शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

राज्यघटना बदलण्यासाठी सत्तेत गेलात का? अजित पवार यांचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 02:19 IST

जनतेला अच्छे दिन आयेंगेचे स्वप्न दाखविणारे सरकार हे केवळ जाहिरातबाजी करणारे सरकार असून त्यांच्याच पक्षातले आमदार आज त्यांच्यावर नाराज आहेत. सर्व ठिकाणी हुकूमशाही करीत मीडियालासुद्धा आवर घालण्याचे सुरू असलेले प्रकार अक्षरश: लोकशाहीचाही आवाज दाबण्याचे काम हे सरकार करीत आहे.

धाटाव : जनतेला अच्छे दिन आयेंगेचे स्वप्न दाखविणारे सरकार हे केवळ जाहिरातबाजी करणारे सरकार असून त्यांच्याच पक्षातले आमदार आज त्यांच्यावर नाराज आहेत. सर्व ठिकाणी हुकूमशाही करीत मीडियालासुद्धा आवर घालण्याचे सुरू असलेले प्रकार अक्षरश: लोकशाहीचाही आवाज दाबण्याचे काम हे सरकार करीत आहे. कोरेगाव-भीमा प्रकरणात राज्य सरकार, पोलीस प्रशासनाला अपयश आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या महाराष्ट्रात ही परिस्थिती? असा प्रश्न करीत राज्यघटना बदलण्यासाठी तुम्ही सत्तेत गेलात का? असा सरकारवर जोरदार प्रहार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी उपमुख्यमंत्री आ.अजित पवार यांनी रोह्यातील भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्र मात केला.सोमवारी रोह्यातील वरसे जिल्हा परिषद गटातील भुवनेश्वर ते अशोक नगर प्रमुख जिल्हा मार्गाच्या अंदाजे २ कोटी रुपयांच्या रस्त्याचे व वरसे ग्रामपंचायत हद्दीतील मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेतून मिळालेल्या पहिल्या टप्प्यातील ३ कोटी १० लाखरु पयांच्या नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आ.अजित पवार यांच्या हस्ते प्रदेशाध्यक्ष आ.सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्या प्रसंगी सरकारवर जोरदार हल्ला चढवित ते बोलत होते. याप्रसंगी आ.अनिल तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे, राष्ट्रवादी माजी जिल्हाध्यक्ष वसंत ओसवाल, जिल्हाध्यक्ष विनोद घोसाळकर, रोहा पं. स. सभापती वीणा चितळकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :RaigadरायगडAjit Pawarअजित पवार