शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचा भव्य मोर्चा; जिल्हा प्रशासनास दिले निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 02:51 IST

प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्यासाठी जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने शिक्षकांनी भव्य मोर्चा काढला. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. शनिवारी गुरु नानक जयंती असल्याने सरकारी कार्यालये बंद होती.

अलिबाग : प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्यासाठी जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने शिक्षकांनी भव्य मोर्चा काढला. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. शनिवारी गुरु नानक जयंती असल्याने सरकारी कार्यालये बंद होती. जिल्हा प्रशासनाने आंदोलकांची अडचण होऊ नये, यासाठी निवेदन घेण्याची व्यवस्था केली होती. या आधीही राष्ट्रवादी काँग्रेसने सुट्टीच्याच दिवशी आंदोलने केली होती. त्यात आता शिक्षकांच्या आंदोलनाची भर पडली आहे.सकाळी ११.३०च्या सुमारास शहरातील क्र ीडाभुवन येथून शिक्षकांनी शांततेच्या मार्गाने आपला मूक मोर्चा काढला. मात्र, पोलिसांनी आंदोलकांना हिराकोट तलावाजवळ अडविल्याने त्यांनी दोरदार घोषणाबाजी करण्यास सुरु वात केली. या मोर्चाचे नेतृत्व शिक्षक परिषदेचे राज्याचे अध्यक्ष राजेश सुर्वे यांनी केले. निवड श्रेणी व वरिष्ठ वेतन श्रेणी बाबतचा काढण्यात आलेला शासन आदेश रद्द करण्यात यावा, शिक्षकांना करावी लागणारी सर्व आॅनलाइन कामे बंद करून केंद्र पातळीवर डेटा आॅपरेटरची नेमणूक करावी, नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या सर्व प्राथमिक शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, बदली इच्छुक असलेल्या सर्व शिक्षकांना बदली मिळाली पाहिजे; परंतु हे होत असताना कोणावरही अन्याय होऊ नये, म्हणून २७ फेब्रुवारी रोजीच्या शासन निर्णयात आवश्यक त्या दुरु स्त्या व सुधारणा करून बदल्या मे २०१८मध्ये करण्यात याव्यात, एमएससीआयटीसाठी मार्च २०१८पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.शिक्षणाबाबतचे शासन निर्णय बदलत असल्याने सर्वच शैक्षणिक उपक्र म आणि शिक्षकांची मेहनत वाया जात आहे. प्राथमिक शैक्षणिक उपक्रमाचे विविध प्रयोग राबविण्याचे फर्मान म्हणजे सरकारचे चुकीचे धोरण आहे. तसेच सरकार सर्व शिक्षा अभियान अंतर्गत मुलांना गणवेश आणि पाठ्यपुस्तके देत आहे. पाठ्यपुस्तकांच्या बाबतीत शासन दुजाभाव करीत नाही; परंतु गणवेश वाटपात मात्र शासन दुजाभाव करीत असल्याचा आरोप सुर्वे यांनी केला. या वेळी शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय निजापकर, प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेंद्र म्हात्रे, सोपान चांदे आदी पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले होते.शासनाची संकल्पना योग्यशिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी शासन राबवत असलेल्या संकल्पना योग्य आहेत. या संकल्पना राबविण्यासाठी शिक्षकांना संधी देणे गरजेचे असल्याचे सुर्वे यांनी सांगितले. शिक्षणाबाबतचे शासन निर्णय बदलत असल्याने शिक्षकांची मेहनत वाया जातेय.

टॅग्स :Teacherशिक्षक