शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

ई-रिक्षा देत नसल्याने माथेरानमध्ये हातरिक्षा सेवा बंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 14:08 IST

यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.

माथेरान : न्यायालयाचे आदेश असतानाही वारंवार मागणी करूनही माथेरानमध्ये सुरू असलेल्या ई-रिक्षांची सेवा हातरिक्षा चालकांना चालवण्यास दिली जात नाही. त्यामुळे हातरिक्षा चालक आक्रमक झाले असून, त्यांनी शुक्रवारपासून (दि. ८) हात रिक्षांची सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.

माथेरान हे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असल्याने येथे पूर्वीपासून हातरिक्षा व घोड्यांद्वारे वाहतूक केली जात आहे. येथील हातरिक्षा चालकांनी या अमानवीय प्रथेतून सुटका करून माथेरानमध्ये ई-रिक्षा सुरू करावी व ती हातरिक्षा चालकांना चालवण्यास द्यावी यासाठी लढा दिला आहे. त्यानुसार न्यायालयानेही ई-रिक्षा सुरू करीत हात रिक्षा चालकांना द्याव्यात, असे आदेश दिले आहेत. मात्र, ई-रिक्षांची सेवा ही अजूनही प्रायोगिक तत्त्वावर चालवत ती नगरपालिकेच्या माध्यमातून ठेकेदाराकडून सुरू आहे. त्यामुळे  रिक्षाचालकांत संताप आहे. त्यांनी यासाठी वारंवार ई-रिक्षांची संख्या वाढवत या रिक्षा आम्हाला चालवायला द्या, अशी मागणी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने १० फेब्रुवारी रोजी संनियंत्रण समितीला आदेश दिले आहेत की, या ई-रिक्षा हातरिक्षा चालकांना द्याव्यात. फक्त या ई-रिक्षांची मार्गिका कशी असावी, याबाबत समितीने लक्ष केंद्रित करावे. न्यायालयाच्या आदेशात असे कुठेही नमूद केलेले नाही की, या ई-रिक्षा ठेकेदाराला द्याव्यात; परंतु ही समिती जाणीवपूर्वक आम्हाला त्रास देत आहे. ही निष्क्रिय समिती बरखास्त करावी.- रूपेश गायकवाड, हात रिक्षा चालक

९४ हातरिक्षा परवानेसद्य:स्थितीत माथेरानमध्ये एकूण ९४ हातरिक्षांचे परवाने असून, ते सेवा देत आहेत. या सर्व परवानाधारकांना ई-रिक्षांचा परवाना द्यावा, अशी त्यांची मागणी असून, तसे त्यांनी प्रशिक्षणही घेतले आहे. मात्र, ई-रिक्षासेवा त्यांना देण्यास टाळाटाळ होत आहे.

राज्य सरकारने मागणी केल्याप्रमाणे तीन महिन्यांचा पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाला व तसा अहवाल सरकारने न्यायालयाला सादर केला आहे. आणखी एक वर्ष ठेकेदारच चालविणार असल्याने हात रिक्षा चालकांची उपासमार होणार आहे.- शकील पटेल, अध्यक्ष, हात रिक्षा संघटना, माथेरान

टॅग्स :MatheranमाथेरानRaigadरायगड