शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर अजित पवारांची माफी मागा; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला
2
Rishabh Pant Has Been Ruled Out : रिषभ पंतची न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेतून माघार; कारण...
3
'ठाकरे ब्रँड'चा फायदा उद्धव-राजना होणार? मराठी मतं 'गेम' फिरवणार? सर्व्हेची टक्केवारी समोर
4
WPL 2026 : हरमनप्रीतच्या MI चा विजयी कल्ला! DC ची कॅप्टन जेमिमावर आली स्मृतीसारखी वेळ
5
"उत्तर भारतीयांकडे वाकड्या नजरेने कुणी पाहिले तर..."; भाजपा मंत्री नितेश राणे काय बोलून गेले?
6
शिंदेसेनेला मतदान करा, जैन व्यापाऱ्याच्या मुलाची पोस्ट; भाजपा उमेदवाराच्या पत्नीने दिली धमकी
7
'गणेश नाईक यांची मनस्थिती बिघडली, त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जा', शिंदेसेनेची बोचरी टीका
8
बांगलादेशला लागणार जॅकपॉट! ५०० टक्के टॅरिफच्या टांगत्या तलवारीनं का वाढली भारताची डोकेदुखी?
9
राम मंदिराजवळ नमाज पढणारा अब्दुल अहद शेख कोण? बॅगेत सापडलं असं काही, कुटुंबीय म्हणाले...  
10
PCMC Election 2026: निवडणुका जवळ आल्या की, अनेकांचा कंठ फुटून काहीही बोलतात, दादा आपण रागवायचं नाही - देवेंद्र फडणवीस
11
सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबईहून पालघरला आले, पोहायला पाण्यात उतरले आणि एकावर मृत्युने घातली झडप
12
ठाकरे बंधूंच्या 'शिवगर्जनेची' तारीख ठरली! शिवाजी पार्कवर राज ठाकरे कोणता गौप्यस्फोट करणार?
13
शरद पवार अन् अजित पवार एकत्र येणार नाहीत?; प्रफुल पटेल यांच्या विधानानं नव्या चर्चांना उधाण
14
WPL 2026 : अनुष्का शर्माचा ‘पायगुण’! GG ची ‘साडेसाती’ संपली; UP वॉरियर्सकडून ‘ती’ एकटीच लढली
15
मोदी सरकारविरोधात लिखाण करणाऱ्या डॉ. संग्राम पाटील यांना मुंबईत येताच पोलिसांनी घेतलं ताब्यात
16
Holiday for Election: मतदानासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर, कोणाला लागू असणार?
17
"आमचा जीव घेतला तरीही..."; सुप्रिया सुळे कडाडल्या; भाजपाला इशारा, मुंबईबाबत काय म्हणाल्या?
18
चौफेर टीका, भाजपाची नाचक्की, अखेरीस स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे याने दिला राजीनामा
19
Video - ओडिशामध्ये ९ सीटर चार्टर्ड प्लेन क्रॅश; पायलटसह ६ जण गंभीर जखमी
20
ICC U19 World Cup Warm up Matches : वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी! शतक अवघ्या ४ धावांनी हुकलं
Daily Top 2Weekly Top 5

हनुमान कोळीवाडा पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत, जेएनपीटी बंदरातील विस्थापितांना फक्त आश्वासने

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 05:06 IST

जेएनपीटी बंदरासाठी विस्थापित करून वसविण्यात आलेल्या हनुमान कोळीवाडा गावालाच वाळवीने पोखरले आहे. अयोग्यरीत्या पुनर्वसन करण्यात आलेल्या हनुमान कोळीवाडा गावाची बंदरासाठी संपादित करण्यात आलेली जमीन परत करावी

- मधुकर ठाकूरउरण : जेएनपीटी बंदरासाठी विस्थापित करून वसविण्यात आलेल्या हनुमान कोळीवाडा गावालाच वाळवीने पोखरले आहे.अयोग्यरीत्या पुनर्वसन करण्यात आलेल्या हनुमान कोळीवाडा गावाची बंदरासाठी संपादित करण्यात आलेली जमीन परत करावी, अथवा अन्य ठिकाणी पुनश्च पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी मागील ३२ वर्षांपासून ग्रामस्थांकडून केली जात आहे. मात्र, याबाबत केंद्र आणि राज्य शासनाकडून फक्त आश्वासने दिली जात आहेत. पुनर्वसन करण्याच्या मागणीवर मागील तीन तप नुसत्याच चर्चा, बैठका सुरू आहेत.घेण्यासाठी हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी फेर पुनर्वसनाची मागणी जेएनपीटी, सिडको केंद्र आणि राज्य सरकारकडे केली आहे. या फेर पुनर्वसनाच्या मागणीसाठी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून राज्य आणि केंद्र सरकार बरोबर पत्रव्यवहार केला आहे. अनेकदा चर्चाही झाल्या आहेत, अनेक बैठकाही पार पडल्या आहेत.अनेक वर्षांपासून शासनाचे उंबरठेही झिजवून झाले आहेत. त्यानंतर कें द्र सरकारने गावाच्या पुनर्वसनासाठी ५ कोटी ६९ लाख रुपये मंजूरही केलेले आहेत. मात्र, त्यानंतरही हनुमान कोळीवाडा गाव पुनर्वसनापासून वंचित राहिला आहे.जेएनपीटी बंदराच्या उभारणीसाठी उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाडा आणि शेवा ही दोन गावे विस्थापित करण्यात आली आहेत. १९८५ साली जेएनपीटी बंदर उभारणीच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर हनुमान कोळीवाडा गावाचे पुनर्वसन उरण शहरानजीक असलेल्या बोरी-पाखाडी (भवरा) गावाजवळ करण्यात आले. चिखल आणि वाळवीग्रस्त मातीच्या जागेत भराव करून नव्याने हनुमान कोळीवाडा गाव उभारण्यात आले आहे. पुनर्वसन करताना ग्रामस्थांना आवश्यकतेनुसार जमीनही उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे अपुऱ्या जागेत उभारण्यात आलेल्या घरातच ग्रामस्थ दाटीवाटीने राहत आहेत. हनुमान कोळीवाडा गावात वास्तव्यासाठी आलेल्या १०५ कुटुंबासाठी सव्वासहा हेक्टर जागा पुनर्वसनासाठी आवश्यक होती. त्यासाठी जेएनपीटीने जागा आरक्षितही ठेवली आहे. मात्र, पुनर्वसन करताना फक्त दोन हेक्टर जागेतच पुनर्वसन करण्यात आले. मात्र पुनर्वसन करण्यात आलेल्या १०५ घरांच्या वस्तीच्या संपूर्ण गावालाच वाळवीने पोखरले आहे.वाळवीमुळे ग्रामस्थांना घरात वास्तव्य करणेही कठीण होऊन बसले आहे. गावातील अनेक कुटुंब गाव सोडून गेली आहेत. काही गावाबाहेर भाड्याने राहत आहेत, तर घरभाडे परवडत नसल्याने आणि मासेमारीच उपजीविकेचे साधन बनलेली उर्वरित अनेक कुटुंबे वाळवीग्रस्त घरातच जीव मुठीत धरून जीवन जगत आहेत.अनेक वर्षांपासून हनुमान कोळीवाडा गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. पुनर्वसनासाठी आवश्यक जागा गावाशेजारीच उपलब्ध आहे. मात्र, पुनर्वसनाच्या आड स्थानिक राजकारण येत आहे. काही स्थानिक राजकीय नेतेच जेएनपीटी, सिडको आणि राज्य सरकारमध्ये दलालीचे काम करीत आहेत.- गौरव कोळी,सरपंच, हनुमान कोळीवाडाहनुमान कोळीवाडा गावाच्या पुनर्वसनाच्या कामावर खर्च कुणी करावा, यावरच जेएनपीटी, सिडको, केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वाद आहे. पुनर्वसनासाठी १७ हेक्टर जागेची मागणी करण्यात आली आहे, अशी जागा जेएनपीटी परिसरात उपलब्ध नाही. गावाशेजारी आवश्यक जागा उपलब्ध असतानाही मागील ३२ वर्षांपासून पुनर्वसनापासून केंद्र व राज्य सरकारने वंचित ठेवले आहे.- नरेश कोळी, अध्यक्ष, ग्रामविकास मंडळगावाच्या पुनर्वसनासाठी जेएनपीटीकडे जागा उपलब्ध आहे. मात्र, जागेचा निर्णय घेण्यास जेएनपीटी चालढकलपणा करीत आहे. जेएनपीटीमुळेच पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप प्रलंबित राहिला आहे.- जयवंत कोळी, माजी सरपंच, हनुमान कोळीवाडा

टॅग्स :Raigadरायगड