शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

हनुमान कोळीवाडा पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत, जेएनपीटी बंदरातील विस्थापितांना फक्त आश्वासने

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 05:06 IST

जेएनपीटी बंदरासाठी विस्थापित करून वसविण्यात आलेल्या हनुमान कोळीवाडा गावालाच वाळवीने पोखरले आहे. अयोग्यरीत्या पुनर्वसन करण्यात आलेल्या हनुमान कोळीवाडा गावाची बंदरासाठी संपादित करण्यात आलेली जमीन परत करावी

- मधुकर ठाकूरउरण : जेएनपीटी बंदरासाठी विस्थापित करून वसविण्यात आलेल्या हनुमान कोळीवाडा गावालाच वाळवीने पोखरले आहे.अयोग्यरीत्या पुनर्वसन करण्यात आलेल्या हनुमान कोळीवाडा गावाची बंदरासाठी संपादित करण्यात आलेली जमीन परत करावी, अथवा अन्य ठिकाणी पुनश्च पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी मागील ३२ वर्षांपासून ग्रामस्थांकडून केली जात आहे. मात्र, याबाबत केंद्र आणि राज्य शासनाकडून फक्त आश्वासने दिली जात आहेत. पुनर्वसन करण्याच्या मागणीवर मागील तीन तप नुसत्याच चर्चा, बैठका सुरू आहेत.घेण्यासाठी हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी फेर पुनर्वसनाची मागणी जेएनपीटी, सिडको केंद्र आणि राज्य सरकारकडे केली आहे. या फेर पुनर्वसनाच्या मागणीसाठी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून राज्य आणि केंद्र सरकार बरोबर पत्रव्यवहार केला आहे. अनेकदा चर्चाही झाल्या आहेत, अनेक बैठकाही पार पडल्या आहेत.अनेक वर्षांपासून शासनाचे उंबरठेही झिजवून झाले आहेत. त्यानंतर कें द्र सरकारने गावाच्या पुनर्वसनासाठी ५ कोटी ६९ लाख रुपये मंजूरही केलेले आहेत. मात्र, त्यानंतरही हनुमान कोळीवाडा गाव पुनर्वसनापासून वंचित राहिला आहे.जेएनपीटी बंदराच्या उभारणीसाठी उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाडा आणि शेवा ही दोन गावे विस्थापित करण्यात आली आहेत. १९८५ साली जेएनपीटी बंदर उभारणीच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर हनुमान कोळीवाडा गावाचे पुनर्वसन उरण शहरानजीक असलेल्या बोरी-पाखाडी (भवरा) गावाजवळ करण्यात आले. चिखल आणि वाळवीग्रस्त मातीच्या जागेत भराव करून नव्याने हनुमान कोळीवाडा गाव उभारण्यात आले आहे. पुनर्वसन करताना ग्रामस्थांना आवश्यकतेनुसार जमीनही उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे अपुऱ्या जागेत उभारण्यात आलेल्या घरातच ग्रामस्थ दाटीवाटीने राहत आहेत. हनुमान कोळीवाडा गावात वास्तव्यासाठी आलेल्या १०५ कुटुंबासाठी सव्वासहा हेक्टर जागा पुनर्वसनासाठी आवश्यक होती. त्यासाठी जेएनपीटीने जागा आरक्षितही ठेवली आहे. मात्र, पुनर्वसन करताना फक्त दोन हेक्टर जागेतच पुनर्वसन करण्यात आले. मात्र पुनर्वसन करण्यात आलेल्या १०५ घरांच्या वस्तीच्या संपूर्ण गावालाच वाळवीने पोखरले आहे.वाळवीमुळे ग्रामस्थांना घरात वास्तव्य करणेही कठीण होऊन बसले आहे. गावातील अनेक कुटुंब गाव सोडून गेली आहेत. काही गावाबाहेर भाड्याने राहत आहेत, तर घरभाडे परवडत नसल्याने आणि मासेमारीच उपजीविकेचे साधन बनलेली उर्वरित अनेक कुटुंबे वाळवीग्रस्त घरातच जीव मुठीत धरून जीवन जगत आहेत.अनेक वर्षांपासून हनुमान कोळीवाडा गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. पुनर्वसनासाठी आवश्यक जागा गावाशेजारीच उपलब्ध आहे. मात्र, पुनर्वसनाच्या आड स्थानिक राजकारण येत आहे. काही स्थानिक राजकीय नेतेच जेएनपीटी, सिडको आणि राज्य सरकारमध्ये दलालीचे काम करीत आहेत.- गौरव कोळी,सरपंच, हनुमान कोळीवाडाहनुमान कोळीवाडा गावाच्या पुनर्वसनाच्या कामावर खर्च कुणी करावा, यावरच जेएनपीटी, सिडको, केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वाद आहे. पुनर्वसनासाठी १७ हेक्टर जागेची मागणी करण्यात आली आहे, अशी जागा जेएनपीटी परिसरात उपलब्ध नाही. गावाशेजारी आवश्यक जागा उपलब्ध असतानाही मागील ३२ वर्षांपासून पुनर्वसनापासून केंद्र व राज्य सरकारने वंचित ठेवले आहे.- नरेश कोळी, अध्यक्ष, ग्रामविकास मंडळगावाच्या पुनर्वसनासाठी जेएनपीटीकडे जागा उपलब्ध आहे. मात्र, जागेचा निर्णय घेण्यास जेएनपीटी चालढकलपणा करीत आहे. जेएनपीटीमुळेच पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप प्रलंबित राहिला आहे.- जयवंत कोळी, माजी सरपंच, हनुमान कोळीवाडा

टॅग्स :Raigadरायगड