शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

शिक्षकांचा भव्य मोर्चा; जिल्हा प्रशासनास दिले निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 02:51 IST

प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्यासाठी जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने शिक्षकांनी भव्य मोर्चा काढला. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. शनिवारी गुरु नानक जयंती असल्याने सरकारी कार्यालये बंद होती.

अलिबाग : प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्यासाठी जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने शिक्षकांनी भव्य मोर्चा काढला. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. शनिवारी गुरु नानक जयंती असल्याने सरकारी कार्यालये बंद होती. जिल्हा प्रशासनाने आंदोलकांची अडचण होऊ नये, यासाठी निवेदन घेण्याची व्यवस्था केली होती. या आधीही राष्ट्रवादी काँग्रेसने सुट्टीच्याच दिवशी आंदोलने केली होती. त्यात आता शिक्षकांच्या आंदोलनाची भर पडली आहे.सकाळी ११.३०च्या सुमारास शहरातील क्र ीडाभुवन येथून शिक्षकांनी शांततेच्या मार्गाने आपला मूक मोर्चा काढला. मात्र, पोलिसांनी आंदोलकांना हिराकोट तलावाजवळ अडविल्याने त्यांनी दोरदार घोषणाबाजी करण्यास सुरु वात केली. या मोर्चाचे नेतृत्व शिक्षक परिषदेचे राज्याचे अध्यक्ष राजेश सुर्वे यांनी केले. निवड श्रेणी व वरिष्ठ वेतन श्रेणी बाबतचा काढण्यात आलेला शासन आदेश रद्द करण्यात यावा, शिक्षकांना करावी लागणारी सर्व आॅनलाइन कामे बंद करून केंद्र पातळीवर डेटा आॅपरेटरची नेमणूक करावी, नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या सर्व प्राथमिक शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, बदली इच्छुक असलेल्या सर्व शिक्षकांना बदली मिळाली पाहिजे; परंतु हे होत असताना कोणावरही अन्याय होऊ नये, म्हणून २७ फेब्रुवारी रोजीच्या शासन निर्णयात आवश्यक त्या दुरु स्त्या व सुधारणा करून बदल्या मे २०१८मध्ये करण्यात याव्यात, एमएससीआयटीसाठी मार्च २०१८पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.शिक्षणाबाबतचे शासन निर्णय बदलत असल्याने सर्वच शैक्षणिक उपक्र म आणि शिक्षकांची मेहनत वाया जात आहे. प्राथमिक शैक्षणिक उपक्रमाचे विविध प्रयोग राबविण्याचे फर्मान म्हणजे सरकारचे चुकीचे धोरण आहे. तसेच सरकार सर्व शिक्षा अभियान अंतर्गत मुलांना गणवेश आणि पाठ्यपुस्तके देत आहे. पाठ्यपुस्तकांच्या बाबतीत शासन दुजाभाव करीत नाही; परंतु गणवेश वाटपात मात्र शासन दुजाभाव करीत असल्याचा आरोप सुर्वे यांनी केला. या वेळी शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय निजापकर, प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेंद्र म्हात्रे, सोपान चांदे आदी पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले होते.शासनाची संकल्पना योग्यशिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी शासन राबवत असलेल्या संकल्पना योग्य आहेत. या संकल्पना राबविण्यासाठी शिक्षकांना संधी देणे गरजेचे असल्याचे सुर्वे यांनी सांगितले. शिक्षणाबाबतचे शासन निर्णय बदलत असल्याने शिक्षकांची मेहनत वाया जातेय.

टॅग्स :Teacherशिक्षक