक आणि शेतकरी दोघांनादेखील नोटीसा देण्यात येतात, असे नायब तहसीलदार प्रदीप कुडळ यांनी सांगितले. या नोटीसा प्राप्त होताच शेतकऱ्यांना धक्का बसतो; मात्र कंपन्या दाद देत नसल्याने गेली तीन ते चार वर्षांची थकबाकी राहिली आहे. गेली तीन वर्षांपासून माझ्या जमिनीमधील मोबाइल टाॅवर बंद आहे. कंपनीच्या लोकांशी संपर्क होत नाही. कंपनीने जमीन भाडेदेखील दिलेले नाही आणि विनाशेती वापर दंडदेखील भरलेला नाही, यामुळे महाड महसूल विभागाकडून आम्हाला नोटीसा येत आहेत.– लक्ष्मण अंबावले शेतकरी गाव गव्हाडी, 

टॅग्स :MobileमोबाइलRaigadरायगड