शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

शिक्षकांचा भव्य मोर्चा; जिल्हा प्रशासनास दिले निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 02:51 IST

प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्यासाठी जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने शिक्षकांनी भव्य मोर्चा काढला. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. शनिवारी गुरु नानक जयंती असल्याने सरकारी कार्यालये बंद होती.

अलिबाग : प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्यासाठी जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने शिक्षकांनी भव्य मोर्चा काढला. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. शनिवारी गुरु नानक जयंती असल्याने सरकारी कार्यालये बंद होती. जिल्हा प्रशासनाने आंदोलकांची अडचण होऊ नये, यासाठी निवेदन घेण्याची व्यवस्था केली होती. या आधीही राष्ट्रवादी काँग्रेसने सुट्टीच्याच दिवशी आंदोलने केली होती. त्यात आता शिक्षकांच्या आंदोलनाची भर पडली आहे.सकाळी ११.३०च्या सुमारास शहरातील क्र ीडाभुवन येथून शिक्षकांनी शांततेच्या मार्गाने आपला मूक मोर्चा काढला. मात्र, पोलिसांनी आंदोलकांना हिराकोट तलावाजवळ अडविल्याने त्यांनी दोरदार घोषणाबाजी करण्यास सुरु वात केली. या मोर्चाचे नेतृत्व शिक्षक परिषदेचे राज्याचे अध्यक्ष राजेश सुर्वे यांनी केले. निवड श्रेणी व वरिष्ठ वेतन श्रेणी बाबतचा काढण्यात आलेला शासन आदेश रद्द करण्यात यावा, शिक्षकांना करावी लागणारी सर्व आॅनलाइन कामे बंद करून केंद्र पातळीवर डेटा आॅपरेटरची नेमणूक करावी, नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या सर्व प्राथमिक शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, बदली इच्छुक असलेल्या सर्व शिक्षकांना बदली मिळाली पाहिजे; परंतु हे होत असताना कोणावरही अन्याय होऊ नये, म्हणून २७ फेब्रुवारी रोजीच्या शासन निर्णयात आवश्यक त्या दुरु स्त्या व सुधारणा करून बदल्या मे २०१८मध्ये करण्यात याव्यात, एमएससीआयटीसाठी मार्च २०१८पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.शिक्षणाबाबतचे शासन निर्णय बदलत असल्याने सर्वच शैक्षणिक उपक्र म आणि शिक्षकांची मेहनत वाया जात आहे. प्राथमिक शैक्षणिक उपक्रमाचे विविध प्रयोग राबविण्याचे फर्मान म्हणजे सरकारचे चुकीचे धोरण आहे. तसेच सरकार सर्व शिक्षा अभियान अंतर्गत मुलांना गणवेश आणि पाठ्यपुस्तके देत आहे. पाठ्यपुस्तकांच्या बाबतीत शासन दुजाभाव करीत नाही; परंतु गणवेश वाटपात मात्र शासन दुजाभाव करीत असल्याचा आरोप सुर्वे यांनी केला. या वेळी शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय निजापकर, प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेंद्र म्हात्रे, सोपान चांदे आदी पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले होते.शासनाची संकल्पना योग्यशिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी शासन राबवत असलेल्या संकल्पना योग्य आहेत. या संकल्पना राबविण्यासाठी शिक्षकांना संधी देणे गरजेचे असल्याचे सुर्वे यांनी सांगितले. शिक्षणाबाबतचे शासन निर्णय बदलत असल्याने शिक्षकांची मेहनत वाया जातेय.

टॅग्स :Teacherशिक्षक